शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

चांदोरे, नळेफोडीचा वीजपुरवठा सुरळीत; महावितरणकडून दिवस-रात्र करण्यात आले काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 23:59 IST

फीडरवरील १० ते १५ वाडी, वस्त्याही प्रकाशमान करण्यात आले आहेत.

माणगाव : अतितीव्र निसर्ग चक्रीवादळामुळे माणगाव येथील महावितरण कंपनीच्या वीज वितरण यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले आहे. ही यंत्रणा पूर्ववत करण्याकरिता महावितरणचे अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र काम करीत असून, २२ के.व्ही चांदोरे फीडरचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. भांडुप परिमंडलच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी चांदुरे येथे प्रत्यक्ष जाऊन कामाचा आढावा घेतला व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले, तसेच ग्रामस्थांना भेट देऊन सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली.

साले स्विचिंग उपकेंद्रातून निघणारी ४५ किमी चांदुरे फीडरवरील बहुतांश उच्चदाब वाहिनी; डोंगर, दरी व घाटातून जात असल्यामुळे या ठिकाणी पडलेले खांब उभे करणे फार आव्हानात्मक काम होते. या भागातील अनेक वीजवाहिन्या जमीनदोस्त झाल्या, त्यांची पुन्हा उभारणी करण्यात आली आहे. चांदोरे फीडरवर ८४ उच्चदाब खांब, ५४ डीटीसी, ३२० लघुदाब खांब बाधित झाले होते.

अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या निर्देशानुसार फीडरवर तातडीने वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी तीन कंत्राटदार; आर.डी. मगर, आरआरबी इलेक्ट्रिकल्स यांची नियुक्ती करण्यात आली होती. कार्यकारी अभियंता, ठाणे-१ जीवन चव्हाण व कार्यकारी अभियंता, रोहा बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाºयांनी कंत्राटदारांच्या मदतीने भर पावसात काम करून, या फीडरवरील १६ गावांपैकी नाइटने, महादपोली, पाचोळे, रिळे, काकल, ऊसर, साई, निळगुंड व वावे या गावांचा वीजपुरवठा सुरू के ला होता. रविवारी चांदुरे व नळेफोडी या गावाचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे.

याशिवाय या फीडरवरील १० ते १५ वाडी, वस्त्याही प्रकाशमान करण्यात आले आहेत. यामुळे ३,५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात महावितरणला यश मिळाले आहे. उर्वरित गावांचा वीजपुरवठा लवकर सुरू करण्यासाठी काम सुरू आहे.

टॅग्स :Raigadरायगड