शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

पेण हरित रेल्वे स्थानकाची संकल्पना पूर्णत्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:47 IST

पर्यावरणपूरक स्थानक म्हणून नावारूपास : सुविधांमध्ये सौरऊर्जा पॅनल, पवनचक्की याद्वारे वीजनिर्मिती

पेण : कोकणातील रेल्वे स्थानकात इकोफ्रेंडली सुशोभीकरणावर भर देण्याचा मानस रेल्वे प्रशासनाचा आहे. त्यानुसार पर्यावरणाशी समतोल साधर्म्य राखणारे निसर्गसौंदर्य त्याचबरोबर इकोफ्रेंडली तंत्रज्ञानाचा वापर करून पेण रेल्वे स्थानक भविष्यात सुरेख असे पर्यावरणपूरक स्थानक म्हणून नावारूपास येत आहे.

पेण रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती स्थानक म्हणून उभे राहिले आहे. सध्या या मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झालेले आहे. यामध्ये पेण ते पनवेल या दुहेरी मार्गाची लांबी ३५.४६ किमी आहे. तर पेण-रोहा दुहेरी मार्ग ४० किमी लांब आहे. या मार्गावर पेण ते पनवेल असा दुहेरी मार्ग पूर्णपणे तयार झाला असून पेण-रोहा मार्गावरील पेण ते नागोठणे दुहेरी मार्गाचे काम पूर्ण झाले असून नागोठणे ते रोहा दुहेरी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या रेल्वे मार्गावर तासी १०५ किमी प्रतिवेगाने रेल्वे गाड्या धावत आहेत. या मार्गावरील पुलांची क्षमता २५ मेट्रिक टन एवढी आहे. पेण-पनवेल मार्गाचा प्रस्तावित खर्च २६०.९६ कोटी झालेला आहे. तर पेण- रोहा रेल्वे मार्गाचा खर्च ३०० कोटी पर्यंत आहे. २००६ साली या कामांना सुरुवात झाली होती. मार्च २०१५ मध्ये हे काम बहुतांश पूर्ण झालेले आहे.

या रेल्वे मार्गावर इलेक्ट्रॉनिक, इंटरलॉकिंग प्रणालीयुक्त सुविधा सर्व रेल्वे स्थानकांवर उपलब्ध आहे. यामुळे आता या मार्गावरील पेण रेल्वे स्थानकाला भविष्यात गर्दीचे मोठे स्वरूप येणार आहे. पेण स्थानकात पर्यावरणपूक सुविधांमध्ये सौरऊर्जा पॅनल व पवनचक्की याद्वारे वीज निर्माण करून त्यावर आधारित एलईडी लाइट्स, फॅन, वॉटर कुलर, यूटीएस, ग्लोसिंग बोर्ड्स, पोल लाइट्स अशा प्रकारे अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून पेण रेल्वे स्थानकाला झळाळी मिळालेली आहे. ही सर्व यंत्रणा सध्या स्थानकामध्ये उपलब्ध असून स्थानकाचे देखणे रूप भविष्यात अधिक कलात्मक करण्याकडे रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. त्यानुसार येत्या काळात पेण रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यात मोठी भर पडणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

प्रवाशांना लागणाऱ्या सर्व सुविधा स्थानकामध्ये उपलब्ध असून फक्त पार्र्किं ग व्यवस्थेमध्ये जागेची कमतरता भासत आहे. सध्या रेल्वे स्थानक परिसरात उपलब्ध असणारे वाहनतळ हे फक्त दुचाकी वाहनांपुरतेच सीमित आहेत. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देऊन या समस्या दूर कराव्यात, अशी रेल्वे प्रवाशांकडून मागणी करण्यात येत आहे.

पेणमधील या हरित रेल्वे स्थानकामुळे भविष्यात येथील लोकसंख्या वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.