शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

किरकोळ बाजारात भाज्यांची स्वस्ताई; आवक वाढल्याने दर निम्म्याने घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 23:53 IST

सुधागड तालुक्यातील ग्राहक आनंदी

- विनोद भोईरपाली : रायगड जिल्ह्यात किरकोळ बाजारात गेले अनेक दिवस भाज्यांचे भाव गगनाला भिडले होते. मात्र, आता भाज्यांची आवक वाढल्याने भाज्यांचे दर निम्म्याने कमी झाले आहेत. यामुळे ग्राहकदेखील खूश झाले आहेत.काही दिवसांपूर्वी कोथिंबिरीची एक जुडी ४० ते ५० रुपयांना मिळत होती. ती आता अवघी १० रुपयांना मिळत आहे. तब्बल १२० रुपये किलोच्या पुढे गेलेली मटार आता ५० ते ६० रुपये किलोने मिळत आहे. जिल्ह्यातील किरकोळ व घाऊक भाजी विक्रेते पुणे मंडई किंवा वाशी बाजारातून भाजी विक्रीसाठी घेऊन येतात. कोरोना संकटात ट्रान्सपोर्टचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर हमाल व मजूरदेखील उपलब्ध होत नव्हते. यातच भाज्यांची आवकसुद्धा फारच कमी होती. बाजारात अनेक प्रकारच्या भाज्यादेखील उपलब्ध होत नव्हत्या. अशा विविध कारणांमुळे भाज्यांचे भाव वधारले होते. मात्र सध्या वाहतुकीची चांगली सोय, चांगले हवामान यामुळे शेतकऱ्यांच्या हाती भरघोस पीक आल्याने व माणसे उपलब्ध झाल्याने बाजारात भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे भाज्या स्वस्त झाल्या असल्याचे पालीतील भाजी विक्रेत्याने सांगितले. राजमा, जाडी मिरची या काही भाज्या तर मिळतदेखील नव्हत्या. मात्र आता सर्वच भाज्या उपलब्ध होत आहेत.

टॅग्स :vegetableभाज्या