शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

घारापुरी-राजबंदरदरम्यान धोकादायक जेट्टीला टेकू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:09 IST

तात्पुरती मलमपट्टी : मेरिटाइम बोर्डाच्या अभियंत्यांकडून पाहणी

मधुकर ठाकूर 

उरण : मुंबई मेरिटाइम बोर्डाच्या दुर्लक्षामुळे शनिवारी कोसळलेल्या घारापुरी-राजबंदर जेट्टीच्या स्लॅबला खालून तात्पुरता उपाय म्हणून टेकू देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजनेमुळे महाशिवरात्रीनिमित्ताने घारापुरी बेटावर येणाऱ्या हजारो शिवभक्तांची मोठी गैरसोय दूर होईल, असा दावा साहाय्यक अभियंते पी. एल. बागुल यांनी पाहणीनंतर केला आहे.

उरण, न्हावा समुद्रमार्गे घारापुरी लेणी पाहायला येणाºया पर्यटक आणि नागरिकांसाठी एकमेव ५० वर्षे जुनी असलेल्या राजबंदर जेट्टीचा स्लॅब आणि जेट्टीखालील अनेक ठिकाणचे प्लास्टर शनिवारपासून कोसळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे धोकादायक ठरू लागलेल्या जेट्टीमुळे महाशिवरात्रीनिमित्ताने मोठ्या संख्येने येणाºया पर्यटक आणि नागरिकांसाठी ती अत्यंत धोकादायक बनली आहे. धोकादायक ठरूपाहणाºया जेट्टीच्या दुरुस्तीकडे मुंबई मेरिटाइम बोर्डाचे दुर्लक्ष झाल्यामुळे महाशिवरात्रीनिमित्ताने येणाºया हजारो शिवभक्तांची मोठी गैरसोय होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्ताने सुमारे ७०-८० हजार शिवभक्त बेटावर येतात. याच राजबंदर जेट्टीवरून भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळते.घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी याआधीच दुरुस्तीअभावी पर्यटक आणि नागरिकांसाठी धोकादायक बनलेल्या जेट्टीची माहिती मुंबई मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने शनिवारी घारापुरी-राजबंदर जेट्टीचा स्लॅब कोसळला. तसेच प्लास्टरही कोसळण्यास सुरुवात झाली आहे. घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर मुंबई मेरिटाईम बोर्डाचे साहाय्यक अभियंते पी. एल. बागुल यांनी सरपंच बळीराम ठाकूर यांच्या सोबत धोकादायक जेट्टीची पाहणी केली. धोकादायक राजबंदर जेट्टीची विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांना माहिती देण्यात आली आहे. देवरे यांनीही जेट्टी दुरुस्तीच्या कामासाठी अंदाज पत्रक तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महाशिवरात्रीनिमित्ताने बेटावर येणाºया हजारो शिवभक्तांची धोकादायक जेट्टीमुळे गैरसोय होऊ नये यासाठी घारापुरी-राजबंदर जेट्टीच्या स्लॅबला खालून तात्पुरता उपाय म्हणून टेकू देण्याची सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्याची माहितीपी. एल. बागुल यांनी दिली. 

टॅग्स :Raigadरायगड