शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मशालींच्या प्रकाशात उजळली स्वराज्याची राजधानी, पहिला दिवा महाराजांच्या चरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 19:43 IST

श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड या संस्थेच्या वतीने नुकताच ३ व ४ नोव्हेंबरला शिवचैतन्य सोहळा पार पडला.

- रोहित नाईकपाचाड (रायगड) : दरवर्षी तिथीनुसार स्वराज्याची राजधानी किल्ले रायडावर शिवराजाभिषेक सोहळा साजरा करणाऱ्या श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड या संस्थेच्या वतीने नुकताच ३ व ४ नोव्हेंबरला शिवचैतन्य सोहळा पार पडला. यावेळी तब्बल ३४५ मशाली व पणत्या प्रज्ज्वलित करून पुन्हा एकदा किल्ले रायगड उजळविण्यात आला.महाराष्ट्राच्या विविध परिसरांतून मोठ्या संख्येने आलेल्या शिवभक्तांनी यावेळी पारंपरिक वेशभूषेत मशाली प्रज्ज्वलित करून किल्ले रायगड उजळवला. ऐन दिवाळीमध्ये स्वराज्याची राजधानी अंधारात असते आणि ही सल प्रत्येक शिवभक्ताला असल्यानेच पहिला दिवा महाराजांच्या चरणी, त्यानंतर आपल्या दारी असा निश्चय करत गेल्या सात वर्षांपासून हा नयनरम्य सोहळा पार पडत आहे. सुमारे ५०० हून अधिक शिवभक्तांनी या सोहळ्याची सुरुवात शिरकाई देवीच्या पूजनाने केली. येथून सर्वांनी एक व्यक्ती एक मशाल याप्रमाणे मशाली प्रज्वलित केल्या आणि या मशालींच्या उजेडात तसेच आम्ही मावळे ढोल ताशा पथकाच्या दणकेबाज सादरीकरणामध्ये महाराजांच्या पालखीची मिरवणूक निघाली.होळीच्या माळावर शिवरायांना मानवंदना दिल्यानंतर बोरिवली येथील आम्ही मावळे ढोल ताशा पथकाने सर्वांना आपल्या वादनाने मंत्रमुग्ध केले. मध्यरात्री १२च्या सुमारास राजदरबारामध्ये पालखी आणल्यानंतर अवघा दरबार मशालींच्या उजेडात प्रकाशमय झाला. महाराजांचे पूजन झाल्यानंतर उपस्थित शिवशाहीरांनी रात्र जागवून रायगडावर पुन्हा एकदा शिवशाहीचा अनुभव करुन दिला. यानंतर ४ नोव्हेंबरला पहाटे ५ वाजता रायगडावर दीपोत्सव सोहळा पार पडला. यावेळी ३४५ पणत्यांच्या उजेडात किल्ले रायगड उजळला. तसेच समितीच्या वतीने गडावरील प्रत्येक घरामध्ये फराळ वाटप करुन या सोहळ्याची सांगता झाली.-----------------------आकर्षक रोषणाई...यंदा पहिल्यांदाच महाराजांच्या मेघडंबरीवर करण्यात आलेली आकर्षक रोषणाईने लक्ष वेधणारी ठरली. आम्ही मावळे संस्थेच्या प्रथमेश गव्हाणे आणि संदीप पिळके या तरुणांनी तब्बल ३-४ तासांची मेहनत घेत महाराजांचे सिंहासन उजळवले. यावेळी संपूर्ण मेघडंबरीला फुलांची सजावट करण्यात आली होती आणि त्यावर आकर्षक रोषणाई केल्याने हे नयनरम्य दृश्य या सोहळ्यात लक्षवेधी ठरले.-----------------------दिवाळीला आपण आपल्या घरी रोषणाई करतो, सर्व परिसर दिव्यांनी उजळवतो. पण शिवछत्रपतींच्या किल्ले रायगडाचे काय? राजदरबाराचे काय? ते दिवाळीतही अंधारातच असतात. तिथे दिव्यांची रोषनाई करणे हे आपले कर्तव्य आहे. ऐन दिवाळीत आपली राजधानी अंधारात राहणे हे कोणत्याही शिवभक्ताला पटणारे नसल्यानेच आम्ही दरवर्षी शिवचैतन्य सोहळा आयोजित करतो आणि यापुढेही हा सोहळा असाच सुरू राहील.- सुनील पवार, अध्यक्ष - श्री शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती