शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

वादळी पावसाचा नांदगावला तडाखा, शेकडो नारळांची झाडे जमीनदोस्त, छप्पर व पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 03:45 IST

वादळी वा-यासह शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नांदगाव ग्रामपंचायत हद्दीत प्रचंड नुकसान झाले आहे. नांदगाव तसेच माजगाव या गावांत घराची छप्परे व पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या आहेत.

मुरुड / नांदगाव : वादळी वा-यासह शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नांदगाव ग्रामपंचायत हद्दीत प्रचंड नुकसान झाले आहे. नांदगाव तसेच माजगाव या गावांत घराची छप्परे व पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच नारळ व सुपारीच्या बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे.शुक्र वारी दुपारनंतर सुरू झालेल्या सोसाट्याच्या वाºयामुळे परिसरातील शेकडो नारळ व सुपारीची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. तर काही झाडे खोडातून तुटून घरांवर, रस्त्यांवर पडली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्याने काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. नांदगाव भागात नारळ व सुपारीच्या बागायती मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे वादळी वाºयाचा मोठा फटका येथे सहन करावा लागला आहे. तीनशेहून अधिक नारळाची झाडे तर सुपारीच्या झाडांची पडझड झाली आहे. नांदगाव येथील रस्त्यावर उभे असलेले वायरमन संजय जाधव यांच्या कारवरही नारळाचे मोठे झाड पडल्याने मोठे नुकसान झाले. नांदगावातील रहिवासी दीपक खोत यांच्या बागायत जमिनीतील ४० सुपारींची झाडे, तर ३ नारळांची झाडे जोरदार वाºयामुळे उन्मळून पडली आहेत. उपसरपंच जितेंद्र दिवेकर, घोले यांच्या बागायत जमिनीवरील झाडेही पडली आहेत.फणसाड अभयारण्यालाही जोरदार वाºयाचा फटका सहन करावा लागला आहे. याबाबत माहिती देताना वनक्षेत्रपाल सुलेमान तडवी यांनी सांगितले की, अभयारण्यातील दोन विजेचे पोल पडल्यामुळे सर्व परिसर अंधारात आहे. अरण्यातील बहुतेक झाडे मधोमध तुटली आहेत. उसरोळी-सुपेगाव रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. नांदगाव येथून मुंबईकडे जाणाºया रस्त्यावरही झाडे पडली होती.वादळी वारा व पावसामुळे भात पिके पडल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. काही शेतकºयांनी कापणी सुरू केल्याने त्यांची तारांबळ उडाली. नांदगाव व आजूबाजूच्या भागात शुक्र वारी ४ वाजता गेलेली वीज शनिवार संध्याकाळपर्यंत आली नव्हती. पाऊस पडल्याने उकाडा आणखी वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. नांदगाव परिसरातील वादळी वाºयाचा ताशी वेग हा १२० ते १५० कि.मी. इतका होता. समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवेचा वेग वाढला. परतीचा पाऊस असा पडत नाही. वेगवान वारे वाहिल्याने या भागात प्रचंड नुकसान झाल्याचे या वेळी भूगोलातील तज्ज्ञ शिक्षक विजय बनाटे यांनी सांगितले.संपूर्ण पावसात जेवढे पंचनामे झाले नाहीत, ते एका दिवसात पडलेल्या वादळी वारे व पावसामुळे झाले आहेत. नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमधील दांडे, नांदगाव, खारीकवाडा, अदाड व वाळवंटी अशा परिसरात घरांचे नुकसान होऊन ३९ लोकांचे पंचनामे करण्यात आले असून, किमान दोन लाखांपेक्षा जास्त रकमेचे नुकसान झाले आहे.- दिलीप यादव,नायब तहसीलदार, मुरुडआठवडाभर जिल्ह्यात कडक ऊन पडले होते. पारा चांगलाच चढला होता. दोन दिवसांपूर्वी भिरा येथे ३६ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली होती. वाढत्या तापमानामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले असताना, पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना सुखद गारवा अनुभवला.

टॅग्स :Raigadरायगड