शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

भरतीच्या पाण्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या संरक्षक बांधबंदिस्तींच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 17:59 IST

उधाणाच्या पाण्याने बांधांनाच गेलेल्या खांडीमुळे समुद्राचे खारे पाणी भातशेतीत शिरल्याने शेकडो एकर शेतजमीन नापीक झाली आहे.

मधुकर ठाकूर 

उरण : शेतकऱ्यांच्या तक्रारींनंतर खारलॅण्ड विभागाने खोपटा विभागाच्या समुद्र किनाऱ्यावरील उध्वस्त झालेली संरक्षक बांधबंदिस्तीं तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती खारलॅण्ड विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश सावंत यांनी दिली.

खोपटा हद्दीतील समुद्र किनारी असलेल्या अनेक बांधबंदिस्ती समुद्राच्या उधाणाच्या भरतीच्या पाण्याने उध्वस्त झाली आहेत. उधाणाच्या पाण्याने बांधांनाच गेलेल्या खांडीमुळे समुद्राचे खारे पाणी भातशेतीत शिरल्याने शेकडो एकर शेतजमीन नापीक झाली आहे. त्यामुळे शेकडो एकर भातशेती ओस पडत चालली होती.शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या भातशेतीचे नुकसान टाळण्यासाठी खोपटा विभागाच्या समुद्र किनाऱ्यावरील उध्वस्त झालेली संरक्षक बांधबंदिस्तींची दुरुस्ती करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली होती.

शेतकऱ्यांच्या तक्रारींनंतर खारलॅण्ड विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षपणे समुद्राच्या उधाणाच्या भरतीच्या पाण्यामुळे उध्वस्त झालेल्या संरक्षक बांधबंदिस्तींची पाहणी केली होती.समुद्राचे खारे पाणी शेतीत जाऊ नये यासाठी खोपटा येथील समुद्र किनाऱ्यावरील काही बांधबंदिस्तींच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती खारलॅण्ड विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश सावंत यांनी दिली.

टॅग्स :uran-acउरण