शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाणीबचतीसाठी प्रत्येक गावात नेमणार जलदूत, प्रशासकीय यंत्रणेबरोबरच नागरिकांचा पुढाकार आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 02:56 IST

पाणी हे जीवन असून अमूल्य आहे. पाणीबचतीचा संदेश सर्वदूर पोहचावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे.

- जयंत धुळपअलिबाग : पाणी हे जीवन असून अमूल्य आहे. पाणीबचतीचा संदेश सर्वदूर पोहचावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे. जलजागृती सप्ताहात पाण्याचे महत्त्व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक गावात जलदूत तयार करून जनजागृती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी केले आहे.महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत जिल्ह्यात १६ ते २२ मार्चदरम्यान जलसंपदा विभागाच्या माध्यमातून आयोजित जलजागृती सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. त्यावेळी डॉ.सूर्यवंशी बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी उत्तर कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे, रायगड जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.एन.साळुंखे, हेटवणे मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस.डी.गाढे, पर्यावरण समितीच्या सचिव संगीता जोशी, प्रा. हेमंत सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हाधिकारी सूर्यवंशी म्हणाले, जगण्यासाठी जसा श्वास महत्त्वाचा तसेच पाणी महत्त्वाचे आहे. पाण्याचे यथायोग्य नियोजन करणे काळाची गरज आहे. प्रत्येकाने पाणीबचतीचा अवलंब करावा. या सप्ताहात जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात पथनाट्याद्वारेही जनजागृती करावी असे निर्देशही त्यांनी दिले.जिल्ह्यात पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून जलयुक्त शिवार योजनाही फलदायी ठरली आहे. पाण्याचा अपव्यय होणार नाही याकरिता सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी अखेरीस सांगितले.पर्यावरण समितीच्या सचिव संगीता जोशी व प्रा. हेमंत सामंत यांनी पाणीबचत व जलजागृती सप्ताहाचे महत्त्व विशद करून उपस्थितांना सांगितले. जिल्ह्यातील अंबा, कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा, उल्हास या नद्यांतील पाणी एकत्र करून जलकलशाचे पूजनही यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जलसाक्षरता अभियानाबाबत स्वामी कला मंच संस्थेच्या कलाकारांनी जलबचतीवर नाट्य सादर केले. तर उत्तर कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ ठाणे व पाटबंधारे मंडळ रायगड आणि सरिता कला मंच अहमदनगर यांनी जलजागृतीपर गीत सादर केले. जलप्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील विविध पाटबंधारे प्रकल्पांची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांनी प्रास्ताविकात सप्ताहादरम्यान राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली तर आभार हेटवणे मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस.डी.गाढे यांनी मानले.>जलव्यवस्थापनातून बचत शक्यपाणी हा विषय जीवनाशी निगडित असून त्याचा वापर करताना प्रत्येकाने काळजीपूर्वक केल्यास पाण्याची बचत होऊ शकते. जिल्ह्यातील नद्या, तलाव, पाझर, झरे आदी सर्व जलस्रोतांचे जलव्यवस्थापन शाश्वत पध्दतीने केल्यास पाण्याची बचत होऊन आपले जीवनमान उंचाविण्यासाठी त्याची मदत होईल, असे मत यावेळीउत्तर कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ यांनी व्यक्त केले.कोकणामध्ये पाऊस चांगल्याप्रकारे होत असल्यामुळे त्याचे जलव्यवस्थापन होणेही गरजेचे आहे. नागरिकांनी पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये भाजीपाल्याची लागवड करून उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावे,असेही त्यांनी अखेरीस सांगितले.