शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चिरनेर जंगल सत्याग्रह हुतात्मा स्मृतिदिन साधेपणाने साजरा, शासकीय मानवंदना, एमएमआरडीए प्रकल्पाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 04:07 IST

एमएमआरडीएच्या प्रस्तावित प्रकल्पाचा निषेध म्हणून २५ सप्टेंबर रोजी साजरा झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ८७ वा हुतात्मा स्मृतिदिन हुतात्मांना दिलेली शासकीय मानवंदना वगळता साधेपणाने साजरा करण्यात आला.

उरण : एमएमआरडीएच्या प्रस्तावित प्रकल्पाचा निषेध म्हणून २५ सप्टेंबर रोजी साजरा झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ८७ वा हुतात्मा स्मृतिदिन हुतात्मांना दिलेली शासकीय मानवंदना वगळता साधेपणाने साजरा करण्यात आला.उरणच्या ग्रामीण भागातील नागरिक, शेतकºयांवरील संकटाची मालिका अद्याप सुरुच आहे. मागील काही वर्षापूर्वी महामुंबई सेझचे संकट उरण, पनवेल, पेणच्या ग्रामीण भागावर आले होते. बड्या भांडवलदारांसाठी महामुंबई सेझच्या पायघड्या घालण्यासाठी १० हजार हेक्टर जमीन अल्पदरात संपादन करण्याचा घाट सरकारने घातला होता. मात्र शेतकºयांच्या अभेद्य एकजुटीने दिलेल्या लढ्यामुळे महामुंबई सेझ हद्दपार करण्यात येथील शेतकºयांना यश आले. महामुंबई सेझचे भूत मानगुटीवरुन उतरत नाही तोच आता उरण ग्रामीण भागातील जनतेच्या मानगुटीवर सरकारने एमएमआरडीएचा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न सरकारने सुरु केला आहे. शेतकºयांनी याआधीच या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. आधी चर्चा, बैठका, मागण्या, पुनर्वसन, गावठाण विस्तार आणि शेतकºयांबरोबर सहमतीचा निर्णय त्यानंतरच प्रकल्प असा इशाराच शेतकºयांनी शासनाला दिला आहे.दरवर्षी चिरनेर येथे २५ सप्टेंबर रोजी चिरनेर जंगल सत्याग्रहाचा हुतात्मा स्मृती दिन साजरा करण्यात येतो. या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहिली जाते. त्यांच्या वारसांचा सत्कारही याप्रसंगी केला जातो. मात्र यावर्षी चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या हुतात्मा दिनावर प्रस्तावित एमएमआरडीए सावटाखाली साजरा करण्यात आला. त्यामुळे दरवर्षी हुतात्मांच्या नातेवाईकांचा होणारा सत्कारही झाला नाही. त्यामुळे नेते, पुढाºयांचीही भाषणेही झाली नाहीत. केवळ शासकीय मानवंदनेचा कार्यक्रम सोपस्कार म्हणून उरकला.या कार्यक्रमाप्रसंगी उरणचे आमदार मनोहर भोईर, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक पाटील, उरण पंचायत समितीचे सभापती नरेश घरत, उपसभापती वैशाली पाटील आदी उपस्थित होते.- या कार्यक्रमासाठी शासनाकडून राजिप मार्फत दिला जाणारा निधीही नाकारुन साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थ आणि चिरनेर ग्रामपंचायतीने याआधीच जाहीर केला होता.यावर्षी चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या हुतात्मा दिनावर प्रस्तावित एमएमआरडीए सावटाखाली साजरा करण्यात आला. त्यामुळे हुतात्मांच्या नातेवाईकांचा होणारा सत्कारही झाला नाही. केवळ शासकीय मानवंदनेचा कार्यक्रम सोपस्कार म्हणून उरकला.