शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

एलईडी आणि पारंपरिक मच्छीमार यांच्यात संघर्ष अटळ, दामोदर तांडेल यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 02:27 IST

एलईडी मार्फत मासेमारी करणाऱ्या बोटी समुद्रामध्ये दिसल्यास पारंपारीक मच्छीमारांबरोबर संघर्ष अटळ आहे. त्यामुळे नौदल, तट रक्षक दल आणि मत्स्य विभागाने यावर लक्ष ठेऊन कारवाई करावी.

अलिबाग : एलईडी मार्फत मासेमारी करणाऱ्या बोटी समुद्रामध्ये दिसल्यास पारंपारीक मच्छीमारांबरोबर संघर्ष अटळ आहे. त्यामुळे नौदल, तट रक्षक दल आणि मत्स्य विभागाने यावर लक्ष ठेऊन कारवाई करावी. याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल, अशी प्रमुख मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केली. अलिबाग तालुक्यातील बोडणी येथे रविवारी झालेल्या रायगड जिल्ह्यातील कोळी बांधवांच्या सभेत ते बोलत होते.अवकाळी पाऊस, ‘क्यार’ आणि ‘महा’ चक्रीवादळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मासेमारी करणाºया बोट मालकांना प्रत्येकी १ लाख रुपये तर खलाशांना प्रत्येकी २५ हजार सानुग्रह अनुदान द्यावे. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये सुरु असलेली एलईडी मासेमारी तातडीने बंद करावी अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास जेल भरो आंदोलन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे तांडेल यांनी सांगितले. सरकारने भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करुन लवकरच लगाम कसावी, समुद्रातील मच्छीचे साठे संपत आहेत. त्यामुळे भविष्यात कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ येणार आहे.कोळी बांधव शेतकºयांप्रमाणे आत्महत्या करणार नाही मात्र ‘क्यार ’ आणि ‘महा’ चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे फार मोठे आर्थिक नुकसान केले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने प्रत्येक बोटमालकाला डिझेलसाठी १ लाख रु पये सानुग्रह अनुदान द्यावे आणि खलाशांना २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी केली. सर्व पक्षीय लोकप्रतिनीधींनीना निवेदन देवून पाठपुरावा सुरू आहे. तसेच प्रधान सचिव अनुपकुमार यांनाही तातडीने निवेदन देऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.आमचे प्रश्न सरकारने न सोडविल्यास जेल भरो आंदोलन तसेच रायगड जिल्ह्यातील मच्छीमार संस्था या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देतील असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी कोळी बांधवांना संजय कोळी (जनरल सेक्र ेटरी रायगड), बनार्ड डिमेलो (कार्याध्यक्ष, भाईंदर), विश्वनाथ नाखवा (जिल्हाध्यक्ष, रायगड) धर्मा घारबट, रेवस-बोडणीचे चेअरमन विश्वास नाखवा आदींनी मार्गदर्शन केले.होणारे संघर्ष टाळण्याचा प्रयत्नबोडणी येथे झालेल्या मच्छीमार बांधवांच्या सभेत एलईडी फिशींग संदर्भात जो महत्वपूर्ण ठराव झाला आहे. त्याकडे सरकार, नौदल, तट रक्षक दल, मत्स्य विभाग यांनी खरोखरच गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. भर समुद्रामध्ये काहीच दिवसांपूर्वी एलईडी फिशींग वरुन आक्षी आणि रेवस-बोडणी येथील पारंरपारीक मच्छीमार यांच्यामध्ये चांगलाच संघर्ष उफाळून आला होता. त्यावेळी हे प्रकरण नेमके कोणाच्या अधिकारात येते आणि याप्रकरणी कोणी कारवाई करायची अशा संभ्रमात तट रक्षक दल, पोलीस आणि मत्स्य विभागाला पडले होते.त्यामुळे १४५ किमी आत घडलेल्या सिनेस्टाईल थरार रोखण्यात कोणत्याच यंत्रणेला यश आले नव्हते. यामध्ये बोडणी येथील सहा जण जखमी झाले होते, तर भरत कोळी यांना जास्त मारहाण झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. संबंधीत यंत्रणांनी वेळीच एलईडी फिशींगवर कारवाई केली नाही तर, पारंपारीक मच्छीमार आणि एलईÞडी मासेमारी करणारे यांच्यामध्ये संर्घष होतच राहतील आणि याची मोठी किंमत सरकारला चुकती करावी लागण्याची शक्यता बोडणी येथील बैठकीतून दिसून येते.

टॅग्स :Raigadरायगडfishermanमच्छीमार