शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

पाणीबचतीसाठी प्रत्येक गावात नेमणार जलदूत, प्रशासकीय यंत्रणेबरोबरच नागरिकांचा पुढाकार आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 02:56 IST

पाणी हे जीवन असून अमूल्य आहे. पाणीबचतीचा संदेश सर्वदूर पोहचावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे.

- जयंत धुळपअलिबाग : पाणी हे जीवन असून अमूल्य आहे. पाणीबचतीचा संदेश सर्वदूर पोहचावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे. जलजागृती सप्ताहात पाण्याचे महत्त्व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक गावात जलदूत तयार करून जनजागृती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी केले आहे.महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत जिल्ह्यात १६ ते २२ मार्चदरम्यान जलसंपदा विभागाच्या माध्यमातून आयोजित जलजागृती सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. त्यावेळी डॉ.सूर्यवंशी बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी उत्तर कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे, रायगड जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.एन.साळुंखे, हेटवणे मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस.डी.गाढे, पर्यावरण समितीच्या सचिव संगीता जोशी, प्रा. हेमंत सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हाधिकारी सूर्यवंशी म्हणाले, जगण्यासाठी जसा श्वास महत्त्वाचा तसेच पाणी महत्त्वाचे आहे. पाण्याचे यथायोग्य नियोजन करणे काळाची गरज आहे. प्रत्येकाने पाणीबचतीचा अवलंब करावा. या सप्ताहात जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात पथनाट्याद्वारेही जनजागृती करावी असे निर्देशही त्यांनी दिले.जिल्ह्यात पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून जलयुक्त शिवार योजनाही फलदायी ठरली आहे. पाण्याचा अपव्यय होणार नाही याकरिता सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी अखेरीस सांगितले.पर्यावरण समितीच्या सचिव संगीता जोशी व प्रा. हेमंत सामंत यांनी पाणीबचत व जलजागृती सप्ताहाचे महत्त्व विशद करून उपस्थितांना सांगितले. जिल्ह्यातील अंबा, कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा, उल्हास या नद्यांतील पाणी एकत्र करून जलकलशाचे पूजनही यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जलसाक्षरता अभियानाबाबत स्वामी कला मंच संस्थेच्या कलाकारांनी जलबचतीवर नाट्य सादर केले. तर उत्तर कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ ठाणे व पाटबंधारे मंडळ रायगड आणि सरिता कला मंच अहमदनगर यांनी जलजागृतीपर गीत सादर केले. जलप्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील विविध पाटबंधारे प्रकल्पांची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांनी प्रास्ताविकात सप्ताहादरम्यान राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली तर आभार हेटवणे मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस.डी.गाढे यांनी मानले.>जलव्यवस्थापनातून बचत शक्यपाणी हा विषय जीवनाशी निगडित असून त्याचा वापर करताना प्रत्येकाने काळजीपूर्वक केल्यास पाण्याची बचत होऊ शकते. जिल्ह्यातील नद्या, तलाव, पाझर, झरे आदी सर्व जलस्रोतांचे जलव्यवस्थापन शाश्वत पध्दतीने केल्यास पाण्याची बचत होऊन आपले जीवनमान उंचाविण्यासाठी त्याची मदत होईल, असे मत यावेळीउत्तर कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ यांनी व्यक्त केले.कोकणामध्ये पाऊस चांगल्याप्रकारे होत असल्यामुळे त्याचे जलव्यवस्थापन होणेही गरजेचे आहे. नागरिकांनी पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये भाजीपाल्याची लागवड करून उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावे,असेही त्यांनी अखेरीस सांगितले.