शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

तेलंगवाडीची विहीर बांधून पूर्ण

By admin | Updated: June 24, 2016 03:43 IST

तालुक्यातील ओलमण ग्रामपंचायतीमधील तेलंगवाडीच्या आदिवासी ग्रामस्थांची पाणी डोक्यावर वाहून नेण्याची धडपड थांबली आहे. आदिवासी उपयोजनेच्या निधीमधून

कर्जत : तालुक्यातील ओलमण ग्रामपंचायतीमधील तेलंगवाडीच्या आदिवासी ग्रामस्थांची पाणी डोक्यावर वाहून नेण्याची धडपड थांबली आहे. आदिवासी उपयोजनेच्या निधीमधून तेलंगवाडीच्या ग्रामस्थ यांच्यासाठी असलेली जुनी विहीर तोडून तेथे नवीन विहीर बांधण्याचे काम आदिवासी उपयोजनेने पूर्ण केले आहे. तेलंगवाडीमधील महिलांच्या डोक्यावरील हंडे उतरविण्यासाठी नळपाणी योजना जिल्हा प्रशासनाने राबविण्याची गरज आहे.तेलंगवाडी ही आदिवासीवाडी एका टेकडीवर वसलेली आहे. वाडीमधील रहिवाशांंना पिण्याचे पाणी आणण्यासाठी टेकडी उतरून खाली पायथ्याशी असलेल्या विहिरीवर यावे लागते. ओलमण येथील ग्रामस्थ मालोजी पादिर आणि रामचंद्र पादिर यांनी ३० वर्षांपूर्वी आपल्या जमिनीमध्ये विहीर खोदण्यास परवानगी दिली होती. त्यावेळी तेथे बांधलेली विहीर मोडकळीस आली होती आणि लहान आकाराच्या या विहिरीचे संरक्षक कठडे तुटून गेले होते. त्याचप्रमाणे विहीर बांधल्यापासून गाळ काढण्यात आला नसल्याने विहिरीमध्ये पाण्याचा साठा असून देखील त्याचा काही फायदा होत नव्हता. कारण विहिरीतील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल पाणीपुरवठा विभागाने दिल्याने उन्हाळ्यात या तेलंग वाडीमधील आदिवासी महिलांची पाण्यासाठी धावपळ सुरु असायची. यामुळे आदिवासी उपयोजनेमधून तेलंगवाडीच्या विहिरींची दुरु स्ती व्हावी यासाठी या प्रभागाचे जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नानंतर तेलंगवाडीसाठी नवीन विहीर मंजूर झाली. नव्याने जुन्या विहिरीच्या ठिकाणी मोठी विहीर बांधताना ती अधिक खोल करुन ३० फूट व्यास असलेली नवीन विहीर बांधण्यात आली असून विहिरीची खोली अधिक वाढविल्यामुळे आता तेलंगवाडीच्या आदिवासी लोकांची पाण्याची समस्या कायमची संपली आहे. पाण्याचा भरपूर साठा तेथे तयार झाला असून आता त्या वाडीमधील महिलांच्या डोक्यावरील हंडे हातात आणण्यासाठी नव्याने पावले उचलण्याची गरज आहे.