शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

केबल चालकांवर आसूड

By admin | Updated: September 29, 2015 01:25 IST

डिजिटलायझेशन अनिवार्य करण्यासाठी जिल्ह्यातील २१ बहुविध यंत्रणा परिचालकांवर (मल्टी सिस्टीम आॅपरेटर) सरकारने वेळेच्या बंधनाचा चाबूक उगारला आहे

आविष्कार देसाई , अलिबागडिजिटलायझेशन अनिवार्य करण्यासाठी जिल्ह्यातील २१ बहुविध यंत्रणा परिचालकांवर (मल्टी सिस्टीम आॅपरेटर) सरकारने वेळेच्या बंधनाचा चाबूक उगारला आहे. वेळेत काम पूर्ण केले नाही तर त्यांना प्रक्षेपणाचा मिळणारा सिग्नल बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आवडीच्या कार्यक्रमावर पाणी सोडावे लागू शकते. सेटटॉप बॉक्स उपलब्ध होत नसल्याचे कारण बहुविध यंत्रणा परिचालकांनी जिल्हा प्रशासनापुढे केले आहे. रायगड जिल्ह्यात २१ मल्टी सिस्टीम आॅपरेटर असून त्यांच्या खाली ५८९ केबल आयोजक आहेत. त्यांच्यामार्फत एकूण एक लाख २ हजार ९७८ केबल जोडण्या आहेत. पैकी ग्रामीण भागात ८७ हजार ११४ आणि शहरी भागात १५ हजार ८६४ केबल जोडण्या आले आहेत. ग्रामीण भागात ८३ हजार ७६४ तर शहरामध्ये ८७६ अशा एकूण ८४ हजार ६४० केबल जोडण्यांमध्ये सेटटॉप बॉक्स लागलेले नाही.नगर पालिकाक्षेत्रांमध्ये ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत सेटटॉप बॉक्स बसविणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागामध्ये ही मुदत ३१ डिसेंबर २०१६ अशी आहे. जिल्ह्यात एक लाख ८९ हजार ७१५ डीटीएच ग्राहक आहेत.पूर्वी करमणुकीची फारच कमी साधने अस्तित्वात होती. त्यामध्ये प्रामुख्याने गावच्या जत्रा आणि जत्रेमध्ये असणारे विविध खेळ, तमाशा, टुरिंग टॉकीजमधील सिनेमा यांचा त्यामध्ये समावेश होता. कालांतराने तंत्रज्ञानात प्रगती झाली. दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घरबसल्या मनोरंजनाचे साधन उपलब्ध करून दिले. त्यामध्येही सुरुवातीला एकच वाहिनी (चॅनल) दिसत होते. त्यानंतर डीडी मेट्रो हे चॅनल सुरू झाले. प्रेक्षकांना मनासारखे चॅनल पाहता येत नव्हते आणि न बघणाऱ्या चॅनलचा भुर्दंडही त्यांच्यावर पडत होता. त्यामुळे केंद्र सरकारने द केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन) अ‍ॅक्ट१९९५ हा कायदा आणला. या कायद्याच्या कलम ४ अन्वये दूरचित्रवाणीचे कार्यक्रम डिजिटल अ‍ॅड्रेसेबल सिस्टीमद्वारे प्रक्षेपित करावे लागणार आहेत. त्यासाठी सेटटॉप बॉक्स अनिवार्य करण्यात आला आहे.