शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

चौक तुपगाव येथील वडाचे झाड तोडल्याने नागरिक संतप्त, वृक्षप्रेमींनी नोंदवली लेखी तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 03:24 IST

जवळपास शंभर वर्षांचे आयुष्य असलेले वडाचे झाड तोडण्यात आल्याने वृक्षप्रेमी नाराज असून त्यांची लेखी तक्रार नोंदवली असूनही वनाधिकारी यांची अरेरावी तक्रारदार यांना सहन करावी लागली आहे.

मोहोपाडा : जवळपास शंभर वर्षांचे आयुष्य असलेले वडाचे झाड तोडण्यात आल्याने वृक्षप्रेमी नाराज असून त्यांची लेखी तक्रार नोंदवली असूनही वनाधिकारी यांची अरेरावी तक्रारदार यांना सहन करावी लागली आहे. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हात ओले केले नाही ना? अशी चर्चा सुरू आहे.चौक तुपगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत नेताजी सहकारी भात गिरणी सोसायटी लिमिटेड आहे. सुमारे साठ वर्षे या गिरणीला झाली आहेत.येथे ग्रामीण भागातील लोक आपले भात भरडाई किंवा विक्रीसाठी येथे बैलगाडीतून घेऊन आल्यावर दिवसभर या वडाच्या झाडाखाली बैल बांधून त्यांना वैरण घातली जायची, जवळपास साठ ते सत्तर फूट परिसरात या वडाच्या झाडाची सावली पसरायची. या झाडाला विस्तीर्ण पार बांधण्यात आला होता. सायंकाळी-सकाळी येथे ज्येष्ठ नागरिक गप्पांच्या आनंदात बसून जीवन कहाणी सांगायचे, असे असताना या झाडाची कोणतीच अडचण नसताना तो का तोडण्यात आला? कुणी तोडला? तो भात गिरणीच्या आवारात होता,मग भात गिरणीच्या व्यवस्थापक यांनी त्याला हरकत का घेतली नाही? त्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाले? याची चौकशी होणे आवश्यक आहे!वन विभागाने परवानगी दिली होती का?असे अनेक प्रश्न निर्माण झाले? आहेत.याबाबत तुपगावचे माजी सरपंच शरीफ शेखअली भालदार यांनी व्यवस्थापक भात गिरणी,खालापूर तहसीलदार तसेच तालुका निबंधक सहकारी संस्था यांना निवेदन सादर केले असून वन विभाग खालापूर यांच्या कार्यालयात गायकवाड नामक कर्मचारी-अधिकारी यांनी पत्र स्वीकारण्यास नकार देऊन पत्र स्वीकारून पोहोच देण्यासाठी कर्मचारी नसल्याचे सांगून झाड तोडताना तुम्ही का थांबवले नाही?असा उलट प्रश्न करुन तक्रारदाराची बोळवण केली. यावेळी वन अधिकारी यांचा भ्रमणध्वनी लागत नव्हता.झाड तोडणारे यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल,असे तुपगाव येथील माजी तंटामुक्ती अध्यक्ष योगेश गुरव व विजय ठोसर यांच्या सह वृक्षप्रेमींनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड