शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाची हेळसांड थांबणार; रुग्णवाहिकेचे केले शववाहिनीत रूपांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 01:32 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी केला अधिकाराचा वापर

अलिबाग : जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत एक रुग्णवाहिका २४ तास जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या परिसरात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या मृतदेहाची आता हेळसांड होणार नाही.

रायगडमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाची हेळसांड’ या मथळ्याखाली लोकमतने २१ मे रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. याची गंभीर दखल जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अलिबागच्या सरकारी रुग्णालयामध्ये कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर या रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी कोणतीच रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती.

जिल्ह्यामध्ये एकट्या खोपोली शहरामध्ये शववाहिनीची व्यवस्था आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेतून मृतदेह अंत्यविधीसाठी नेणे गरजेचे होते. मृतांच्या नातेवाइकांनी फारच कष्ट घेत कशी तरी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून घेतली. त्यानंतर या मृतदेहाला स्मशानभूमीत नेता आले. यातील गंभीर बाब हीच आहे की, जिल्ह्यामध्ये एकही शववाहिनीची व्यवस्था नाही.

कोरोनाच्या कालावधीत मृतदेहाची हेळसांड होत असल्याने तातडीने शववाहिनी उपलब्ध होणे गरजेचे होते. याची गंभीर दखल जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेतली. त्यानंतर एक खासगी रुग्णवाहिका जिल्हा प्रशासनामार्फत अधिग्रहित करण्यात आली आहे. सध्या याच रग्णवाहिकेतून कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णाचे मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी ‘लोकमत’ला दिली. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करत एका रुग्णवाहिकेचे रूपांतर शववाहिनीत केले आहे, असेही डॉ. गवई यांनी सांगितले.

कायमस्वरूपी शववाहिनी खरेदी करावी

जिल्हा प्रशासनाकडे लाखो रुपयांचा आपत्ती निधी जमा झालेला आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकारनेही कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. याच निधीच्या माध्यमातून प्रशासनाने कायमस्वरूपी शववाहीनी खरेदी करावी, अशी मागणी होत आहे. आपत्तीच्या कालावधीत जिल्हाधिकारी आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून असा निर्णय घेऊ शकतात.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड