शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
3
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
4
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
5
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
6
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
7
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
8
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
9
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
10
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
11
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
12
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
13
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
14
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
15
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
16
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
17
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
18
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
19
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
20
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!

प्रवाशांची गैरसोय : म्हसळा-कोळवट रस्त्याची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:58 IST

प्रवाशांची गैरसोय : गेल्या १५ वर्षांपासून ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष

उदय कळस

म्हसळा : तालुक्यातील डोंगराळ दुर्गम भागात ताम्हणे करंबेवाडी, ताम्हणे करंबे, रातीवणे, कोळवट, भापट ही गावे वसलेली आहेत. या गावांना दळणवळण करण्यासाठी प्रवासाचे साधन म्हणजे कोळवट रस्ता. तो रस्ता गेली १५ वर्षे नादुरुस्त आहे. अनेक वेळा त्या गावांतील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडेदेखील रस्ता दुरुस्त करण्यासाठी लेखी निवेदन देऊन मागणी केली. मात्र वारंवार प्रस्ताव देऊनही कोणीही या रस्त्याच्या कामाकडे गांभीर्याने पाहत नसल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.

प्रस्तावांचा ढीग पडला असून आजही हा रस्ता दुर्लक्षित आहे. त्यासाठी कोळवट गावअंतर्गत सहा गावांनी पंचक्रोशी कमिटी स्थापन केली होती. रखडलेला रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते; परंतु सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. हा रस्ता गेली कित्येक वर्षे दगड-मातीचा आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थ दरवर्षी अंगमेहनत करून रस्त्यावर माती टाकून तात्पुरती अडचण दूर करतात; परंतु हे आणखी किती वर्षे असेच चालायचे, असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. आजपर्यंत अनेक निवडणुका येऊन गेल्या. संबंधित राजकीय पक्षांतर्फे शाब्दिक, लेखी आश्वासन देण्यात आले; परंतु कोणीही शब्द, आश्वासन पाळले नाही. त्यामुळे आजही या रस्त्याची परिस्थिती बिकट आहे.तालुक्याच्या ठिकाणी प्रवास करायचा म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. वास्तविक पाहता भेकऱ्याचा कोंड, ताम्हाणे करंबे, भापट, कोकबलवाडी, रातीवणे आणि कोळवट ही गावे तालुक्यातील अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागात असून, या गावांतील नागरिकांचे सर्व व्यवहार हे केवळ म्हसळ्यावरच अवलंबून आहेत. शिक्षण, कामधंदा यासाठी नागरिकांना म्हसळ्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे हा रस्ता प्रामुख्याने होणे गरजेचे आहे.वाहनचालक त्रस्त, प्रवाशांची गैरसोयपावसाळ्यात महामंडळाची एसटी बसदेखील बंद केली जाते. या वेळी खाजगी वाहनाने प्रवास करायला गेल्यास वाहनचालक या रस्त्यावरून जाण्यास नकार देतात. कारण या रस्त्याची अवस्था अतिशक बिकट झाली आहे. काही खाजगी वाहनचालक दामदुपटीने भाडे घेतात; मात्र ते सर्वसामान्य मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांच्या आवाक्याबाहेरचे असते. या रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने दिवसेंदिवस हा रस्ता जणू डोंगरातून गावात जाणारी पायवाट झाल्याचे दिसत आहे.भापट-कोळवट रस्त्यासंदर्भात अनेक वेळा खासदारांना निवेदन दिले आहे. कोलवट रस्त्यावर जनसामान्यांची गैरसोय होत आहे. या भागातील लोकांना दवाखाना, बाजार करण्यासाठी म्हसळ्यात जावे लागते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना म्हसळ्यात शिक्षणासाठी ये-जा करावी लागते. खराब रस्त्यांमुळे महामंडळाची एसटी पोहोचणे खूप त्रासदायक होत आहे. रस्त्याच्या बिकट परिस्थितीकडे पालकमंत्री तसेच खासदारांनी लक्ष द्यावे, अशीच आमची मागणी आहे.- रवींद्र दाजी कुवारे,ग्रामपंचायत सदस्य,कोळवटआम्ही सर्व ग्रामस्थ गेली अनेक वर्षे रस्त्याला कंटाळलो असून, जीवन जगणे केवळ रस्त्यामुळे दिवसेंदिवस कठीण झाले आहे. कारण निवडणुका आल्या की याच रस्त्याने राजकीय पक्ष आश्वासने देण्यासाठी धावत येत असतात. परंतु बाकी इतर दिवस वगळता या रस्त्याकडे कुठलाही राजकीय नेता फिरकूनदेखील बघत नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येक पक्षाला प्रस्ताव सादर केला आहे.- शिराज नजीर,ग्रामस्थ 

टॅग्स :Raigadरायगड