शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कटीबध्द - नारायण राणे

By निखिल म्हात्रे | Updated: January 15, 2024 15:42 IST

अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी हाॅलवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड व एकात्मित आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्यावतीने प्रधानमंत्री जनजात आदिवासी न्याय महाभियानचे आयोजन केले होते.

लोकमत न्युज नेटवर्कअलिबाग - मोदींच्या खंबीर नेतृत्वामुळे आपला देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. २०३० सालापर्यंत दरडोई उत्पन्नात आपला देश जगात तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तो पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांना आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे असे अवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.

अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी हाॅलवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड व एकात्मित आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्यावतीने प्रधानमंत्री जनजात आदिवासी न्याय महाभियानचे आयोजन केले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून तर केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होत.

आदिवासी व कातकरी बांधवांवर मोदींचे अधिक प्रेम असून त्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्रसरकार विविध योजना आखून त्या लाभार्थांपर्यंत पोहवित आहे. तळागाळीतील वाड्यावर अधिखाऱ्यांमार्फत या योजना पोहोचतात की नाही हे पाण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आम्हा मंत्र्यांना पाठवून कार्यक्रम घेऊन लाभार्थ्यांपर्यंत त्यांचे लाभ पोहोचवित आहोत. लाभ पोहोचवित असताना त्यांच्या चोहऱ्यावरील स्मित हास्य आनंद देऊन जात असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४० कोटी जनतेला ५४ योजना दिल्या आहेत. तर दुसरीकडे ८० कोटी नागरीकांना धान्य मोफत दिले आहे. त्यासाठी साडेतीन लाख कोटी खर्च येत आहे. आयुष्मान भारत योजना, उज्वला गॅस योजना, मोफत घरांची योजना, नळ पाणी योजना अशा योजनांचा लोकांना लाभ मिळतोय. लोकांमध्ये जाऊन या योजनांची माहिती सांगा. त्याची लाभार्थीना जाणीव करुन द्या. फक्त नुसती चर्चा न करता आपण काम केले पाहिजे असा सल्ला वजा समज हि अधिकारी वर्गाला नारायण याणे यांनी दिली.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे