शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

आमदारांचा दावा खोटा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा दुजोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:59 IST

अलिबाग-वडखळ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत आता एक-एक महत्त्वपूर्ण खुलासे पुढे येत आहेत. हा प्रकल्प करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयासोबत स्थानिक आमदारांनी पुढाकार घेतल्याचा केलेला दावा खोटा ठरला आहे

अलिबाग : अलिबाग-वडखळ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत आता एक-एक महत्त्वपूर्ण खुलासे पुढे येत आहेत. हा प्रकल्प करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयासोबत स्थानिक आमदारांनी पुढाकार घेतल्याचा केलेला दावा खोटा ठरला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयानेच एका पत्राद्वारे मध्यंतरी हा खुलासा केला असताना आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देखील त्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ केंद्र सरकारच्याच योजनेतून साकारण्यात येत असल्याचे समोर आले आहे.अलिबाग हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण आहे. त्याचप्रमाणे पर्यटकांचे पर्यटनाचे आवडीचे ठिकाण देखील आहे. अलिबागमधूनच पुढे मुरु ड तालुक्यातील पर्यटनस्थळांकडे जावे लागते. या ठिकाणी देशी-परदेशी पर्यटकांचा नेहमीच राबता असतो. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांच्या रु ंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मुंबई-गोवा या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरु आहे. वडखळपर्यंत या मार्गाचा उपयोग अलिबागसह मुरु ड तालुक्याला होतो. वडखळ-अलिबाग हा दुपदरी असल्याने पुन्हा वाहतूककोंडीचा प्रश्न उभा राहतो. यावर उपाययोजना म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने अलिबाग-वडखळ या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देखील बहाल केला आहे. या मार्गाची ओळख राष्ट्रीय महामार्ग १६६ ए अशी आहे. हा महामार्ग झाल्याने केवळ १२ मिनिटांमध्ये अलिबागहून वडखळला पोचता येणार आहे.अलिबाग आणि मुरु ड तालुक्याच्या विकासात गतिमानता आणणाºया या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी श्रेयवाद उफाळून आला होता. या प्रकल्पासाठी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच या मार्गाची मागणी गरजेची असल्याचे केंद्रीय मंत्रालयाला सांगितल्याचा दावा आमदार पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी एका पत्रकार परिषदेत केला होता. जिल्ह्याच्या विकासासाठी शेकाप योगदान देत असल्याचे चित्र या पत्रकार परिषदेतून त्यावेळी अधोरेखित केले होते.अलिबाग-वडखळ या राष्ट्रीय महामार्गासाठी आ.जयंत पाटील यांनी खरेच पुढाकार घेतला, अथवा पत्रव्यवहार केला आहे का ? याबाबत अलिबाग येथील आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांच्या मनात शंका उपस्थित झाली. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाबरोबर पत्रव्यवहार करून याची शहानिशा केली.त्यावेळी शेकापचे आमदार पाटील यांनी मागणी केल्याचे अथवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत या महामार्गासाठी बैठक झाली नसल्याचे केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने सावंत यांना लेखी कळवले होते. त्यातच आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नव्याने खुलासा करताना सावंत यांना पत्र देवून आमदार पाटील यांचे या रस्त्याबाबतचे पत्र किंवा त्यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झालेली बैठक याबाबत कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे कळविले आहे.