शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ रसायनाची अद्याप दुर्गंधी !

By admin | Updated: December 31, 2016 04:24 IST

मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास दासगावच्या भरवस्तीमध्ये अ‍ॅसिडिक अ‍ॅसिडने भरलेला टँकर पलटी झाला होता. त्यावेळी त्या ठिकाणी दासगावमधील

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास दासगावच्या भरवस्तीमध्ये अ‍ॅसिडिक अ‍ॅसिडने भरलेला टँकर पलटी झाला होता. त्यावेळी त्या ठिकाणी दासगावमधील दोन ग्रामस्थ जखमी झाले होते. नंतर त्या ठिकाणी अ‍ॅसिड गळतीच्या त्रासामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या अपघाताने रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक छोट्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तीन दिवस उलटले तरी त्या ठिकाणी शुक्रवारी दुर्गंधीचा त्रास कायम आहे. विभागातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले असले तरी नुकसानभरपाई कोण देणार, याबाबत दासगावकर नागरिक संभ्रमात आहेत. अपघातानंतर महामार्गाचा कठडा तुटला. महामार्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र एकही महामार्ग अधिकारी या ठिकाणी पाहणीसाठी न आल्याने या खात्याविरोधात नागरिकांकडून खंत व्यक्त करण्यात येत आहे. अ‍ॅसिडिक अ‍ॅसिडचा हा टँकर महाड औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी आॅर्गनिक्स कारखान्याचा असल्याने जखमी ग्रामस्थाला कारखान्याकडून १० हजारांची मदत देण्यात आली आहे.२८ डिसेंबरला अपघातानंतर चार तासांनी टँकर गळती नियंत्रणात आणून वाहणाऱ्या अ‍ॅसिडवर नियंत्रण आणण्यात महाड औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण नियंत्रण मंडळ, सेफ्टी पॅन तसेच लक्ष्मी आॅर्गनिक्स कारखान्यातील सेफ्टी टीमला यश आले. एवढे होत असताना देखील दोन दिवस या ठिकाणी त्रास कायमच होता. संध्याकाळी जवळच एक मोठा खड्डा मारून टँकरद्वारे पाणी मारून रस्ता साफ करण्यात आला. मात्र धुतलेल्या रस्त्याचे पाणी त्या ठिकाणी खड्ड्यात साचलेले असून रस्त्यावर देखील ठिकठिकाणी अ‍ॅसिड पडलेले आहे. त्यामुळे दोन दिवस उलटले तरी त्या परिसरातील दुर्गंधी कायम आहे. याचा फटका मात्र जवळच असलेल्या आयसीआयसीआय बँक, पोस्ट आॅफिस व दवाखाना, भाजी दुकान, चहाची टपरी, सलून व इतर दुकानांना बसला आहे. शुक्रवारीही दुकाने या वासाच्या त्रासामुळे बंद ठेवावी लागत आहेत. त्याच दिवशी महसूल खात्याकडून तलाठ्यामार्फत या घटनेचे पंचनामे करण्यात आले. दुकानातील मालाचे नुकसान सोडता इमारतीचे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. यासाठी दुकानदारांना एकही रुपया मदत मिळालेली नाही. तलाठ्यांनी केलेले पंचनामे महाड तहसील कार्यालयाकडे पाठवण्यात आलेले आहेत. परंतु आता यांना मदत कोण देणार?सरकारी लक्ष्मी आॅर्गनिक्स कारखाना. यामुळे सध्या दासगावकर नागरिक संभ्रमात आहेत. सध्या दासगावकर नागरिक वाऱ्यावर आहेत. अपघातानंतर दासगावमधील दोन ग्रामस्थ सचिन पयेलकर तसेच संदेश जाधव या दोघांना जबर मार बसला. या दोघांवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सचिन पयेलकर याच्या पायाला मोठ्या प्रमाणावर दुखापत झाल्याने लक्ष्मी कारखान्याकडून त्याला तातडीची १० हजारांची मदत देण्यात आली, तर पुढील उपचाराचा संपूर्ण पैसा देण्यात येईल. त्याचबरोबर दासगाव ठिकाणी स्वच्छतेचा विचार करण्यात येईल व या अपघातामुळे ज्या लोकांचे नक्कीच नुकसान झाले असेल त्याची सखोल पाहणी व चौकशी करून मदतीसाठी त्यांचाही विचार करण्यात येईल, अशी माहिती लक्ष्मी आॅर्गनिक्स कारखान्याचे व्यवस्थापक विनोद देशमुख यांनी दिली. (वार्ताहर)महामार्गावर अपघाताचा धोका कायम, अधिकारी सुस्तअपघातामध्ये महामार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परंतु तीन दिवस झाले तरी महाड राष्ट्रीय महामार्गावरून अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जाण्याची किंवा पाहणी करण्यासाठी वेळ मिळाला नाही. कठडा तुटल्याने त्या ठिकाणी अवघड वळण आहे व त्या ठिकाणी कधीही अशा पद्धतीची घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या हजगर्जीपणामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सध्या इथे सांडणाऱ्या केमिकलची तपासणी करण्यात यावी, नक्की अ‍ॅसिडिक अ‍ॅसिड आहे का? त्यानंतर या ठिकाणी ज्या ज्या खात्याकडून हलगर्जीपणा तपासणीमध्ये करण्यात आलेला आहे, त्या त्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी व दासगावमधील नागरिकांना योग्य न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात येत आहे. हे अ‍ॅसिड श्वसनातून गेले तर घशाला सूज येणे, दम लागणे, लघवी लाल होणे, डोळे लाल होणे, पोटात गेले तर जुनाब किंवा उलटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी अपघाताजवळ असलेल्या दोन्ही विहिरींचे पाण्याचे नमुने घेवून तपासणी करूनच पाण्याचा वापर करावा, असे दासगाव ग्रामपंचायतीला पत्र देण्यात आले आहे- डॉ. वि. वि. पाटील, वैद्यकीय अधिकारी, दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रघटनेच्या ठिकाणची पाहणी करण्यात आलेली आहे. दोन दिवस वास राहील. त्या ठिकाणी जो खड्डा केला आहे तेथे काही प्रमाणात सांडलेले अ‍ॅसिड आहे. ते साफ करण्याचे ओबरल लक्ष्मी कारखान्याला सांगण्यात आलेले आहे.- अमित लाटे, क्षेत्र अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड