शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

ममदापूर ग्रामपंचायतीचे डम्पिंग ग्राउंड बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:24 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : उल्हास नदीकाठावर कचऱ्याचा ढीग

नेरळ : कर्जत तालुक्यातून वाहत जाणाºया उल्हास नदीतून अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दिवसेंदिवस उल्हास नदीचे पाणी दूषित होत आहे, अनेक गावे शहराचे सांडपाणी, जलपर्णी तर उल्हास नदीत टाकला जाणारा कचरा यामुळे परिसरातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. ममदापूर ग्रामपंचायतीने देखील ग्रामपंचायत हद्दीत जमा झालेला कचरा उल्हास नदीच्या काठावर टाकण्यास सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यात हा कचरा नदीत जाण्याची शक्यता असल्याने हे डम्पिंग ग्राउंड बंद करावे यासाठी स्थानिकांनी सह्यांची मोहीम राबविली असून हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.

ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत जमा झालेला कचरा येथील कर्मचारी गोळा करून घंटागाडीमधून उल्हास नदीच्याकाठी टाकत आहेत. उल्हास नदीच्या पाण्यावर तालुक्यातील शेलू, वांगणी, बदलापूर येथे अनेक पाणी योजना अवलंबून आहेत. तरी सुद्धा अनेक शहरातील सांडपाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस उल्हास नदीत जलपर्णी निर्माण होते आणि परिसरातील नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे.

ममदापूर ग्रामपंचायतीने देखील डम्पिंग ग्राउंड पेशवाई रस्त्यावर नदीच्या काठावर सुरू केले आहे. यामुळे पावसाळ्यात हा कचरा पाण्याच्या प्रवाहात नदीत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे डम्पिंग ग्राउंड तत्काळ हलविण्यात यावे, यासाठी ग्रामस्थ राम हिसाळगे व अन्य ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम देखील राबविण्यात आली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी रायगड, नेरळ ग्रामपंचायत, नेरळ पोलीस स्टेशन यांना दिले आहे. त्यामुळे हे डम्पिंग ग्राउंड लवकरात लवकर हलविण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे.