शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

आधुनिक करंजा बंदरात क्षमता १००० मासेमारी बोटींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 04:27 IST

प्रधान सचिवांनी केली पाहणी : प्रस्ताव देण्याचे दिले निर्देश

अलिबाग : जिल्ह्यातील मासळीला चांगली मागणी आहे. मात्र मिळणारे बाजारमूल्य वाढवायचे असेल तर मासेमारी करताना त्यासोबत मासे प्रक्रिया व साठवणुकीलाही चालना देणे आवश्यक आहे. त्यासाठी करंजा बंदरात आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव द्यावा, प्रस्तावित बंदरात १००० मासेमारी बोटींची ये- जा व माल चढवणे- उतरवण्याची क्षमता असेल,असे निर्देश राज्याचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांनी गुरुवारी करंजा बंदर भेटीच्या प्रसंगी दिले आहेत.

अनुपकुमार यांनी करंजा येथे बंदर पाहणी करून मच्छीमारांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, प्रादेशिक उपायुक्त युवराज चौगुले, सह आयुक्त मत्स्यव्यवसाय राजेंद्र जाधव, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य अभियंता डॉ. महेश डेकाटे, रायगडचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय अभयसिंह शिंदे-इनामदार तसेच करंजा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष शिवदास नाखवा उपस्थित होते. यावेळी मच्छीमार सहकारी संस्थांचे चाळीसहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.सद्यस्थितीत करंजा येथे १४९ कोटी रु पये खर्चून मासेमारीसाठी बंदर उभारणीचे काम निविदास्तरावर आहे. पूर्वीच्या आराखड्यात सुचविलेल्या सुधारणांचा अंतर्भाव करून नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. बंदर निर्मिती प्रक्रि या ही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांचेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. प्रस्तावित बंदरात १००० मासेमारी बोटींची ये- जा व माल चढवणे- उतरवण्याची क्षमता असेल. ससून डॉक येथील भार कमी करण्यासाठी मदत होईल.२०० मेट्रिक टन बर्फनिर्मिती कारखाना, लिलावगृहमच्छीमारांशी चर्चा करताना, अनुपकुमार यांनी मासे साठवणुकीसाठी २०० मेट्रिक टन बर्फ निर्मिती कारखाना बंदर परिसरात प्रस्तावित करण्यात येईल असे सांगितले. तर मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या डिझेल प्रतिपूर्तीसंदर्भात वेळेत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले. या बंदरात वातानुकूलित लिलावगृह उभारणीही होणार असल्याने मच्छीमारांची सोय होईल.लाकडी नौकांचे फायबर नौकांमध्ये रूपांतरएलईडी मासेमारीवर पूर्णत: बंदी असून त्या बंदीचे उल्लंघन करणाºयांवर सक्त कारवाई करावी असे निर्देश अनुपकुमार यांनी दिले. तसेच सागरी मासेमारी नियमन अधिनियम अंमलबजावणी करु न ट्रॉलरवरील जाळ्याच्या आसाचा आकार ४० मिमीवर आणावा, असेही निर्देशित केले. जुन्या लाकडी नौकांचे फायबर नौकांमध्ये रु पांतर करु न आधुनिकीकरण करण्यासाठीचे प्रस्तावही लवकरात लवकर सादर करावे, असे निर्देश त्यांनी अखेरीस दिले. 

टॅग्स :alibaugअलिबागRaigadरायगडfishermanमच्छीमार