शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

चांदईजवळील रस्त्याचा भराव गेला वाहून; रस्त्याकडेला वाढले गवत, अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 03:55 IST

तालुक्यातील चिंचवलीकडून कडावकडे आणि पुढे तांबस मार्गे दहिवली-कर्जत या राज्यमार्गावर चांदई गावाच्या परिसरात रस्त्याचा काही भराव पावसामुळे खचला व काही भाग वाहून गेला आहे.

कर्जत : तालुक्यातील चिंचवलीकडून कडावकडे आणि पुढे तांबस मार्गे दहिवली-कर्जत या राज्यमार्गावर चांदई गावाच्या परिसरात रस्त्याचा काही भराव पावसामुळे खचला व काही भाग वाहून गेला आहे. या भागात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असल्याने वाहनांना या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे.आठ वर्षांपूर्वी कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर चिंचवली गावाजवळून कडावकडे जाणारा रस्ता राज्यमार्गात वर्ग केला. त्या रस्त्याचे रुंदीकरण केले असून, अनेक ठिकाणी हा रस्ता अरुं द आहे. बहुतेक ठिकाणी जुन्या पाइप-मोºया न बदलता केवळ त्या ठिकाणी सिमेंटचे कठडे बांधण्यात आले. मात्र, पावसात या राज्यमार्ग नाव असलेल्या रस्त्यावर चांदईगावाच्या परिसरात मोठे भगदाड पडले आहे.चिंचवली गावाकडून जाताना लागणाºया प्राथमिक शाळेच्या पुढे हे भगदाड रस्त्याच्या डाव्या बाजूला पडले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता ही त्या संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या गवतामुळे निर्माण झाली आहे. त्या गवताने अर्धा रस्ता व्यापला असून, वळणावर समोरून येणारी वाहनेदेखील दिसत नाहीत. मात्र, ज्या ठिकाणी रस्त्याचा भराव वाहून गेला आहे, त्या ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाणारा नालादेखील आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाºया वाहनांनी अगदी त्याच ठिकाणी गवतातून आपले वाहन नेल्यास त्यांचे वाहन थेट नाल्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रस्त्यावर पडलेल्या त्या भगदाड आणि वाहून गेलेल्या भरावाबाबत स्थानिक ग्रामस्थ आणि रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या सहारा कोळंबे यांनी कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना केली होती. पावसाळा अर्ध्यावर असताना केलेली सूचना पावसाळा संपून गेला तरी त्यावर कार्यवाही झाली नाही. त्याबाबत जिल्हा परिषद सदस्या कोळंबे यांनी संताप व्यक्त केलाआहे.त्या ठिकाणी मातीचा भराव टाकून दुरु स्ती करण्याचे काम करता येत नसेल तर किमान रस्त्यावर अपघाताचा धोका आहे, याची माहिती देणारा फलक किंवा त्या ठिकाणी चुना दगडांना रंगवून सूचना देण्याची तसदी देखील कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने आजपर्यंत घेतली नाही.

टॅग्स :Raigadरायगड