शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

रसायनयुक्त सांडपाणी येरद गावच्या नदीपात्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 00:06 IST

माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रात पोस्को कंपनी उभारली गेली

- गिरीश गोरेगावकर माणगाव : माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रात पोस्को कंपनी उभारली गेली असून या पोस्को कंपनीचे रासायनिक सांडपाणी हे येलवडे येथून येणाऱ्या नदीचे पाणी व येरद येथील नदीचे पाणी यांचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या ठिकाणी सोडले जाते. असे दूषित पाणी या ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांना दिले जाते. अशा विषारी पाण्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.१९९८मध्ये ग्रुपग्रामपंचायत कडापेने ४० लाखांची नळपाणी पुरवठा योजनेची विहीर काळ नदीपात्रात बांधली असून हे नदीपात्र जानेवारी ते मे महिन्यामध्ये संपूर्णपणे कोरडे पडायचे व त्या नदीपात्रात असलेल्या विहिरी मात्र भरलेल्या असायच्या त्या ठिकाणाहून येरद, कडापे, बादलवाडी, कडापेवाडी, कांदळगाव या गावांना नळपाणी पुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. परंतु विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रात पोस्को कंपनी उभारली गेल्यामुळे ही कंपनी रात्रीच्या वेळेस आपले रसायनयुक्त दूषित पाणी या काळ नदीपात्रात सोडत असल्याने हे रसायनमिश्रित प्रदूषित पाणी थेट या बांधलेल्या नदीपात्रातील विहिरीमध्ये जात आहे.उन्हाळ्यात कोरडी पडणारी नदी या पोस्कोच्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे भरलेली असून या नदीपात्रातील पिण्यासाठी बांधलेल्या विहिरी देखील या पाण्याखाली गेल्या आहेत. एक प्रकारे येरद गाव, कडापे, बादलवाडी, कडापेवाडी, कादळगाव या गावांच्या पिण्याच्या पाण्यात पोस्को कंपनी ही विष कालवून सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचे कडापे ग्रामपंचायतीचे सरपंच मारुती मोकाशी व तसेच येरद गावातील ग्रामस्थ यांनी सांगितले.तसेच सरपंच व ग्रामसेवक यांनी याबाबतची तक्रार दोन वर्षांपूर्वी माणगाव प्रांत कार्यालयामध्ये केली होती. माणगाव प्रांत कार्यालयामध्ये ही केस दोन वर्षे चालून ती बंद करण्यात आली असून त्यावर लवकरच निर्णय देणार असल्याचे समजते.पोस्को कंपनी व्यवस्थापकांकडून त्यावेळेस दोन गावांना पाणीपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिले. परंतु तेथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी ते नाकारले आहे. सर्वच वाड्यांना पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या ग्रामपंचायतीची लोकसंख्या जवळपास ३ हजार आहे. येथील वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येरद या ठिकाणी ग्रामस्थांना बोअरवेलचे पाणी मिळत असून भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे बोअरवेलद्वारे होणारा पाणीपुरवठा सुद्धा खूप कमी झाला आहे. यामुळे पुरेसे पाणी सुद्धा मिळत नाही असे तेथील ग्रामस्थ शरद मोकाशी व तेथील महिला पोटतिडकीने बोलत होत्या. याबाबत पोस्को कंपनीचे व्यवस्थापक महेश गोखले यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता होऊ शकला नाही.दूषित पाण्यामुळे आजारांना आमंत्रणकाळ नदीपात्रातील पाण्यावर तवंग येत असून येथील नागरिकांना अंगावर खाज येऊन फोड येतात, केस गळतात तसेच पाण्यामुळे अशा अनेक आजारांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तसेच हे पाणी आदिवासी बांधव गुरे व बकऱ्यांसाठी, कपडे धुण्यासाठी वापर करत असल्यामुळे त्यांना तसेच त्यांच्या मुक्या प्राण्यांना देखील अनेक आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे निजापूर विभागातील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी नाडकर तसेच कडापे ग्रामपंचायत अंतर्गत असणारी आदिवासी वाडी येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते राम कोळी यांनी लोकमतशी बोलताना दिली.>विळेभागाड औद्योगिक क्षेत्रातील पोस्को कंपनीत ट्रीटमेंट प्लांट आहे, आमचे निरीक्षक वेळोवेळी कंपनीत भेट देत असतात. परंतु पोस्को कंपनीने त्यांचे रसायनयुक्त पाणी नदीत सोडतात असे कधी निदर्शनास आले नाही. जर ग्रामस्थांची तक्रार असेल तर मी कंपनीला भेट देऊन शहानिशा करतो.- एस. व्ही. आवटी, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण मंडळ कार्यालय महाड