शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

जिल्ह्यातील २५ हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:48 IST

बळीराजा सुखावला : पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना आला वेग

अलिबाग : गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या विविध भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा कमालीचा सुखावला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १५ जूननंतर बरसणारा आधीच बरसल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाच्या कामांना सुरुवात केली आहे. जिल्ह्यात एक लाख चार हजार भाताचे क्षेत्र आहे. त्यातील १० टक्के क्षेत्रावरच भाताचे पीक घेतले जाते. त्यानुसार २५ हेक्टर क्षेत्रावर भाताच्या पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. पावसाने दिलासादायक सुरुवात केल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पावसाने हजेरी लावल्याने त्यांनीही तातडीने भात पेरणीच्या कामांना सुरुवात केल्याने शेतावर शेतकरी आणि शेतमजूर यांची एकच लगबग सुरू असल्याचे दिसून येते. एप्रिल-मे महिन्याच्या कालावधीत शेतीच्या मशागतीची कामे शेतकऱ्यांनी आधीच उरकून घेतल्याने पाऊस पडल्यानंतर पेरणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने औद्योगिकीकरण झाल्याने तसेच नव्याने होत असलेल्या विकासकामांमुळे शेतीचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत आहे. त्याचप्रमाणे शेती करताना लागणारे बियाणे, शेतीची अवजारे, शेतमजुरांच्या मजुरीचे वाढते दर शेती करणाºया शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पावसाने पाठ फिरवली अथवा मोठे वादळ झाले तर शेतीचे आणि पर्यायाने शेतकºयांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होेते. त्यामुळे शेतीचा व्यवसाय हा आतबट्ट्याचा होत असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. शेत विम्याच्या अटींमुळे शेतकरी विमा काढायलाही तयार होत नसल्याने त्याचाही फायदा त्यांना घेता येत नाही. असे असताना सुद्धा रायगडातील शेतकरी जिद्दीने शेती करतात.सध्या शेतांमध्ये भात पिकाची पेरणी करण्याच्या कामांमध्ये शेतकरी व्यस्त असल्याचे चित्र आहे.१० टक्के क्षेत्रावरच भाताचे पीक१जिल्ह्यामध्ये एक लाख चार हजार हेक्टर भात पिकाचे क्षेत्र आहे. त्यातील फक्त १० टक्के क्षेत्रावरच भाताचे पीक घेतले जाते.२गेल्या वर्षी ४० क्विंटल भाताचे उत्पादन घेण्यात आले होते. यावेळीही समाधानकारक पाऊस झाल्यास भाताचे उत्पादन समाधानकारक होईल, असा विश्वास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने व्यक्त केला.सेंद्रिय खताचा वापरच्सध्या शेतामध्ये विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केला जातो. त्यामुळे आरोग्यास ते हानिकारक असते. यावर उपाय म्हणून सेंद्रिय खतांवर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे येथील शेतकरी भाताची विक्री करत नाहीत. स्वत:साठी ते भाताचा वापर करतात. त्यामुळे त्यांना बाजारातून तो विकत घ्यावा लागत नाही. आमच्या शेतामध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर कसा करता येईल याकडे विशेष लक्ष दिले जाते, असे येथील महिला शेतकरी नीता सोडवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

टॅग्स :RaigadरायगडalibaugअलिबागFarmerशेतकरी