शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

बंदरांवर सीसीटीव्हीचा वॉच; जिल्ह्यातील वीस ठिकाणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 22:54 IST

सरकारने एलईडीच्या साह्याने होणाºया मासेमारीस बंदी घातली आहे. पण तरीही जास्त मत्स्य उत्पादन मिळावे, या हव्यासापोटी काही मच्छीमारांकडून एलईडी दिव्यांचा वापर केला जात आहे.

निखिल म्हात्रेअलिबाग : जिल्ह्यातील मासेमारी बंदरे आणि व्यावसायिक बंदरे आता अधिक सुरक्षित होणार आहेत. राज्यातील सर्वच मासेमारी बंदरांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर अवैधरीत्या केल्या जाणाऱ्या मासेमारीला आळा बसणार आहे. त्याचप्रमाणे बंदरांवर चालणाºया अवैध उद्योगांवरही नजर ठेवता येणार आहे.

रायगड जिल्ह्यातील २० बंदरे सागरी सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे समोर आले होते. त्यामुळे अशा धोकादायक बंदरांवरील सुरक्षा यंत्रणांचा आढावा घेऊन उपाययोजना करणे आवश्यक होते. या ठिकाणी सीसीटीव्ही तैनात झाले तर किनारपट्टीवर चालणाºया अवैध उद्योगांना अटकाव होईल आणि सुरक्षाही बळकट होण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्याला मुंबई बॉम्बस्फोटाचा इतिहास आहे. १९९२-९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले आरडीएक्स श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी समुद्रामार्गे मुंबईमध्ये दाखल झाले होते. त्याचप्रमाणे जिल्ह्यात असणाºया बंदरांवर परदेशातून मोठ्या संख्येने मालवाहू जहाजे येतात. त्यामुळे बंदरांवरील घटनांवर नजर ठेवणे आवश्यक आहे.

जिल्ह्याला २१० किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून शेतीबरोबरच मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. जिल्ह्यात १ हजार ४९९ बिगरयांत्रिकी नौका आहेत, तर ३ हजार ४४४ यांत्रिकी नौका आहेत. आजही जवळपास ३० हजारांहून अधिक कुटुंबे मासेमारीवर अवलंबून आहेत. दरवर्षी सुमारे ३९ हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादन घेतले जाते. यातील ३० टक्के उत्पादन परदेशात निर्यात केले जाते आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून मच्छीमारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मच्छीमारांमध्ये वाद विकोपाला गेले आहेत. पर्ससिन नेट आणि एलईडीच्या साहाय्याने चालणारी मासेमारी यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने सर्वच यंत्रणांची झोप उडत आहे.रायगड जिल्ह्यातील संवेदनशील बंदरमांडवा, रेवस, आरसीएफची जुनी जेट्टी, थळ नागाव, अलिबाग मुख्य समुद्र, रेवदंडा समुद्र - १ आणि २, साळाव-नांदगाव, मुरूड-खोरा, आगरदांडा-१, राजपुरी, दिघी बंदर जेट्टी, दिघी प्रवासी जेट्टी, जीवना बंदर, शेखाडी, बागमांडला, मांदाड, दादर, आंबेत या बंदरांवर सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.मच्छीमार जेट्ट्या आणि बंदरांवर होणाºया वाहतुकीवर नजर राहावी, अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्यांना अटकाव करता यावा आणि सागरी सुरक्षा बळकट व्हावी या उद्देशाने आता सर्व मासेमारी बंदरांवर टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. किनारपट्टीवरील अनधिकृत मासेमारीला अटकाव बसेल त्याचप्रमाणे किनाºयांची सुरक्षा वाढेल, असा विश्वास मत्स्य व्यवसाय विभागाने व्यक्त केला आहे.सरकारने एलईडीच्या साह्याने होणाºया मासेमारीस बंदी घातली आहे. पण तरीही जास्त मत्स्य उत्पादन मिळावे, या हव्यासापोटी काही मच्छीमारांकडून एलईडी दिव्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाºया मच्छीमारांची आर्थिक कोंडी होत आहे. पारंपरिक विरुद्ध आधुनिक मच्छीमार असा वाद निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन आता मच्छीमार जेट्यांवर सुरक्षात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत.रायगड जिल्ह्यातील सर्व मासेमारी बंदरांचे सर्वेक्षण करून तेथे सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सीसीटीव्हीमुळे बेकायदा उद्योगांना आळा बसेल आणि बंदरे सुरक्षित राहण्यास मदत मिळेल. - सुरेश भारती, साहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय विभाग, रायगड

टॅग्स :cctvसीसीटीव्ही