शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

किनारपट्टीवर प्रतिबंधात्मक आदेश

By admin | Updated: March 12, 2017 02:36 IST

होळी आणि धूलीवंदन या सणात रंगाचा बेरंग होऊ नये, याकरिता ११ ते १४ मार्च या चार दिवसांच्या कालावधीत रायगडच्या किनारपट्टीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

- जयंत धुळप, अलिबागहोळी आणि धूलीवंदन या सणात रंगाचा बेरंग होऊ नये, याकरिता ११ ते १४ मार्च या चार दिवसांच्या कालावधीत रायगडच्या किनारपट्टीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी रायगड पोलीस करीत आहेत. किनारीपट्टीवर अतिवेगाने गाड्या चालविणे आणि मद्यपान करून समुद्राच्या पाण्यात प्रवेश करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती रायगडचे अप्पर जिल्हादंडाधिकारी किरण पाणबुडे यांनी दिली. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. होळी आणि धूलीवंदन सण व त्यास लागून येणाऱ्या सुट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक रायगड जिल्ह्याच्या १२२ कि.मी. अंतराच्या किनारपट्टीत येतात. भरती-ओहोटीबाबत स्थानिक नागरिक देत असलेल्या सूचना नाकारून, त्यांतील काही पर्यटक समुद्रात पोहायला जातात. मद्यप्राशनकरून समुद्रात पोहायला जाणाऱ्या पर्यटकांचे प्रमाणही गेल्या काही वर्षांत वाढले आहे. यातून पर्यटक समुद्रात बुडण्यासारख्या अनेकघटनाही घडल्या आहेत. यासर्व गंभीर परिस्थितीला आळा घालण्याकरिता, तसेच सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, याकरिता हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.सागरीकिनारा सुरक्षेस प्राधान्यपर्यटनासाठी येणारे पर्यटक हे समुद्रकिनाऱ्यावर अतिवेगाने वाहने चालवितात.त्यामुळे इतर पर्यटकांना समुद्रकिनाऱ्याचा आस्वाद घेण्यास अडथळा निर्माण होतो. पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर वाहने पार्किंग केल्याने सागरीकिनारा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.तसेच सणासुदीच्या कालावधीत शांततेचा व निर्भय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीने प्रतिबंधक कारवाईचा एक भाग, हे पाऊल टाकण्यात आले आहे. दरम्यान, समुद्रकिनाऱ्याच्या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्ची वाहने व किनाऱ्याच्या विकासकामासंदर्भातील बांधकामासाठीची वाहने वगळून अन्य वाहनांना समुद्रकिनारपट्टीवर अतिवेगाने चालविणे, समुद्रकिनाऱ्यावर वाहनांसाठी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त अडथळा निर्माण होईल, अशा ठिकाणी वाहने पार्किंग करणे यास, या आदेशान्वये प्रतिबंध करण्यात आला आहे.गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अबाधित राखण्याकरिता पोलीस सज्ज1जिल्ह्यात यंदा २ हजार ७२७ सार्वजनिक, तर १ हजार २६० खासगी अशा एकूण ३ हजार ९८७ ठिकाणी होळीचा सण साजरा करण्यात येणार आहे. कोकण किनारपट्टीतील या अत्यंत महत्त्वाच्या अशा सणाकरिता चाकरमानी मुंबई-पुण्यातून शनिवारी सकाळीच आपापल्या गावी पोहोचू लागले आहेत. गाव मंडळांच्या माध्यमातून सार्वजनिक होलीकोत्सव आणि ग्रामदेवतांच्या पालख्यांची तयारीही पूर्ण झाली आहे. 2होळÞीच्या सणाकरिता कोकणात चाकरमान्यांना जाण्याकरिता मुंबईतून राज्य परिवहन मंडळाने विशेष बसेसचे तर कोकण रेल्वेने विशेष गाडीचे नियोजन केले आहे. गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाढणाऱ्या गाड्यांच्या संख्येचा विचार करून, महामार्गावर कोठेही वाहतूककोंडीची समस्या उद्भवू नये, याकरिता रायगड जिल्ह्यात पळस्पे(पनवेल) ते कशेडी(पोलादपूर) दरम्यान, रायगड पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.धूलीवंदनाच्या दिवशी अलिबाग समुद्रकिनाऱ्यांवर बैलगाडी शर्यती नाहीतधूलीवंदनाच्या दिवशी अलिबाग समुद्रकिनाऱ्यांवर बैलगाडी शर्यती आयोजित करण्याची गेल्या ६० वर्षांपासूनची परंपरा आहे. मात्र, बैलगाडी शर्यतींवर बंदी आणावी, याकरिता एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्याचा अंतिम निकाल लागलेला नाही. तोपर्यंत बैलगाडी शर्यतींना बंदी राहणार असल्याने यंदा सोमवारी धूलीवंदनाच्या दिवशी अलिबाग समुद्रकिनारी बैलगाडी शर्यतींचे आयोजन करता येणार नाही, अशी माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे.