शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

पुण्यातील तरुणांची निसर्ग संवर्धनाची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 01:23 IST

१००० किमीची सायकल यात्रा : पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापनाविषयी जनजागृती

श्रीवर्धन : देशातील तरुणाईच्या कृतीवर देशाचे भवितव्य अवलंबून असते. सुजाण व कर्तव्य दक्ष तरुण आपल्या विविध कृती द्वारे समाजाचे ऋण सदैव फेडत असतात. देशा प्रती असलेले कर्तव्य पार पाडण्यात तरुण पिढी अग्रणी आहे .त्याचे उत्तम उदाहरण पुण्यातील चार तरुणांनी सायकलस्वारी द्वारे अधोरेखित केले आहे. सायकल यात्रेव्दारे हे तरूण पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापना विषयी जनजागृती करत आहेत.

सायकल प्रेमीं ग्रुप (पुणे) तर्फे दर वर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये सायकल यात्रेचे आयोजन केले जाते. हे सायकल यात्रेचे तिसरे वर्ष आहे. पहिला वर्षी पुणे - अहमदनगर- पुणे असा ३०० किमीचा प्रवास वाहतुकीचे नियम पालन व अपघातग्रस्तांना मदत या विषयी जनजागृती केली होती. दुसऱ्या सायकल यात्रामध्ये अवयवदान जन जागृतीसाठी पुणे- चंद्रपूर अशी सायकल यात्रा केली होती. ही सायकल यात्रा साधारण ११०० किमी केली. यावर्षी किसन ताकमोडे, राजेंद्र सोनवणे, सतीश ठाकरे व गणेश मुसळे या सर्व मित्रांनी एकत्र येऊन कोकण सायकल यात्रा मोहीम सुरू केली आहे. ही सायकल यात्रा ११ दिवसाची आणि १००० किमीची आहे. सायकल यात्रामध्ये पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन विषयी जन जागृती करत आहेत. प्रवास मार्ग पुणे- महड - रायगड- महाड- हरिहरेश्वर - दापोली - गुहागर- गणपतीपुळे- चिपळूण - महाबळेश्वर- वाई - पुणे असा आहे. या प्रवासामध्ये सर्वसामान्य व्यक्ती, सामाजिक, शैक्षणिक संस्था आदी ठिकाणी तरुण भेट देत आहेत. हे सायकल स्वार हरिहरेश्वर येथे पोहचल्या नंतर सुयोग लांगी यांनी त्यांच्याशी चर्चा केली असता कोकणातील तरुणांना गावाकडे चला या हा संदेश आपण आपल्या पुढील भ्रमंतीत द्यावा असे सांगितले. सायकल स्वारांना हरिहरेश्वरमधील जनतेने योग्य सहकार्य करत पुढील मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या.आपण सर्व निसर्गाची अतोनात हनी करीत आहोत. पर्यावरणाचे संतुलन कायम बिघडत आहे, त्याचा परिमाण सर्व घटकांवर होत आहे. आपण सर्वांनी पर्यावरण संवर्धन केले पाहिजे.- राजेंद्र सोनवणे, सायकलस्वारसायकल यात्रा करण्यामागील उद्देशच्दर वर्षी दिवाळीच्या सुट्टीचा सदूपयोग व्हावा. सर्व समावेशक विषयी घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यत जनजागृती करून त्यानुसार कृतिशील बनवणे हा आहे. त्याचबरोबर निसर्ग परिसर, आपला भोवतीचा परिसर पाहणे व समाजातील प्रश्न समजवून घेऊन त्या दृष्टीने काही तरी कृतिशील उपाययोजना करणे अशा असंख्य गोष्टी आपणांस शिकायला मिळतात. ही अनुभवाची शिदोरी आयुष्यभर जीवन जगण्यासाठी कायम प्रेरणा देत राहणार आहे असे सायकलस्वार किसन ताकमोडे यांनी सांगितले . 

टॅग्स :Raigadरायगड