शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सारळ-घोळ धरण पूर्ण करा, अनंत पाटील यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 06:37 IST

रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांत डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागाचा प्रामुख्याने समावेश आहे. यावर मात करण्यासाठी याच विभागात प्रस्तावित असलेले सारळ-घोळ धरण सरकारने लवकरात लवकर पूर्ण केल्यास

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांत डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागाचा प्रामुख्याने समावेश आहे. यावर मात करण्यासाठी याच विभागातप्रस्तावित असलेले सारळ-घोळ धरण सरकारने लवकरात लवकर पूर्ण केल्यास, तब्बल ३५ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. जिल्हा प्रशासनासह सरकारचेया मागणीकडे लक्ष वेधण्यासाठीसारळचे माजी सरपंच अनंतपाटील यांनी एक दिवसाचेलाक्षणिक उपोषण केले. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाºयांनादिले.अलिबाग हे रायगड जिल्ह्याच्या राजधानीचे शहर म्हणून ओळखले जाते. मुंबईपासून जवळ असणाºया अलिबाग तालुक्याचा अद्याप म्हणावा तसा विकास झालेला नाही. रस्ते, वीज, पाणी हे मूलभूत प्रश्न आजही तालुक्याच्या कानाकोपºयात उभे आहेत. जिल्ह्याच्या विकास आराखड्यामध्ये कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. केंद्र सरकारसह राज्य सराकारमार्फतही विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दरवर्षी खर्च केला जातो; परंतु तेथील प्रश्न अजूनही कमी होताना दिसत नाहीत. किंबहुना अधिक प्रश्न हे जैसे थे असेच आहेत. त्यामध्ये पाणीप्रश्नाचा प्रामुख्याने समावेश आहे.केंद्र सरकारने राष्ट्रीय पेयजल योजना, त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवरील नळ पाणीपुरवठा योजना अशा विविध योजना आखल्या आहेत. त्यासाठीही सरकारने कोट्यवधी रुपये देऊ केलेले आहेत; परंतु पाणीप्रश्न अद्यापही सुटलेला नाही. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पाणीप्रश्न आ वासून उभा राहतो. यावर तोडगा काढण्यासाठी सारळ-घोळ धरणाची संकल्पना सुमारे ३० वर्षांपूर्वी पुढे आली होती. मात्र, या धरणाला म्हणावे तसे मूर्त रूप देण्यास स्थानिक आमदार, खासदार आणि जिल्हा प्रशासनाला यश आलेले नाही.तालुक्यातील खारेपाट विभागामध्ये पाण्याचा प्रश्न आता हळूहळू पेटू लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रस्तावित सारळ-घोळ धरणाची आठवण झाली आहे. हे धरण अस्तित्वात आल्यास सारळ, म्हात्रोळी, दत्तपाडा, फुफादेवीचा पाडा, सारळ आदिवासीवाडी, म्हात्रोळी आदिवासीवाडी, डावली रांजणखार, बागदांडे, रेवस, बेलपाडा, कावाडे, बोडणी, मिळकतखार, विर्तसारळ, कोप्रोली, मांडवा, धोकवडे यासह अन्य मिळून सुमारे ३५ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.या धरणासाठी जास्तीत जास्त सरकारी जमिनीचाच वापर होणार असल्याने विरोधाचे कारणच राहत नाही.तसेच ग्रामस्थांना पिण्यासह शेतीसाठीही मुबलक पाणी मिळणार असल्याने या धरणाला कोणाचाच विरोध राहिलेला नाही आणि राहणारही नाही, असे उपोषणकर्ते अनंत पाटील यांनी सांगितले. धरणाच्या या प्रश्नाकडे प्रशासनासह सरकारचे लक्ष वेधता यावे, यासाठी एक दिवसीय उपोषण केल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.धरणासाठी निर्सगनिर्मित भौगोलिक रचनाच्सारळ-घोळ धरण बांधण्यासाठी दोन्ही बाजूंना मोठमोठे डोंगर आहेत. त्या दोन्ही डोंगरांच्या मध्ये भली मोठी भिंत म्हणजेच धरण उभारल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा धरणात होऊ शकतो. कारण अलिबाग तालुक्यामध्येही मोठ्या संख्येने पाऊस पडतो.च्मात्र, कोणतीही उपाययोजना नसल्याने ते पावसाचे पाणी डोंगर-दºयातून समुद्राला जाऊन मिळते. तेच पाणी अडवल्यास सुमारे ३५ गावांची तहान भागवता येणार आहे. त्यामुळे प्रशासन, सरकार आणि लोकप्रतिनिधी यांनी याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

टॅग्स :Raigadरायगड