शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
4
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
5
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
6
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
7
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
8
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
9
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
10
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
11
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
12
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
13
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
15
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतच संपवले जीवन; पालकांचा शिक्षकावर गंभीर आरोप
16
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
17
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
18
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
19
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
20
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
Daily Top 2Weekly Top 5

उरण ओएनजीसी प्रकल्पाच्या वायुप्रदूषणाने नागरिक त्रस्त, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 20:33 IST

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पांमधुन मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर हवेत सोडण्यात येणाऱ्या वायुमुळे वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत.

मधुकर ठाकूर 

उरण : उरणच्या ओएनजीसी प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर हवेत सोडण्यात येणाऱ्या वायुमुळे वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या वाढत्या वायुप्रदूषणाचा परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून त्याच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. त्रस्त झालेल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असताना मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याने मंडळाच्या गळथान कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. 

उरण परिसरातील जेएनपीए,ओएनजीसी, बीपीसीएल,उरण-पनवेल रस्त्यांवर २४ तास अखंडपणे धडधडणाऱ्या दगडखाणी,क्वाऱ्या व जेएनपीए अंतर्गत असलेल्या रासायनिक प्रकल्पांमुळे याआधीच जल,वायु प्रदुषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या वाढत्या प्रदूषणाचा विपरीत परिणाम नागरिकांच्या नव्हे तर पशुपक्षी आणि जीवजंतुंच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होत आहे.

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पांमधुन मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर हवेत सोडण्यात येणाऱ्या वायुमुळे वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. या वायुप्रदूषणामुळे नागरिकांना श्र्वसनाच्या आणि इतर व्याधींचा त्रास जाणवू लागला आहे.यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याक वाढत्या वायुप्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचेही दुर्लक्षच होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.कायम अपयशी ठरत असलेले प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी वायुप्रदुषण नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षता घेतील अशी साधारण  अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.  

दिवस-रात्रीच्या सुमारास हवेतुन उग्रदर्पाचा वास येत आहे.यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये श्वसनाचे तसेच इतर शारीरिक व्याधी निर्माण होण्याची भीती एका डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मागील दीड वर्षाच्या कालावधीत उरण ओएनजीसीच्या विरोधात वायुप्रदूषणाबाबत नागरिकांकडून एकही तक्रार विभागाकडे प्राप्त झालेली नसल्याचा दावा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी सचिन आडकर यांनी माहिती देताना केला आहे.

नागरिकांच्या वाढत्या तक्रारींनंतर वायुप्रदूषणाबाबत ओएनजीसी प्रकल्पाच्या वरिष्ठांना नागाव ग्रामपंचायतीने सहा दिवसांपूर्वीच पत्र पाठवले असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी किरण केणी यांनी दिली.

प्रदुषणाबाबत विशेष दक्षता घेतली जात असल्याने उरणच्या ओएनजीसी प्रकल्पांमधुन  कोणत्याही प्रकारचे वायुप्रदूषण होत नाही.याबाबत अद्याप तरी तक्रार प्राप्त झाली नसल्याचा दावा उरण ओएनजीसी प्रकल्पाचे मुख्य अधिकारी सुभोजीत बोस यांनी माहिती देताना केला आहे.

टॅग्स :uran-acउरण