शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

भ्रष्टाचाराविरोधात राज्यपालांकडे तक्रार; ग्रामपंचायत फंडातून मनमानी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 05:34 IST

तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत पाठपुरावाही करण्यात आला होता. मात्र, त्यावर अपेक्षित कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट या प्रकरणाची तक्रार महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे केली आहे.

अलिबाग : तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत पाठपुरावाही करण्यात आला होता. मात्र, त्यावर अपेक्षित कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट या प्रकरणाची तक्रार महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे केली आहे. ग्रामस्थांनी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.अलिबागपासून काही किलोमीटर अंतरावर रामराज ग्रामपंचायत आहेत. या गावात विकासकामे करताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी ग्रामसभेत बोलून दाखवली आहे. १५ आॅगस्ट २०१८ रोजी तहकूब झालेली ग्रामसभा २८ आॅगस्ट २०१८ रोजी दुपारी ११ वाजता बोलण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवण्यात आले नाही. ग्रामस्थांनी १४ व्या वित्त आयोगाबाबत माहिती मागितली असता सरपंच आणि ग्रामसेवकांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन माहिती देण्यास नकार दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.मागील तीन वर्षांतील १४ व्या वित्त आयोगाचा फंड, ग्रामपंचायत फंड खर्च करताना कोणत्याही प्रकारची निविदा न काढताच परस्पर सरपंच हे मनमानी पद्धतीने खर्च करतात. याबाबत विचारणा करण्यात आली असता, खर्चाचा ताळमेळ सांगण्यासही दुर्लक्ष करण्यात येते.ग्रामपंचायतींसाठी आवश्यक असणाºया वस्तूंची खरेदीही सरपंच आणि ग्रामसेवक स्वत:च्या मर्जीने करतात. त्यामुळे विकासकामांचा बट्ट्याबोळ झाला आहे. ग्रामपंचायतीमार्फत गोळा करण्यात येणारा कर अन्य मार्गाने मिळणारे उत्पन्न त्याबाबतचा जमाखर्च ग्रामसभेत दाखवण्यातही ग्रामसेवक असमर्थ ठरले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. काही घरकुलांवर दोन वेळा बिले काढण्यात आली तर काही घरकूल उभारण्यातच आली नसल्याचे सभेत उघड करण्यात आले.गुरचरण जागेमध्ये बांधकामांना परवानग्या देतानाही गैरप्रकार झाल्याची शक्यता ग्रामस्थांनी बोलून दाखवली.ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराबाबत तालुकास्तरापासून जिल्हास्तरावर तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.- रामराज ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची सीबीआय, सीआयडी चौकशीची मागणी करण्यात आल्याचे ग्रामस्थ संदेश पालकर यांनी सांगितले. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आल्याने हा विषय ते ग्रामसभेच्या इतिवृत्तात नमूद करणार नाहीत. त्यामुळे चौकशी झालीच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.रामराज ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालेला नाही. रीतसर कामे करण्यात येत आहेत. सर्वांना विश्वासात घेऊनच कामे केली जात आहेत.- अर्चना पालकर, सरपंच, रामराज ग्रामपंचायत

टॅग्स :Raigadरायगड