शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

प्रवाशांची गैरसोय : म्हसळा-कोळवट रस्त्याची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:58 IST

प्रवाशांची गैरसोय : गेल्या १५ वर्षांपासून ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष

उदय कळस

म्हसळा : तालुक्यातील डोंगराळ दुर्गम भागात ताम्हणे करंबेवाडी, ताम्हणे करंबे, रातीवणे, कोळवट, भापट ही गावे वसलेली आहेत. या गावांना दळणवळण करण्यासाठी प्रवासाचे साधन म्हणजे कोळवट रस्ता. तो रस्ता गेली १५ वर्षे नादुरुस्त आहे. अनेक वेळा त्या गावांतील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडेदेखील रस्ता दुरुस्त करण्यासाठी लेखी निवेदन देऊन मागणी केली. मात्र वारंवार प्रस्ताव देऊनही कोणीही या रस्त्याच्या कामाकडे गांभीर्याने पाहत नसल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.

प्रस्तावांचा ढीग पडला असून आजही हा रस्ता दुर्लक्षित आहे. त्यासाठी कोळवट गावअंतर्गत सहा गावांनी पंचक्रोशी कमिटी स्थापन केली होती. रखडलेला रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते; परंतु सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. हा रस्ता गेली कित्येक वर्षे दगड-मातीचा आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थ दरवर्षी अंगमेहनत करून रस्त्यावर माती टाकून तात्पुरती अडचण दूर करतात; परंतु हे आणखी किती वर्षे असेच चालायचे, असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. आजपर्यंत अनेक निवडणुका येऊन गेल्या. संबंधित राजकीय पक्षांतर्फे शाब्दिक, लेखी आश्वासन देण्यात आले; परंतु कोणीही शब्द, आश्वासन पाळले नाही. त्यामुळे आजही या रस्त्याची परिस्थिती बिकट आहे.तालुक्याच्या ठिकाणी प्रवास करायचा म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. वास्तविक पाहता भेकऱ्याचा कोंड, ताम्हाणे करंबे, भापट, कोकबलवाडी, रातीवणे आणि कोळवट ही गावे तालुक्यातील अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागात असून, या गावांतील नागरिकांचे सर्व व्यवहार हे केवळ म्हसळ्यावरच अवलंबून आहेत. शिक्षण, कामधंदा यासाठी नागरिकांना म्हसळ्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे हा रस्ता प्रामुख्याने होणे गरजेचे आहे.वाहनचालक त्रस्त, प्रवाशांची गैरसोयपावसाळ्यात महामंडळाची एसटी बसदेखील बंद केली जाते. या वेळी खाजगी वाहनाने प्रवास करायला गेल्यास वाहनचालक या रस्त्यावरून जाण्यास नकार देतात. कारण या रस्त्याची अवस्था अतिशक बिकट झाली आहे. काही खाजगी वाहनचालक दामदुपटीने भाडे घेतात; मात्र ते सर्वसामान्य मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांच्या आवाक्याबाहेरचे असते. या रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने दिवसेंदिवस हा रस्ता जणू डोंगरातून गावात जाणारी पायवाट झाल्याचे दिसत आहे.भापट-कोळवट रस्त्यासंदर्भात अनेक वेळा खासदारांना निवेदन दिले आहे. कोलवट रस्त्यावर जनसामान्यांची गैरसोय होत आहे. या भागातील लोकांना दवाखाना, बाजार करण्यासाठी म्हसळ्यात जावे लागते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना म्हसळ्यात शिक्षणासाठी ये-जा करावी लागते. खराब रस्त्यांमुळे महामंडळाची एसटी पोहोचणे खूप त्रासदायक होत आहे. रस्त्याच्या बिकट परिस्थितीकडे पालकमंत्री तसेच खासदारांनी लक्ष द्यावे, अशीच आमची मागणी आहे.- रवींद्र दाजी कुवारे,ग्रामपंचायत सदस्य,कोळवटआम्ही सर्व ग्रामस्थ गेली अनेक वर्षे रस्त्याला कंटाळलो असून, जीवन जगणे केवळ रस्त्यामुळे दिवसेंदिवस कठीण झाले आहे. कारण निवडणुका आल्या की याच रस्त्याने राजकीय पक्ष आश्वासने देण्यासाठी धावत येत असतात. परंतु बाकी इतर दिवस वगळता या रस्त्याकडे कुठलाही राजकीय नेता फिरकूनदेखील बघत नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येक पक्षाला प्रस्ताव सादर केला आहे.- शिराज नजीर,ग्रामस्थ 

टॅग्स :Raigadरायगड