शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

शहापुरातील जिताडा व्हिलेजमध्ये पायाभूत सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:17 IST

१०३ तलावांच्या गावात रस्त्याची दुर्दशा; मत्स्यशेतीसह गृह पर्यटन उद्योगांची होणार भरभराट

- आविष्कार देसाई अलिबाग : जिल्ह्यात काही ठिकाणी शेतीचा व्यवसाय आतबट्याचा होत चालला आहे. शेतीला जोडधंदा उभारल्यास अन्नाचा पोशिंदा असलेला शेतकरी समाधानाने जगू शकतो. हाच धागा पकडून अलिबाग तालुक्यातील शहापूर गावातील शेतकऱ्यांनी तब्बल १०३ मत्स्य तलावांची निर्मिती केली आहे. ‘जिताडा व्हिलेज’ अशी ओळख संपादित केलेल्या शेतकऱ्यांना विविध पायाभूत सुविधांपासून ग्रासले आहे. सरकार आणि प्रशासनाने योग्य त्या सुविधा पुरविल्यास मत्स्यशेती आणि गृह पर्यटन अशा दुहेरी उद्योगांत भरभराट होण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविण्यात येत आहे.अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड येथील काही जमिनी या टाटा आणि रिलायन्सच्या प्रकल्पासाठी सुमारे १३ वर्षांपूर्वी संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रकल्पांना आवश्यक असणारे क्षेत्र ठरावीक मुदतीमध्ये संपादित करण्यात न आल्याने दोन्ही कंपन्यांना आपापले प्रकल्प गुंडाळावे लागले. या ठिकाणी शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. या ठिकाणच्या जमिनी सुपीक असल्याने शेतीवरच सर्वांचा उदरनिर्वाह चालतो. गावाला लागूनच खाडीचे क्षेत्र आहे. त्यामुळे उधाणाच्या वेळी खारबंदिस्ती तुटून पाणी शेतात घुसण्याचे प्रकार सातत्याने घडतच असतात. ग्रामस्थांनी एकत्र येत खारबंदिस्तीची कामे स्वखर्चाने केली आहेत.शेतीला जोडधंडा उभारताना परिसरात १०३ शेततळ्यांची निर्मिती केली आहे. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर आणि तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतूनच मत्स्यशेती करण्यात आली आहे. सुरुवातीला केवळ तीन शेततळ्यांची संख्या आज १०३ वर पोहोचली आहे. याच कारणांनी या गावाला ‘जिताडा व्हिलेज’ अशी नवीन ओळख मिळाली आहे.एक हेक्टरला सुमारे अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. शेतीच्या माध्यमातूनही सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. अतिशय संघर्षमय परिस्थितीत हा व्यवसाय तरुण उद्योजक करीत आहेत. या सर्व तलावांपर्यंत पोहोचण्यासाठी उन्हाळ्यात बांधावरून, तर पावसाळ्यात चिखल तुडवून जावे लागते. त्यामुळे पर्यटकांची इच्छा असतानाही तलावांपर्यंत जाता येत नाही. तसेच रस्ता नसल्याने मासे बाजारापर्यंत पोहोचवता येत नाहीत. त्यामुळे त्यांना चांगली किंमत मिळत नसल्याने आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत असल्याचे शेततळेधारक सुनील बाळाराम पाटील यांनी सांगितले.जिताडा व्हिलेजच्या माध्यमातून जिताडा विक्र ी आणि गृह पर्यटन असा दुहेरी उद्देश आहे. पर्यटनाद्वारे किमान तीन लाख रुपयांचा व्यवसाय तसेच अप्रत्यक्ष रोजगाराद्वारे अडीच लाख प्रति तलाव उत्पन्न मिळू शकते. या सर्व संकल्पना वास्तवात आणण्यासाठी सुमारे १०३ तलावांना जोडणारा रस्ता होणे अत्यंत गरजेचे असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी सांगितले.मुख्यमंत्री सडक योजनेच्या धर्तीवर ‘पालक मंत्री पाणद रस्ता’ (पाणवठ्यांकडे जाणारा रस्ता) अशी योजना दोन वर्षांपूर्वी सुरू झाली आहे. योजनेतून तलावांकडे जाणारे रस्ते निर्माण केल्यास शेतकºयांच्या हिताचे होणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे लेखी मागणी करण्यात आली असल्याचे भगत यांनी स्पष्ट केले.रायगडच्या जिल्हाधिकाºयांकडे पालकमंत्री पाणद रस्त्याचा नियोजित मार्ग, नकाशा सुपूर्द केला आहे. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार नियोजित रस्त्याचे सर्वेक्षण आणि स्थळपाहणी अलिबागचे तहसीलदार यांच्यामार्फत डिसेंबर २०१९ मध्ये करण्यात आले आहे. १०३ तलावांसाठी सध्या फक्त अडीच किलोमीटरच्या रस्त्याची आवश्यकता आहे. सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून दिल्यास समस्या सुटण्यास मदत होणार आहे.