शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

भाऊचा धक्का-रेवस वाहतूकसेवा ८ सप्टेंबरपासून सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 03:38 IST

गणेशभक्तांना दिलासा : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे, वाहतूककोंडीपासून सुटका

जयंत धुळप 

अलिबाग : भाऊचा धक्का ते रेवस, अलिबाग दरम्यानची सागरी वाहतूक सेवा पावसाळ्यात सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली होती. ती येत्या ८ सप्टेंबरपासून पूर्ववत सुरू होत असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक व औद्योगिक सहकारी संस्थेचे सचिव वजीर बामणे यांनी दिली आहे. या सेवेमुळे गणेशभक्तांची मोठी सोय होणार असून त्यांचा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डेमय वाहतूककोंडीचा त्रास वाचणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागामार्फत महाराष्टÑ मेरीटाइम बोर्डाच्या (महाराष्टÑ सागरी मंडळ) प्रत्यक्ष नियंत्रण व देखरेखीखाली, भाऊचा धक्का ते रेवस (अलिबाग) हा जलमार्ग प्रवास ९० मिनिटांचा आहे. ८ सप्टेंबरपासून या जलमार्गावर सकाळी ६.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ही लाँच सेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबई-रेवस या मार्गावर दर महिन्याला २७ ते २८ हजार प्रवासी प्रवास करत असतात, असे बामणे यांनी सांगितले. समुद्रात टाकलेल्या प्लॅस्टिक पिशव्या लाँचखालील पंख्यामध्ये अडकल्याने अनेकदा लाँच बंद पडण्याच्या घटना घडल्या आहेत, परंतु आता प्लॅस्टिकबंदीमुळे अशा दुर्घटनांचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच लाँचमध्ये सुरक्षासाधने उपलब्ध आहेत किंवा नाहीत याची तपासणी १०ते १२ अधिकाऱ्यांकडून होते. दरवर्षी १७० ते १८० लाँचेसची तांत्रिक तपासणी केली जाते. त्यानंतरच लाँचला प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली जाते, असे त्यांनी सांगितले.पाच वर्षांत प्रवासी संख्येत २५ टक्क्यांनी वाढभाऊचा धक्का ते मोरा (उरण) ही लाँच सेवा सध्या दररोज सकाळी ६.३० ते सायंकाळी ७.१५ या दरम्यान सुरू आहे. पावसाळ्यानंतर भाऊ चा धक्का ते मोरा (उरण) या दरम्यान ही सेवा सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. हा प्रवास ५५ मिनिटांचा असून या मार्गावर दर महिन्याला ३२ ते ३५ हजार प्रवासी प्रवास करतात. या मार्गावरील प्रवासी संख्येत गेल्या पाच वर्षांत २५ टक्के वाढ झाल्याचे बामणे यांनी सांगितले.सुरक्षेसाठी १४०लाइफ जॅकेट, तराफेदोन्ही मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक लाँचमध्ये ८० ते १४० लाइफ जॅकेट आणि ४ ते ८ तराफे ठेवण्यात आले आहेत.आपत्कालीनस्थितीसाठी चार लाँचेसमुंबई-रायगड दरम्यानची प्रवासी जलसेवा कायम निर्धोक व सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबई जलवाहतूक व औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत ३ ते ४ लाँचेस निराळ्या उपलब्ध (स्टॅण्डबाय) ठेवल्या जातात. याद्वारे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येते.

टॅग्स :RaigadरायगडGaneshotsavगणेशोत्सव