शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
3
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
4
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
5
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
6
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
7
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
8
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
9
'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
10
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
11
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
12
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
13
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!
14
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
15
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
16
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
17
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
18
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
19
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
20
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार

विहित वेळेत कालवे खोदले नाहीत

By admin | Updated: May 10, 2017 00:17 IST

मुरुड तालुक्यातील आंबोली धरण बांधून पाच ते सहा वर्षे पूर्ण झाली असतील, परंतु कालव्याचे पाणी शेतीला विहित वेळेत

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव/ मुरुड : मुरुड तालुक्यातील आंबोली धरण बांधून पाच ते सहा वर्षे पूर्ण झाली असतील, परंतु कालव्याचे पाणी शेतीला विहित वेळेत न सोडल्याने असंख्य कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून याला संबंधित शासन जबाबदार असल्याचा निर्वाळा अलिबाग-मुरूडचे आमदार पंडित पाटील यांनी दिला आहे. यासाठी येत्या अधिवेशनात आवाज उठवू असा इशारा दिला आहे.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी करून सुद्धा ही मागणी दुर्लक्षित झाली आणि मे महिन्यात शेतीला पाणी सोडले गेले नाही तर जमिनी कोरड्या पडून नापीक होण्याचा धोका यावेळी आमदार पंडित पाटील यांनी व्यक्त केला आहे. कोकणातील शेतकरी पाणी असून सुद्धा उपाशी राहिला असल्याची टीका यावेळी आमदार पाटील यांनी केली आहे. पाणीप्रश्नाबाबत ते आपली भूमिका स्प्ष्ट करताना पत्रकारांशी बोलत होते.यावेळी आमदार पाटील म्हणाले की,कालव्याने जर शेतीला पाणी पुरवठा झाला तर धरणातील पाणी वाहून गेल्याने पाणी जमिनीत मुरेल त्यामुळे आजूबाजूला असणारे विहिरी, तलावे व नाले यांना भरपूर प्रमाणात पाणी लागू शकते. परंतु हेच धोरण नेमके शासनाने उलटे लागू केले आहे. जर धरणातील पाणी बंदिस्त पाइपने पुरविले तर त्याचा फायदा आजूबाजूला असणाऱ्या नद्या व तलावांना होणार नाही. मग असे बंदिस्त पाइप लाइनचे धोरण काय उपयोगाचे याचा शासनाने गंभीर विचार करावा, अन्यथा येत्या अधिवेशनात यावर आवाज उठवू असा इशारा आमदार पंडित पाटील यांनी दिला.