शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

भ्रष्टाचाराविरोधात राज्यपालांकडे तक्रार; ग्रामपंचायत फंडातून मनमानी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 05:34 IST

तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत पाठपुरावाही करण्यात आला होता. मात्र, त्यावर अपेक्षित कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट या प्रकरणाची तक्रार महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे केली आहे.

अलिबाग : तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत पाठपुरावाही करण्यात आला होता. मात्र, त्यावर अपेक्षित कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट या प्रकरणाची तक्रार महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे केली आहे. ग्रामस्थांनी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.अलिबागपासून काही किलोमीटर अंतरावर रामराज ग्रामपंचायत आहेत. या गावात विकासकामे करताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी ग्रामसभेत बोलून दाखवली आहे. १५ आॅगस्ट २०१८ रोजी तहकूब झालेली ग्रामसभा २८ आॅगस्ट २०१८ रोजी दुपारी ११ वाजता बोलण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवण्यात आले नाही. ग्रामस्थांनी १४ व्या वित्त आयोगाबाबत माहिती मागितली असता सरपंच आणि ग्रामसेवकांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन माहिती देण्यास नकार दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.मागील तीन वर्षांतील १४ व्या वित्त आयोगाचा फंड, ग्रामपंचायत फंड खर्च करताना कोणत्याही प्रकारची निविदा न काढताच परस्पर सरपंच हे मनमानी पद्धतीने खर्च करतात. याबाबत विचारणा करण्यात आली असता, खर्चाचा ताळमेळ सांगण्यासही दुर्लक्ष करण्यात येते.ग्रामपंचायतींसाठी आवश्यक असणाºया वस्तूंची खरेदीही सरपंच आणि ग्रामसेवक स्वत:च्या मर्जीने करतात. त्यामुळे विकासकामांचा बट्ट्याबोळ झाला आहे. ग्रामपंचायतीमार्फत गोळा करण्यात येणारा कर अन्य मार्गाने मिळणारे उत्पन्न त्याबाबतचा जमाखर्च ग्रामसभेत दाखवण्यातही ग्रामसेवक असमर्थ ठरले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. काही घरकुलांवर दोन वेळा बिले काढण्यात आली तर काही घरकूल उभारण्यातच आली नसल्याचे सभेत उघड करण्यात आले.गुरचरण जागेमध्ये बांधकामांना परवानग्या देतानाही गैरप्रकार झाल्याची शक्यता ग्रामस्थांनी बोलून दाखवली.ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराबाबत तालुकास्तरापासून जिल्हास्तरावर तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.- रामराज ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची सीबीआय, सीआयडी चौकशीची मागणी करण्यात आल्याचे ग्रामस्थ संदेश पालकर यांनी सांगितले. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आल्याने हा विषय ते ग्रामसभेच्या इतिवृत्तात नमूद करणार नाहीत. त्यामुळे चौकशी झालीच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.रामराज ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालेला नाही. रीतसर कामे करण्यात येत आहेत. सर्वांना विश्वासात घेऊनच कामे केली जात आहेत.- अर्चना पालकर, सरपंच, रामराज ग्रामपंचायत

टॅग्स :Raigadरायगड