शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

भ्रष्टाचाराविरोधात राज्यपालांकडे तक्रार; ग्रामपंचायत फंडातून मनमानी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 05:34 IST

तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत पाठपुरावाही करण्यात आला होता. मात्र, त्यावर अपेक्षित कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट या प्रकरणाची तक्रार महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे केली आहे.

अलिबाग : तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत पाठपुरावाही करण्यात आला होता. मात्र, त्यावर अपेक्षित कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट या प्रकरणाची तक्रार महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे केली आहे. ग्रामस्थांनी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.अलिबागपासून काही किलोमीटर अंतरावर रामराज ग्रामपंचायत आहेत. या गावात विकासकामे करताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी ग्रामसभेत बोलून दाखवली आहे. १५ आॅगस्ट २०१८ रोजी तहकूब झालेली ग्रामसभा २८ आॅगस्ट २०१८ रोजी दुपारी ११ वाजता बोलण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवण्यात आले नाही. ग्रामस्थांनी १४ व्या वित्त आयोगाबाबत माहिती मागितली असता सरपंच आणि ग्रामसेवकांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन माहिती देण्यास नकार दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.मागील तीन वर्षांतील १४ व्या वित्त आयोगाचा फंड, ग्रामपंचायत फंड खर्च करताना कोणत्याही प्रकारची निविदा न काढताच परस्पर सरपंच हे मनमानी पद्धतीने खर्च करतात. याबाबत विचारणा करण्यात आली असता, खर्चाचा ताळमेळ सांगण्यासही दुर्लक्ष करण्यात येते.ग्रामपंचायतींसाठी आवश्यक असणाºया वस्तूंची खरेदीही सरपंच आणि ग्रामसेवक स्वत:च्या मर्जीने करतात. त्यामुळे विकासकामांचा बट्ट्याबोळ झाला आहे. ग्रामपंचायतीमार्फत गोळा करण्यात येणारा कर अन्य मार्गाने मिळणारे उत्पन्न त्याबाबतचा जमाखर्च ग्रामसभेत दाखवण्यातही ग्रामसेवक असमर्थ ठरले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. काही घरकुलांवर दोन वेळा बिले काढण्यात आली तर काही घरकूल उभारण्यातच आली नसल्याचे सभेत उघड करण्यात आले.गुरचरण जागेमध्ये बांधकामांना परवानग्या देतानाही गैरप्रकार झाल्याची शक्यता ग्रामस्थांनी बोलून दाखवली.ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराबाबत तालुकास्तरापासून जिल्हास्तरावर तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.- रामराज ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची सीबीआय, सीआयडी चौकशीची मागणी करण्यात आल्याचे ग्रामस्थ संदेश पालकर यांनी सांगितले. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आल्याने हा विषय ते ग्रामसभेच्या इतिवृत्तात नमूद करणार नाहीत. त्यामुळे चौकशी झालीच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.रामराज ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालेला नाही. रीतसर कामे करण्यात येत आहेत. सर्वांना विश्वासात घेऊनच कामे केली जात आहेत.- अर्चना पालकर, सरपंच, रामराज ग्रामपंचायत

टॅग्स :Raigadरायगड