शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

उरण ओएनजीसी प्रकल्पाच्या वायुप्रदूषणाने नागरिक त्रस्त, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 20:33 IST

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पांमधुन मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर हवेत सोडण्यात येणाऱ्या वायुमुळे वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत.

मधुकर ठाकूर 

उरण : उरणच्या ओएनजीसी प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर हवेत सोडण्यात येणाऱ्या वायुमुळे वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या वाढत्या वायुप्रदूषणाचा परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून त्याच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. त्रस्त झालेल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असताना मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याने मंडळाच्या गळथान कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. 

उरण परिसरातील जेएनपीए,ओएनजीसी, बीपीसीएल,उरण-पनवेल रस्त्यांवर २४ तास अखंडपणे धडधडणाऱ्या दगडखाणी,क्वाऱ्या व जेएनपीए अंतर्गत असलेल्या रासायनिक प्रकल्पांमुळे याआधीच जल,वायु प्रदुषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या वाढत्या प्रदूषणाचा विपरीत परिणाम नागरिकांच्या नव्हे तर पशुपक्षी आणि जीवजंतुंच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होत आहे.

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पांमधुन मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर हवेत सोडण्यात येणाऱ्या वायुमुळे वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. या वायुप्रदूषणामुळे नागरिकांना श्र्वसनाच्या आणि इतर व्याधींचा त्रास जाणवू लागला आहे.यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याक वाढत्या वायुप्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचेही दुर्लक्षच होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.कायम अपयशी ठरत असलेले प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी वायुप्रदुषण नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षता घेतील अशी साधारण  अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.  

दिवस-रात्रीच्या सुमारास हवेतुन उग्रदर्पाचा वास येत आहे.यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये श्वसनाचे तसेच इतर शारीरिक व्याधी निर्माण होण्याची भीती एका डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मागील दीड वर्षाच्या कालावधीत उरण ओएनजीसीच्या विरोधात वायुप्रदूषणाबाबत नागरिकांकडून एकही तक्रार विभागाकडे प्राप्त झालेली नसल्याचा दावा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी सचिन आडकर यांनी माहिती देताना केला आहे.

नागरिकांच्या वाढत्या तक्रारींनंतर वायुप्रदूषणाबाबत ओएनजीसी प्रकल्पाच्या वरिष्ठांना नागाव ग्रामपंचायतीने सहा दिवसांपूर्वीच पत्र पाठवले असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी किरण केणी यांनी दिली.

प्रदुषणाबाबत विशेष दक्षता घेतली जात असल्याने उरणच्या ओएनजीसी प्रकल्पांमधुन  कोणत्याही प्रकारचे वायुप्रदूषण होत नाही.याबाबत अद्याप तरी तक्रार प्राप्त झाली नसल्याचा दावा उरण ओएनजीसी प्रकल्पाचे मुख्य अधिकारी सुभोजीत बोस यांनी माहिती देताना केला आहे.

टॅग्स :uran-acउरण