शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

उरण ओएनजीसी प्रकल्पाच्या वायुप्रदूषणाने नागरिक त्रस्त, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 20:33 IST

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पांमधुन मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर हवेत सोडण्यात येणाऱ्या वायुमुळे वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत.

मधुकर ठाकूर 

उरण : उरणच्या ओएनजीसी प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर हवेत सोडण्यात येणाऱ्या वायुमुळे वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या वाढत्या वायुप्रदूषणाचा परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून त्याच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. त्रस्त झालेल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असताना मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याने मंडळाच्या गळथान कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. 

उरण परिसरातील जेएनपीए,ओएनजीसी, बीपीसीएल,उरण-पनवेल रस्त्यांवर २४ तास अखंडपणे धडधडणाऱ्या दगडखाणी,क्वाऱ्या व जेएनपीए अंतर्गत असलेल्या रासायनिक प्रकल्पांमुळे याआधीच जल,वायु प्रदुषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या वाढत्या प्रदूषणाचा विपरीत परिणाम नागरिकांच्या नव्हे तर पशुपक्षी आणि जीवजंतुंच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होत आहे.

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पांमधुन मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर हवेत सोडण्यात येणाऱ्या वायुमुळे वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. या वायुप्रदूषणामुळे नागरिकांना श्र्वसनाच्या आणि इतर व्याधींचा त्रास जाणवू लागला आहे.यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याक वाढत्या वायुप्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचेही दुर्लक्षच होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.कायम अपयशी ठरत असलेले प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी वायुप्रदुषण नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षता घेतील अशी साधारण  अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.  

दिवस-रात्रीच्या सुमारास हवेतुन उग्रदर्पाचा वास येत आहे.यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये श्वसनाचे तसेच इतर शारीरिक व्याधी निर्माण होण्याची भीती एका डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मागील दीड वर्षाच्या कालावधीत उरण ओएनजीसीच्या विरोधात वायुप्रदूषणाबाबत नागरिकांकडून एकही तक्रार विभागाकडे प्राप्त झालेली नसल्याचा दावा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी सचिन आडकर यांनी माहिती देताना केला आहे.

नागरिकांच्या वाढत्या तक्रारींनंतर वायुप्रदूषणाबाबत ओएनजीसी प्रकल्पाच्या वरिष्ठांना नागाव ग्रामपंचायतीने सहा दिवसांपूर्वीच पत्र पाठवले असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी किरण केणी यांनी दिली.

प्रदुषणाबाबत विशेष दक्षता घेतली जात असल्याने उरणच्या ओएनजीसी प्रकल्पांमधुन  कोणत्याही प्रकारचे वायुप्रदूषण होत नाही.याबाबत अद्याप तरी तक्रार प्राप्त झाली नसल्याचा दावा उरण ओएनजीसी प्रकल्पाचे मुख्य अधिकारी सुभोजीत बोस यांनी माहिती देताना केला आहे.

टॅग्स :uran-acउरण