शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बस सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 02:51 IST

नेरळ शहराला अनेक गावे, पाडे जोडली गेली आहेत. याठिकाणी प्राथमिक शिक्षण घेतल्यावर विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च शिक्षण घेण्यासाठी नेरळ शहर गाठावे लागते.

कर्जत : नेरळ शहराला अनेक गावे, पाडे जोडली गेली आहेत. याठिकाणी प्राथमिक शिक्षण घेतल्यावर विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च शिक्षण घेण्यासाठी नेरळ शहर गाठावे लागते. नेरळ विद्या भवन या शाळेतील अनेक विद्यार्थी जवळपासच्या गावातून येतात. परंतु शाळेच्या वेळेत एस.टी. नसल्याने विद्यार्थ्यांना अधिक पैसे देऊन खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो. याची दखल महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांनी घेतली असून शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी एसटी सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुखकर झाला आहे.नेरळ शहरालगत धामोते गावात नेरळ विद्या भवन शाळा आहे. पाचवी ते दहावीपर्यंत असलेल्या या शाळेत परिसरातील सुमारे ३३० विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेत येणारे विद्यार्थी नेरळ शहरातील आजूबाजूची गावे, पाडे, आदिवासी वाड्यातून येतात.प्राथमिक शिक्षण जवळपासच्या जिल्हा परिषदेच्या शाळांतून पूर्ण केल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नेरळमध्ये शिक्षणासाठी यावे लागते. नेरळ विद्या भवन शाळेत येण्यासाठी पूर्वी पिंपळोली, वंजारपाडा आदी भागातून एस.टी. बस येत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत यायची उत्तम सोय होत होती. सुमारे १०० विद्यार्थी बसने शाळेसाठी प्रवास करायचे. मात्र खराब रस्ते, कमी प्रवासी आदी कारण देऊन प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी बस सेवा रद्द केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त पैसे खर्च करून खासगी वाहनाने शाळेपर्यंत यावे लागत होते.विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन नेरळ विद्या भवन शाळेचे परिवहन समिती अध्यक्ष दिनेश कालेकर यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे बससाठी पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार मार्च महिन्यामध्ये गुडवन ते नेरळ बसच्या मार्गाची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यावर नेरळ विद्या भवन शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी बस सेवा सुरू केली आहे. बससेवेचे उद्घाटन कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ व उपतालुका प्रमुख अंकुश दाभणे यांच्या हस्ते करण्यात आले. ही बस सकाळी ७ वाजता गुडवन येथून सुटणार आहे. त्यानंतर आंत्रट, काळ्याची वाडी, पिंपळोली, ताळवाडे खुर्द, तळवाडे बुद्रुक, वंजारपाडा, हंबरपाडा, दहिवली व धामोते शाळा अशा मार्गे विद्यार्थी घेत येणार आहे. बस सेवा सुरू झाल्याने गैरसोय टळल्याने विद्यार्थ्यांसह पालकवर्गही आनंदित आहेत. बस फेरीच्या उद्घाटन कार्यक्र मासाठी जमलेल्या मान्यवरांनी शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले तर याच कार्यक्र मात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके सुद्धा वाटप करण्यात आली.