शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सारळ-घोळ धरण पूर्ण करा, अनंत पाटील यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 06:37 IST

रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांत डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागाचा प्रामुख्याने समावेश आहे. यावर मात करण्यासाठी याच विभागात प्रस्तावित असलेले सारळ-घोळ धरण सरकारने लवकरात लवकर पूर्ण केल्यास

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांत डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागाचा प्रामुख्याने समावेश आहे. यावर मात करण्यासाठी याच विभागातप्रस्तावित असलेले सारळ-घोळ धरण सरकारने लवकरात लवकर पूर्ण केल्यास, तब्बल ३५ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. जिल्हा प्रशासनासह सरकारचेया मागणीकडे लक्ष वेधण्यासाठीसारळचे माजी सरपंच अनंतपाटील यांनी एक दिवसाचेलाक्षणिक उपोषण केले. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाºयांनादिले.अलिबाग हे रायगड जिल्ह्याच्या राजधानीचे शहर म्हणून ओळखले जाते. मुंबईपासून जवळ असणाºया अलिबाग तालुक्याचा अद्याप म्हणावा तसा विकास झालेला नाही. रस्ते, वीज, पाणी हे मूलभूत प्रश्न आजही तालुक्याच्या कानाकोपºयात उभे आहेत. जिल्ह्याच्या विकास आराखड्यामध्ये कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. केंद्र सरकारसह राज्य सराकारमार्फतही विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दरवर्षी खर्च केला जातो; परंतु तेथील प्रश्न अजूनही कमी होताना दिसत नाहीत. किंबहुना अधिक प्रश्न हे जैसे थे असेच आहेत. त्यामध्ये पाणीप्रश्नाचा प्रामुख्याने समावेश आहे.केंद्र सरकारने राष्ट्रीय पेयजल योजना, त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवरील नळ पाणीपुरवठा योजना अशा विविध योजना आखल्या आहेत. त्यासाठीही सरकारने कोट्यवधी रुपये देऊ केलेले आहेत; परंतु पाणीप्रश्न अद्यापही सुटलेला नाही. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पाणीप्रश्न आ वासून उभा राहतो. यावर तोडगा काढण्यासाठी सारळ-घोळ धरणाची संकल्पना सुमारे ३० वर्षांपूर्वी पुढे आली होती. मात्र, या धरणाला म्हणावे तसे मूर्त रूप देण्यास स्थानिक आमदार, खासदार आणि जिल्हा प्रशासनाला यश आलेले नाही.तालुक्यातील खारेपाट विभागामध्ये पाण्याचा प्रश्न आता हळूहळू पेटू लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रस्तावित सारळ-घोळ धरणाची आठवण झाली आहे. हे धरण अस्तित्वात आल्यास सारळ, म्हात्रोळी, दत्तपाडा, फुफादेवीचा पाडा, सारळ आदिवासीवाडी, म्हात्रोळी आदिवासीवाडी, डावली रांजणखार, बागदांडे, रेवस, बेलपाडा, कावाडे, बोडणी, मिळकतखार, विर्तसारळ, कोप्रोली, मांडवा, धोकवडे यासह अन्य मिळून सुमारे ३५ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.या धरणासाठी जास्तीत जास्त सरकारी जमिनीचाच वापर होणार असल्याने विरोधाचे कारणच राहत नाही.तसेच ग्रामस्थांना पिण्यासह शेतीसाठीही मुबलक पाणी मिळणार असल्याने या धरणाला कोणाचाच विरोध राहिलेला नाही आणि राहणारही नाही, असे उपोषणकर्ते अनंत पाटील यांनी सांगितले. धरणाच्या या प्रश्नाकडे प्रशासनासह सरकारचे लक्ष वेधता यावे, यासाठी एक दिवसीय उपोषण केल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.धरणासाठी निर्सगनिर्मित भौगोलिक रचनाच्सारळ-घोळ धरण बांधण्यासाठी दोन्ही बाजूंना मोठमोठे डोंगर आहेत. त्या दोन्ही डोंगरांच्या मध्ये भली मोठी भिंत म्हणजेच धरण उभारल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा धरणात होऊ शकतो. कारण अलिबाग तालुक्यामध्येही मोठ्या संख्येने पाऊस पडतो.च्मात्र, कोणतीही उपाययोजना नसल्याने ते पावसाचे पाणी डोंगर-दºयातून समुद्राला जाऊन मिळते. तेच पाणी अडवल्यास सुमारे ३५ गावांची तहान भागवता येणार आहे. त्यामुळे प्रशासन, सरकार आणि लोकप्रतिनिधी यांनी याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

टॅग्स :Raigadरायगड