शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
3
'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
4
मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स
5
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
6
दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स ३१७ तर निफ्टीमध्ये ११५ अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
7
VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण
8
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
9
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
10
'दीया और बाती' फेम अभिनेत्रीने ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर घेतला संन्यास, पदरात आहे एक मुलगा
11
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
12
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
13
"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
14
Delhi AQI: दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
15
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
16
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
17
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
18
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
19
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
20
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा

प्रवाशांची गैरसोय : म्हसळा-कोळवट रस्त्याची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:58 IST

प्रवाशांची गैरसोय : गेल्या १५ वर्षांपासून ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष

उदय कळस

म्हसळा : तालुक्यातील डोंगराळ दुर्गम भागात ताम्हणे करंबेवाडी, ताम्हणे करंबे, रातीवणे, कोळवट, भापट ही गावे वसलेली आहेत. या गावांना दळणवळण करण्यासाठी प्रवासाचे साधन म्हणजे कोळवट रस्ता. तो रस्ता गेली १५ वर्षे नादुरुस्त आहे. अनेक वेळा त्या गावांतील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडेदेखील रस्ता दुरुस्त करण्यासाठी लेखी निवेदन देऊन मागणी केली. मात्र वारंवार प्रस्ताव देऊनही कोणीही या रस्त्याच्या कामाकडे गांभीर्याने पाहत नसल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.

प्रस्तावांचा ढीग पडला असून आजही हा रस्ता दुर्लक्षित आहे. त्यासाठी कोळवट गावअंतर्गत सहा गावांनी पंचक्रोशी कमिटी स्थापन केली होती. रखडलेला रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते; परंतु सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. हा रस्ता गेली कित्येक वर्षे दगड-मातीचा आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थ दरवर्षी अंगमेहनत करून रस्त्यावर माती टाकून तात्पुरती अडचण दूर करतात; परंतु हे आणखी किती वर्षे असेच चालायचे, असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. आजपर्यंत अनेक निवडणुका येऊन गेल्या. संबंधित राजकीय पक्षांतर्फे शाब्दिक, लेखी आश्वासन देण्यात आले; परंतु कोणीही शब्द, आश्वासन पाळले नाही. त्यामुळे आजही या रस्त्याची परिस्थिती बिकट आहे.तालुक्याच्या ठिकाणी प्रवास करायचा म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. वास्तविक पाहता भेकऱ्याचा कोंड, ताम्हाणे करंबे, भापट, कोकबलवाडी, रातीवणे आणि कोळवट ही गावे तालुक्यातील अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागात असून, या गावांतील नागरिकांचे सर्व व्यवहार हे केवळ म्हसळ्यावरच अवलंबून आहेत. शिक्षण, कामधंदा यासाठी नागरिकांना म्हसळ्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे हा रस्ता प्रामुख्याने होणे गरजेचे आहे.वाहनचालक त्रस्त, प्रवाशांची गैरसोयपावसाळ्यात महामंडळाची एसटी बसदेखील बंद केली जाते. या वेळी खाजगी वाहनाने प्रवास करायला गेल्यास वाहनचालक या रस्त्यावरून जाण्यास नकार देतात. कारण या रस्त्याची अवस्था अतिशक बिकट झाली आहे. काही खाजगी वाहनचालक दामदुपटीने भाडे घेतात; मात्र ते सर्वसामान्य मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांच्या आवाक्याबाहेरचे असते. या रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने दिवसेंदिवस हा रस्ता जणू डोंगरातून गावात जाणारी पायवाट झाल्याचे दिसत आहे.भापट-कोळवट रस्त्यासंदर्भात अनेक वेळा खासदारांना निवेदन दिले आहे. कोलवट रस्त्यावर जनसामान्यांची गैरसोय होत आहे. या भागातील लोकांना दवाखाना, बाजार करण्यासाठी म्हसळ्यात जावे लागते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना म्हसळ्यात शिक्षणासाठी ये-जा करावी लागते. खराब रस्त्यांमुळे महामंडळाची एसटी पोहोचणे खूप त्रासदायक होत आहे. रस्त्याच्या बिकट परिस्थितीकडे पालकमंत्री तसेच खासदारांनी लक्ष द्यावे, अशीच आमची मागणी आहे.- रवींद्र दाजी कुवारे,ग्रामपंचायत सदस्य,कोळवटआम्ही सर्व ग्रामस्थ गेली अनेक वर्षे रस्त्याला कंटाळलो असून, जीवन जगणे केवळ रस्त्यामुळे दिवसेंदिवस कठीण झाले आहे. कारण निवडणुका आल्या की याच रस्त्याने राजकीय पक्ष आश्वासने देण्यासाठी धावत येत असतात. परंतु बाकी इतर दिवस वगळता या रस्त्याकडे कुठलाही राजकीय नेता फिरकूनदेखील बघत नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येक पक्षाला प्रस्ताव सादर केला आहे.- शिराज नजीर,ग्रामस्थ 

टॅग्स :Raigadरायगड