शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

‘क्यार’ चक्रिवादळामुळे पर्यटनाला फटका; श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 06:33 IST

दिघी किनाऱ्यावर आलेल्या मच्छीमारांना श्रीवर्धन तहसीलकडून सुविधा

गणेश प्रभाळे/संजय करडे दिघी : ‘क्यार’ या चक्रिवादळाचा तडाखा श्रीवर्धनमधील किनारपट्टीला बसला आहे. दिघी खाडीतून होणारी दिघी-आगरदांडा ही जलवाहतूक उशिरा सुरू आहे. ‘क्यार’ वादळाचा ऐन दिवाळीत श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला मोठा फटका बसला असून समुद्रकिनारी सध्या शुकशुकाट दिसत आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांना रोजगार मिळवण्यासाठी हाच कालावधी महत्त्वाचा असतो. दिवाळीमध्ये पर्यटन हळूहळू वाढू लागते. मुंबई, पुणे, साताराहून येणारे पर्यटक दिघी जंगलजेटी मार्गे फेरी बोटीने येतात. यामुळे श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर अशा विस्तीर्ण समुद्रकिनाºयाला पर्यटकांची चांगलीच पसंती राहते. सध्या ‘क्यार’ वादळाचा फटका तालुक्यातील पर्यटनाला बसला आहे. शिवाय, गुरुवारपासून दिवसा व रात्री पावसाच्या हलक्या सरी पडल्या. शनिवारी दिवसभर वातावरण ढगाळ होते. पुढे अवकाळी पावसामुळे भातशेती तसेच कडधान्ये पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या वर्षी गणेशोत्सवात झालेली अतिवृष्टी व सध्याच्या दिवाळी उत्सवात पडणाºया पावसामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.

सद्या वादळाची दिशा बदली असल्याची माहिती श्रीवर्धन प्रशासनाकडून देण्यात आली. श्रीवर्धन तालुक्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. क्यार वादळामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी घेत असल्याचे दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक शेलार यांनी सांगितले. क्यार चक्रिवादळामुळे झालेल्या हवामानातील बदलामुळे, वादळी वाºयामुळे दिघी ते आगरदांडा ही प्रवासी वाहतूक उशिरा सुरू असल्याची माहिती दिघी बंदर निरीक्षक प्रकाश गुंजाळ यांनी दिली.वादळामुळे नौका तीन दिवस दिघी बंदराच्या आश्रयाला१) खोल समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या मच्छीमारांनी गुरुवार सायंकाळी वादळापासून सुरक्षिततेसाठी श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदराच्या खाडीत आश्रय घेतला आहे. या वेळच्या बदलत्या वातावरणामुळे मासेमारी व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. यंदाची मासेमारीची सुरुवात मोठ्या कालावधीने रडतखडत सुरू झाली. आता अचानक वादळी वाºयाचे संकट आल्याने अनेक जिल्ह्यांतील मच्छीमार नौका दिघी खाडीकिनाºयालगत विसावल्या आहेत. पावसामुळे व बदलत्या हवामानामुळे समुद्रातील माशांचे प्रमाण कमी झाले असून त्यामुळे मच्छीमारी व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असल्याची भावना याप्रसंगी मच्छीमारांनी व्यक्त केली.प्रशासनाची सतर्कता

२) श्रीवर्धन तहसील व दिघी सागरी पोलीस ठाण्याकडून दिघी बंदर परिसरात मच्छीमारांची भेट घेण्यात आली. क्यार वादळामुळे व समुद्रातील संभाव्य भीतीमुळे इतर राज्ये तसेच जिल्ह्यातील मासेमारी करणाºया बोटी दिघी किनारी लागल्या असल्याने श्रीवर्धन तहसीलकडून या बोटींवरील खलाशांसाठी औषधे व टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा करण्यात आला. या वेळी दिघी बंदर येथे तहसीलदार सचिन गोसावी, दिघी सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक एम. आर. शेलार, पोलीस कर्मचारी संदीप चव्हाण, मंडळ अधिकारी सुनील मोरे, तलाठी सोरे, आरोग्यसेवक कासारे व कोतवाल गणेश महाडिक उपस्थित होते.व्यावसायिकांचा दिवाळी हंगाम गेला वायारायगड हा पर्यटनाचा जिल्हा आहे, त्यामुळे येथे पर्यटकांची वर्दळ असते, त्यात दिवाळी आणि उन्हाळी सुट्टींमध्ये मोठी गर्दी येथे असते. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय या हंगामात जोरात असतो. मात्र, क्यार वादळ आणि पाऊसाचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांची पंचायत झाली आहे.चिंता वाढलीयंदा जिल्ह्यात झालेल्या विक्रमी पावसाचा सर्वाधिक फटका हा शेतकºयांना बसला आहे. त्यात पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने चिंता वाढली आहे.

टॅग्स :Kyarr Cyclonक्यार चक्रीवादळtourismपर्यटन