शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एलईडी आणि पारंपरिक मच्छीमार यांच्यात संघर्ष अटळ, दामोदर तांडेल यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 02:27 IST

एलईडी मार्फत मासेमारी करणाऱ्या बोटी समुद्रामध्ये दिसल्यास पारंपारीक मच्छीमारांबरोबर संघर्ष अटळ आहे. त्यामुळे नौदल, तट रक्षक दल आणि मत्स्य विभागाने यावर लक्ष ठेऊन कारवाई करावी.

अलिबाग : एलईडी मार्फत मासेमारी करणाऱ्या बोटी समुद्रामध्ये दिसल्यास पारंपारीक मच्छीमारांबरोबर संघर्ष अटळ आहे. त्यामुळे नौदल, तट रक्षक दल आणि मत्स्य विभागाने यावर लक्ष ठेऊन कारवाई करावी. याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल, अशी प्रमुख मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केली. अलिबाग तालुक्यातील बोडणी येथे रविवारी झालेल्या रायगड जिल्ह्यातील कोळी बांधवांच्या सभेत ते बोलत होते.अवकाळी पाऊस, ‘क्यार’ आणि ‘महा’ चक्रीवादळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मासेमारी करणाºया बोट मालकांना प्रत्येकी १ लाख रुपये तर खलाशांना प्रत्येकी २५ हजार सानुग्रह अनुदान द्यावे. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये सुरु असलेली एलईडी मासेमारी तातडीने बंद करावी अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास जेल भरो आंदोलन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे तांडेल यांनी सांगितले. सरकारने भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करुन लवकरच लगाम कसावी, समुद्रातील मच्छीचे साठे संपत आहेत. त्यामुळे भविष्यात कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ येणार आहे.कोळी बांधव शेतकºयांप्रमाणे आत्महत्या करणार नाही मात्र ‘क्यार ’ आणि ‘महा’ चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे फार मोठे आर्थिक नुकसान केले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने प्रत्येक बोटमालकाला डिझेलसाठी १ लाख रु पये सानुग्रह अनुदान द्यावे आणि खलाशांना २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी केली. सर्व पक्षीय लोकप्रतिनीधींनीना निवेदन देवून पाठपुरावा सुरू आहे. तसेच प्रधान सचिव अनुपकुमार यांनाही तातडीने निवेदन देऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.आमचे प्रश्न सरकारने न सोडविल्यास जेल भरो आंदोलन तसेच रायगड जिल्ह्यातील मच्छीमार संस्था या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देतील असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी कोळी बांधवांना संजय कोळी (जनरल सेक्र ेटरी रायगड), बनार्ड डिमेलो (कार्याध्यक्ष, भाईंदर), विश्वनाथ नाखवा (जिल्हाध्यक्ष, रायगड) धर्मा घारबट, रेवस-बोडणीचे चेअरमन विश्वास नाखवा आदींनी मार्गदर्शन केले.होणारे संघर्ष टाळण्याचा प्रयत्नबोडणी येथे झालेल्या मच्छीमार बांधवांच्या सभेत एलईडी फिशींग संदर्भात जो महत्वपूर्ण ठराव झाला आहे. त्याकडे सरकार, नौदल, तट रक्षक दल, मत्स्य विभाग यांनी खरोखरच गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. भर समुद्रामध्ये काहीच दिवसांपूर्वी एलईडी फिशींग वरुन आक्षी आणि रेवस-बोडणी येथील पारंरपारीक मच्छीमार यांच्यामध्ये चांगलाच संघर्ष उफाळून आला होता. त्यावेळी हे प्रकरण नेमके कोणाच्या अधिकारात येते आणि याप्रकरणी कोणी कारवाई करायची अशा संभ्रमात तट रक्षक दल, पोलीस आणि मत्स्य विभागाला पडले होते.त्यामुळे १४५ किमी आत घडलेल्या सिनेस्टाईल थरार रोखण्यात कोणत्याच यंत्रणेला यश आले नव्हते. यामध्ये बोडणी येथील सहा जण जखमी झाले होते, तर भरत कोळी यांना जास्त मारहाण झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. संबंधीत यंत्रणांनी वेळीच एलईडी फिशींगवर कारवाई केली नाही तर, पारंपारीक मच्छीमार आणि एलईÞडी मासेमारी करणारे यांच्यामध्ये संर्घष होतच राहतील आणि याची मोठी किंमत सरकारला चुकती करावी लागण्याची शक्यता बोडणी येथील बैठकीतून दिसून येते.

टॅग्स :Raigadरायगडfishermanमच्छीमार