शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

चिंचोटी वनघोटाळा : आरोपींविरोधात गुन्हा दाखल करा - न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:43 IST

Court : ९० दिवसांमध्ये दाेषाराेपपत्र दाखल करता येेते. मात्र, न्यायालयाने या प्रकरणात ७० दिवसांची मुदत पाेलिसांना दिली आहे.

रायगड : अलिबाग तालुक्यातील चिंचाेटी येथील वनव्यवस्थापन समितीविराेधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश अलिबागच्या न्यायालयाने दिले. त्याचप्रमाणे ७० दिवसांमध्ये दाेषाराेपपत्र दाखल करण्याचे फर्मानही न्यायालयाने पाेलिसांना काढले आहे. त्यामुळे २९ लाख रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणातील सत्य बाहेर पडण्यास मदत हाेणार असल्याचे बाेलले जाते. हा निकाल न्यायालयाने १९ डिसेंबर रोजी दिला.वनव्यवस्थापन समिती चिंचोटीचा अध्यक्ष प्रकाश गौरू भांजी व सचिव संजय डी. पाटील (तत्कालीन वनपाल उमटे) आणि समितीच्या अन्य १५ सदस्यांनी वृक्षलागवडीच्या नावाखाली २९ लाखांचा अपहार केल्याची तक्रार अ‍ॅड. राकेश पाटील यांनी रेवदंडा पोलीस ठाणे, जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडे सप्टेंबर २०२० मध्ये कागदपत्रे आणि पुराव्यांसह केली होती. मात्र, रेवदंडा पोलिसांकडून पाटील यांच्या तक्रारअर्जावर तीन महिने उलटूनही आरोपींविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. अ‍ॅड. राकेश पाटील यांना याप्रकरणी न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. न्यायालयाने ॲॅड. पाटील यांची तक्रार ग्राह्य धरली आहे. ९० दिवसांमध्ये दाेषाराेपपत्र दाखल करता येेते. मात्र, न्यायालयाने या प्रकरणात ७० दिवसांची मुदत पाेलिसांना दिली आहे. त्यामुळे हा वनघोटाळ्याचा गुन्हा दाखल करण्यात वेळकाढूपणा करणाऱ्यांच्या हे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता असल्याचे चित्र आहे. अ‍ॅड. राकेश पाटील यांना परिक्षेत्र वनाधिकारी, अलिबाग यांनी दिलेल्या माहितीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली. त्यामध्ये वृक्षलागवडीकरिता दाखविलेली रक्कम व मजुरांना अदा केलेले चेक, व्हाउचर व बँक स्टेटमेंट यामध्ये तफावत आढळून आली. तर, चिंचोटी गावात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींच्या नावावर मजुरी अदा करणे, चिंचोटी गावामध्ये न झालेल्या सभा तसेच ग्रामस्थांना प्रशिक्षण देऊन रक्कम हडपल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान,  एक वकील म्हणून पोलिसांकडे तक्रारअर्जाबरोबरच पुराव्यांची सर्व कागदपत्रे देऊनही पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करतात. हे कायद्याचे राज्य म्हणविणा-या महाराष्ट्रासाठी खूप मोठी शोकांतिका आहे. न्यायालयाने गुन्हे दाखल करण्यासंदर्भात दिलेला आदेश सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरेल, असे तक्रारदार ॲड. राकेश पाटील यांनी ''लाेकमत''ला सांगितले.

गुन्हा दाखल करण्याकामी पोलिसांनी जी उदासीनता दाखविलेली आहे, त्यामुळे सामान्य नागरिक तक्रार करण्यास धजावत नाहीत. पोलीस यंत्रणेने जर गुन्हे दाखल करून तपास करण्यास तत्परता दाखविली, तर भ्रष्टाचाराच्या बऱ्याच केसेस बाहेर येतील.- अ‍ॅड. मधुकर वाजंत्री,तक्रारदारांचे वकील

टॅग्स :RaigadरायगडCourtन्यायालय