शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

भरतीच्या पाण्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या संरक्षक बांधबंदिस्तींच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 17:59 IST

उधाणाच्या पाण्याने बांधांनाच गेलेल्या खांडीमुळे समुद्राचे खारे पाणी भातशेतीत शिरल्याने शेकडो एकर शेतजमीन नापीक झाली आहे.

मधुकर ठाकूर 

उरण : शेतकऱ्यांच्या तक्रारींनंतर खारलॅण्ड विभागाने खोपटा विभागाच्या समुद्र किनाऱ्यावरील उध्वस्त झालेली संरक्षक बांधबंदिस्तीं तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती खारलॅण्ड विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश सावंत यांनी दिली.

खोपटा हद्दीतील समुद्र किनारी असलेल्या अनेक बांधबंदिस्ती समुद्राच्या उधाणाच्या भरतीच्या पाण्याने उध्वस्त झाली आहेत. उधाणाच्या पाण्याने बांधांनाच गेलेल्या खांडीमुळे समुद्राचे खारे पाणी भातशेतीत शिरल्याने शेकडो एकर शेतजमीन नापीक झाली आहे. त्यामुळे शेकडो एकर भातशेती ओस पडत चालली होती.शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या भातशेतीचे नुकसान टाळण्यासाठी खोपटा विभागाच्या समुद्र किनाऱ्यावरील उध्वस्त झालेली संरक्षक बांधबंदिस्तींची दुरुस्ती करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली होती.

शेतकऱ्यांच्या तक्रारींनंतर खारलॅण्ड विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षपणे समुद्राच्या उधाणाच्या भरतीच्या पाण्यामुळे उध्वस्त झालेल्या संरक्षक बांधबंदिस्तींची पाहणी केली होती.समुद्राचे खारे पाणी शेतीत जाऊ नये यासाठी खोपटा येथील समुद्र किनाऱ्यावरील काही बांधबंदिस्तींच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती खारलॅण्ड विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश सावंत यांनी दिली.

टॅग्स :uran-acउरण