शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

वादळी पावसाचा नांदगावला तडाखा, शेकडो नारळांची झाडे जमीनदोस्त, छप्पर व पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 03:45 IST

वादळी वा-यासह शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नांदगाव ग्रामपंचायत हद्दीत प्रचंड नुकसान झाले आहे. नांदगाव तसेच माजगाव या गावांत घराची छप्परे व पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या आहेत.

मुरुड / नांदगाव : वादळी वा-यासह शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नांदगाव ग्रामपंचायत हद्दीत प्रचंड नुकसान झाले आहे. नांदगाव तसेच माजगाव या गावांत घराची छप्परे व पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच नारळ व सुपारीच्या बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे.शुक्र वारी दुपारनंतर सुरू झालेल्या सोसाट्याच्या वाºयामुळे परिसरातील शेकडो नारळ व सुपारीची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. तर काही झाडे खोडातून तुटून घरांवर, रस्त्यांवर पडली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्याने काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. नांदगाव भागात नारळ व सुपारीच्या बागायती मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे वादळी वाºयाचा मोठा फटका येथे सहन करावा लागला आहे. तीनशेहून अधिक नारळाची झाडे तर सुपारीच्या झाडांची पडझड झाली आहे. नांदगाव येथील रस्त्यावर उभे असलेले वायरमन संजय जाधव यांच्या कारवरही नारळाचे मोठे झाड पडल्याने मोठे नुकसान झाले. नांदगावातील रहिवासी दीपक खोत यांच्या बागायत जमिनीतील ४० सुपारींची झाडे, तर ३ नारळांची झाडे जोरदार वाºयामुळे उन्मळून पडली आहेत. उपसरपंच जितेंद्र दिवेकर, घोले यांच्या बागायत जमिनीवरील झाडेही पडली आहेत.फणसाड अभयारण्यालाही जोरदार वाºयाचा फटका सहन करावा लागला आहे. याबाबत माहिती देताना वनक्षेत्रपाल सुलेमान तडवी यांनी सांगितले की, अभयारण्यातील दोन विजेचे पोल पडल्यामुळे सर्व परिसर अंधारात आहे. अरण्यातील बहुतेक झाडे मधोमध तुटली आहेत. उसरोळी-सुपेगाव रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. नांदगाव येथून मुंबईकडे जाणाºया रस्त्यावरही झाडे पडली होती.वादळी वारा व पावसामुळे भात पिके पडल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. काही शेतकºयांनी कापणी सुरू केल्याने त्यांची तारांबळ उडाली. नांदगाव व आजूबाजूच्या भागात शुक्र वारी ४ वाजता गेलेली वीज शनिवार संध्याकाळपर्यंत आली नव्हती. पाऊस पडल्याने उकाडा आणखी वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. नांदगाव परिसरातील वादळी वाºयाचा ताशी वेग हा १२० ते १५० कि.मी. इतका होता. समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवेचा वेग वाढला. परतीचा पाऊस असा पडत नाही. वेगवान वारे वाहिल्याने या भागात प्रचंड नुकसान झाल्याचे या वेळी भूगोलातील तज्ज्ञ शिक्षक विजय बनाटे यांनी सांगितले.संपूर्ण पावसात जेवढे पंचनामे झाले नाहीत, ते एका दिवसात पडलेल्या वादळी वारे व पावसामुळे झाले आहेत. नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमधील दांडे, नांदगाव, खारीकवाडा, अदाड व वाळवंटी अशा परिसरात घरांचे नुकसान होऊन ३९ लोकांचे पंचनामे करण्यात आले असून, किमान दोन लाखांपेक्षा जास्त रकमेचे नुकसान झाले आहे.- दिलीप यादव,नायब तहसीलदार, मुरुडआठवडाभर जिल्ह्यात कडक ऊन पडले होते. पारा चांगलाच चढला होता. दोन दिवसांपूर्वी भिरा येथे ३६ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली होती. वाढत्या तापमानामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले असताना, पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना सुखद गारवा अनुभवला.

टॅग्स :Raigadरायगड