शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २५ हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:48 IST

बळीराजा सुखावला : पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना आला वेग

अलिबाग : गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या विविध भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा कमालीचा सुखावला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १५ जूननंतर बरसणारा आधीच बरसल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाच्या कामांना सुरुवात केली आहे. जिल्ह्यात एक लाख चार हजार भाताचे क्षेत्र आहे. त्यातील १० टक्के क्षेत्रावरच भाताचे पीक घेतले जाते. त्यानुसार २५ हेक्टर क्षेत्रावर भाताच्या पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. पावसाने दिलासादायक सुरुवात केल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पावसाने हजेरी लावल्याने त्यांनीही तातडीने भात पेरणीच्या कामांना सुरुवात केल्याने शेतावर शेतकरी आणि शेतमजूर यांची एकच लगबग सुरू असल्याचे दिसून येते. एप्रिल-मे महिन्याच्या कालावधीत शेतीच्या मशागतीची कामे शेतकऱ्यांनी आधीच उरकून घेतल्याने पाऊस पडल्यानंतर पेरणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने औद्योगिकीकरण झाल्याने तसेच नव्याने होत असलेल्या विकासकामांमुळे शेतीचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत आहे. त्याचप्रमाणे शेती करताना लागणारे बियाणे, शेतीची अवजारे, शेतमजुरांच्या मजुरीचे वाढते दर शेती करणाºया शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पावसाने पाठ फिरवली अथवा मोठे वादळ झाले तर शेतीचे आणि पर्यायाने शेतकºयांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होेते. त्यामुळे शेतीचा व्यवसाय हा आतबट्ट्याचा होत असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. शेत विम्याच्या अटींमुळे शेतकरी विमा काढायलाही तयार होत नसल्याने त्याचाही फायदा त्यांना घेता येत नाही. असे असताना सुद्धा रायगडातील शेतकरी जिद्दीने शेती करतात.सध्या शेतांमध्ये भात पिकाची पेरणी करण्याच्या कामांमध्ये शेतकरी व्यस्त असल्याचे चित्र आहे.१० टक्के क्षेत्रावरच भाताचे पीक१जिल्ह्यामध्ये एक लाख चार हजार हेक्टर भात पिकाचे क्षेत्र आहे. त्यातील फक्त १० टक्के क्षेत्रावरच भाताचे पीक घेतले जाते.२गेल्या वर्षी ४० क्विंटल भाताचे उत्पादन घेण्यात आले होते. यावेळीही समाधानकारक पाऊस झाल्यास भाताचे उत्पादन समाधानकारक होईल, असा विश्वास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने व्यक्त केला.सेंद्रिय खताचा वापरच्सध्या शेतामध्ये विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केला जातो. त्यामुळे आरोग्यास ते हानिकारक असते. यावर उपाय म्हणून सेंद्रिय खतांवर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे येथील शेतकरी भाताची विक्री करत नाहीत. स्वत:साठी ते भाताचा वापर करतात. त्यामुळे त्यांना बाजारातून तो विकत घ्यावा लागत नाही. आमच्या शेतामध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर कसा करता येईल याकडे विशेष लक्ष दिले जाते, असे येथील महिला शेतकरी नीता सोडवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

टॅग्स :RaigadरायगडalibaugअलिबागFarmerशेतकरी