शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

विहित वेळेत कालवे खोदले नाहीत

By admin | Updated: May 10, 2017 00:17 IST

मुरुड तालुक्यातील आंबोली धरण बांधून पाच ते सहा वर्षे पूर्ण झाली असतील, परंतु कालव्याचे पाणी शेतीला विहित वेळेत

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव/ मुरुड : मुरुड तालुक्यातील आंबोली धरण बांधून पाच ते सहा वर्षे पूर्ण झाली असतील, परंतु कालव्याचे पाणी शेतीला विहित वेळेत न सोडल्याने असंख्य कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून याला संबंधित शासन जबाबदार असल्याचा निर्वाळा अलिबाग-मुरूडचे आमदार पंडित पाटील यांनी दिला आहे. यासाठी येत्या अधिवेशनात आवाज उठवू असा इशारा दिला आहे.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी करून सुद्धा ही मागणी दुर्लक्षित झाली आणि मे महिन्यात शेतीला पाणी सोडले गेले नाही तर जमिनी कोरड्या पडून नापीक होण्याचा धोका यावेळी आमदार पंडित पाटील यांनी व्यक्त केला आहे. कोकणातील शेतकरी पाणी असून सुद्धा उपाशी राहिला असल्याची टीका यावेळी आमदार पाटील यांनी केली आहे. पाणीप्रश्नाबाबत ते आपली भूमिका स्प्ष्ट करताना पत्रकारांशी बोलत होते.यावेळी आमदार पाटील म्हणाले की,कालव्याने जर शेतीला पाणी पुरवठा झाला तर धरणातील पाणी वाहून गेल्याने पाणी जमिनीत मुरेल त्यामुळे आजूबाजूला असणारे विहिरी, तलावे व नाले यांना भरपूर प्रमाणात पाणी लागू शकते. परंतु हेच धोरण नेमके शासनाने उलटे लागू केले आहे. जर धरणातील पाणी बंदिस्त पाइपने पुरविले तर त्याचा फायदा आजूबाजूला असणाऱ्या नद्या व तलावांना होणार नाही. मग असे बंदिस्त पाइप लाइनचे धोरण काय उपयोगाचे याचा शासनाने गंभीर विचार करावा, अन्यथा येत्या अधिवेशनात यावर आवाज उठवू असा इशारा आमदार पंडित पाटील यांनी दिला.