शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

धरमतर बंदरातून पुन्हा सुरू होणार कार्गो, कंटेनर वाहतूक; चौथे बंदर कार्यान्वित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 04:33 IST

बीएमसीटी प्रा.लि., पीएनपी मेरिटाइम सर्व्हिस प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमान जेएनपीटी आणि धरमतर बंदराला जोडणारा जलमार्ग २०१७अखेरीस पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

- मधुकर ठाकूर उरण : बीएमसीटी प्रा.लि., पीएनपी मेरिटाइम सर्व्हिस प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमान जेएनपीटी आणि धरमतर बंदराला जोडणारा जलमार्ग २०१७अखेरीस पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे जलमार्गावरून कंटेनर मालाची वाहतूक करण्याचा मार्ग खुला होणार असल्याची माहिती पीएनपी भारत मुंबई प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.धरमतर बंदरात २०१२ पर्यंत पडाव आणि बार्जमधून याआधी कार्गो, कंटेनर मालाची वाहतूक केली जात होती. धरमतर बंदर हे या भागातील कार्गाे मालकांसाठी माल उतरून घेण्याचे आणि पाठविण्याचे प्रमुख ठिकाण होते. मात्र, जेएनपीटी बंदराकडे वाढीव क्षमता नसल्याने २०१२च्याअखेरीस ही सेवा बंद करणे भाग पडले.२०१७च्याअखेरीस जेएनपीटी अंतर्गत बीएमसीटी हे चौथे बंदर कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे जेएनपीटी ते धरमतर दरम्यान पडाव, बार्जद्वारे होणारी दैनंदिनी कंटेनर वाहतूक सेवा हाताळण्यासाठी पीएनपी मेरिटाइम सर्व्हिस प्रा.लि. आणि बीएमसीटी प्रा.लि. यांच्याशी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे आता पीएनपीला बीएमसीटी धरमतर येथील केंद्रातून ८० टीईयू २० फुटी इतक्या आकाराच्या माालाचे कंटेनर बार्जच्या साहाय्याने पुन्हा सुरू करता येणार आहेत. यामुळे कार्गाे मालकांचा खर्चही कमी होईल व त्यांच्या वेळेचीही बचत होणारआहे. बीएमसीटी आणि धरमतर यांच्या सागरी मार्गात पुन्हा एकदा पडाव आणि बार्जद्वारे कार्गो कंटेनर मालाची वाहतूक सुरू होण्याची प्रतीक्षा कंपनीलाही लागून राहिल्याची प्रतिक्रिया पीएनपीचे संचालक सचिन टिपणीस यांनी व्यक्त केली.धरमतर हे एक तीन प्रकारच्या दळणवळणाची यंत्रणा उपलब्ध असलेले (ट्रायमॉडल) कार्यरत बंदर आहे. राष्ट्रीय महामार्ग-१७ पासून केवल दोन कि.मी. अंतरावर आहे. रेल्वे आणि जलमार्ग अशा दोन्ही प्रकारच्या दळणवळणाच्या सुविधा इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा भारही कमी होण्यास मोठी मदत होईल. धरमतर येथील बंदर व्यापारासाठी आणि कंटेनर मालाची ने-आण आणि हाताळणी करण्यासाठी सक्षम असून, कंटेनर आणि कार्गो वाहतुकीशी संबंधित गोदाम, कंटेनर दुरुस्ती आदी आवश्यक सर्व सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळेच या परिसरातील व्यापाºयांना नवसंजीवनी मिळावी, यासाठी बीएमसीटीच्या बरोबरीने काम करण्याचा निर्णय घेतला आहे- सचिन टिपणीस, संचालक, पीएसपीधरमतर सारख्या बंदरातून बार्ज आणि पडावातून कार्गो आणि कंटेनर वाहतूक करण्यासाठी बीएमसीटीने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. बीएमसीटी हा भारतीय बंदर आणि वाहतूक बाजारपेठेत लक्षणीय बदल घडवून आणणारा प्रकल्प आहे. २०१७च्या अखेरीस हा बीएमसीटी बंदर प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. भारत सरकारच्या बंदर विकासलक्षी सागरमाला उपक्रमाचा एक भाग असलेल्या या उपक्रमात पीएनपीच्या सोबत काम करण्यास उत्सुक आहोत.- सुरेश अमिरापू ,सीईओ, बीएमसीटी