शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

‘क्यार’ चक्रिवादळामुळे पर्यटनाला फटका; श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 06:33 IST

दिघी किनाऱ्यावर आलेल्या मच्छीमारांना श्रीवर्धन तहसीलकडून सुविधा

गणेश प्रभाळे/संजय करडे दिघी : ‘क्यार’ या चक्रिवादळाचा तडाखा श्रीवर्धनमधील किनारपट्टीला बसला आहे. दिघी खाडीतून होणारी दिघी-आगरदांडा ही जलवाहतूक उशिरा सुरू आहे. ‘क्यार’ वादळाचा ऐन दिवाळीत श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला मोठा फटका बसला असून समुद्रकिनारी सध्या शुकशुकाट दिसत आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांना रोजगार मिळवण्यासाठी हाच कालावधी महत्त्वाचा असतो. दिवाळीमध्ये पर्यटन हळूहळू वाढू लागते. मुंबई, पुणे, साताराहून येणारे पर्यटक दिघी जंगलजेटी मार्गे फेरी बोटीने येतात. यामुळे श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर अशा विस्तीर्ण समुद्रकिनाºयाला पर्यटकांची चांगलीच पसंती राहते. सध्या ‘क्यार’ वादळाचा फटका तालुक्यातील पर्यटनाला बसला आहे. शिवाय, गुरुवारपासून दिवसा व रात्री पावसाच्या हलक्या सरी पडल्या. शनिवारी दिवसभर वातावरण ढगाळ होते. पुढे अवकाळी पावसामुळे भातशेती तसेच कडधान्ये पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या वर्षी गणेशोत्सवात झालेली अतिवृष्टी व सध्याच्या दिवाळी उत्सवात पडणाºया पावसामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.

सद्या वादळाची दिशा बदली असल्याची माहिती श्रीवर्धन प्रशासनाकडून देण्यात आली. श्रीवर्धन तालुक्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. क्यार वादळामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी घेत असल्याचे दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक शेलार यांनी सांगितले. क्यार चक्रिवादळामुळे झालेल्या हवामानातील बदलामुळे, वादळी वाºयामुळे दिघी ते आगरदांडा ही प्रवासी वाहतूक उशिरा सुरू असल्याची माहिती दिघी बंदर निरीक्षक प्रकाश गुंजाळ यांनी दिली.वादळामुळे नौका तीन दिवस दिघी बंदराच्या आश्रयाला१) खोल समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या मच्छीमारांनी गुरुवार सायंकाळी वादळापासून सुरक्षिततेसाठी श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदराच्या खाडीत आश्रय घेतला आहे. या वेळच्या बदलत्या वातावरणामुळे मासेमारी व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. यंदाची मासेमारीची सुरुवात मोठ्या कालावधीने रडतखडत सुरू झाली. आता अचानक वादळी वाºयाचे संकट आल्याने अनेक जिल्ह्यांतील मच्छीमार नौका दिघी खाडीकिनाºयालगत विसावल्या आहेत. पावसामुळे व बदलत्या हवामानामुळे समुद्रातील माशांचे प्रमाण कमी झाले असून त्यामुळे मच्छीमारी व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असल्याची भावना याप्रसंगी मच्छीमारांनी व्यक्त केली.प्रशासनाची सतर्कता

२) श्रीवर्धन तहसील व दिघी सागरी पोलीस ठाण्याकडून दिघी बंदर परिसरात मच्छीमारांची भेट घेण्यात आली. क्यार वादळामुळे व समुद्रातील संभाव्य भीतीमुळे इतर राज्ये तसेच जिल्ह्यातील मासेमारी करणाºया बोटी दिघी किनारी लागल्या असल्याने श्रीवर्धन तहसीलकडून या बोटींवरील खलाशांसाठी औषधे व टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा करण्यात आला. या वेळी दिघी बंदर येथे तहसीलदार सचिन गोसावी, दिघी सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक एम. आर. शेलार, पोलीस कर्मचारी संदीप चव्हाण, मंडळ अधिकारी सुनील मोरे, तलाठी सोरे, आरोग्यसेवक कासारे व कोतवाल गणेश महाडिक उपस्थित होते.व्यावसायिकांचा दिवाळी हंगाम गेला वायारायगड हा पर्यटनाचा जिल्हा आहे, त्यामुळे येथे पर्यटकांची वर्दळ असते, त्यात दिवाळी आणि उन्हाळी सुट्टींमध्ये मोठी गर्दी येथे असते. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय या हंगामात जोरात असतो. मात्र, क्यार वादळ आणि पाऊसाचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांची पंचायत झाली आहे.चिंता वाढलीयंदा जिल्ह्यात झालेल्या विक्रमी पावसाचा सर्वाधिक फटका हा शेतकºयांना बसला आहे. त्यात पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने चिंता वाढली आहे.

टॅग्स :Kyarr Cyclonक्यार चक्रीवादळtourismपर्यटन