शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

इतिहासाला उजाळा : तानाजींंच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण, ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 00:26 IST

नरवीर तानाजी मालुसरे यांची कर्मभूमी असलेल्या पोलादपूर तालुक्यातील उमरठ गावातील त्यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे.

- प्रकाश कदमपोलादपूर : ऐतिहासिकदृष्ट्या पोलादपूर तालुका नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड व प्रतापगडमधील दुवा म्हणजेच पोलादपूर. या तालुक्यात शिवकाळातील अनेक रत्ने होऊन गेली आहेत. पोलादपूर तालुक्याचे स्फूर्तिस्थान व शिवरायांचे बालसवंगडी, स्वराज्याचे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे, शिवभारतकार कवींद्र परमानंद स्वामी, स्वराज्याचे चिटणीस बालाजी आवजी चित्रे यांच्या वास्तव्याने पावन झालेला तालुका म्हणजे पोलादपूर.नरवीर तानाजी मालुसरे यांची कर्मभूमी असलेल्या पोलादपूर तालुक्यातील उमरठ गावातील त्यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे. समाधीस्थळ, आसपास लागणारे दगड घडविण्याचे काम कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील संजय गाडीवडर, आकाश राचू गाडीवडर, केपू कडापगोळ, संजय कुराडे, गोटू गाडीवडर, उमेश गाडीवडर, अनिल गाडीवडर, उदय चौगुले इत्यादी करत आहेत.येत्या १७ फेब्रुवारी रोजी तानाजी मालुसरे यांची ३५० वी पुण्यतिथी आहे. पोलदपूरपासून १५ किलोमीटर अंतरावर उमरठ गाव आहे. या ठिकाणी इतिहासप्रेमी आणि पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. मालुसरे कोंढाणा किल्ला सर केल्यानंतर युद्धात धारतीर्थ पडले. त्यांचे पार्थिव कोंढाणा किल्ल्यावरून मढेघाट मार्गे उमरठ येथे आणण्यात येऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथेच त्यांची समाधी बांधण्यात आली. तानाजी मालुसरे यांच्या समाधीशेजारी शेलार मामा यांचीही समाधी आहे. जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष दादासाहेब लिमये यांनी समाधी सुशोभीकरणासाठी तरतूद केली. समाधीस्थळ सुशोभित झाल्यानंतर शौर्यदिन उत्सवासाठी प्रभाकर पाटील यांनी कायम निधी उपलब्ध करून दिला.यंदा तानाजी मालुसरे यांची ३५० वी पुण्यतिथी असल्याने समाधीस्थळाचे नूतनीकरण केले जात आहे. तसेच आसपासच्या परिसराचे सुशोभीकरण केले जात आहे. आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या प्रयत्नातून शासनाच्या विविध विभागांतर्फे या कामासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर उमरठकडे जाणाऱ्या मार्गावर शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून चंद्रकांत कळंबे यांच्या सहकार्याने नरवीर तानाजी मालुसरे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. भविष्यात उमरठ येथे समाधी परिसरात शिवकालीन नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनातील सर्व युद्धप्रसंग शिल्पस्वरूपात उभारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.उमरठ गावात पोहोचल्यावर उजव्या बाजूला एक कमान असून, एक रस्ता थेट नरवीर तानाजी मालुसरे याच्या समाधी स्थळाकडे जातो. रस्त्याच्या दुरुस्तीची दुरुस्ती , रंगरंगोटीची कामे वेगात सुरू असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांची पाहणी करण्यात येत आहे. पुण्यतिथीनिमित्त सिंहगड ते उमरठ अशी दिव्य शौर्ययात्रा काढण्यात येणार असून, महाराष्ट्रातील शिवप्रेमी संस्था सहभागी होणार असल्याचे चंद्रकांत कळंब यांनी सांगितले.

- तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सांगली येथील इतिहाससंशोधक प्रवीण भोसले यांनी समाधीचे डिझाइन केले आहे. यासाठी खास कर्नाटकातून दगड मागविण्यात आले आहेत. कोल्हापूरचे कुशल कारागीर समाधीच्या नूतनीकरणाचे काम करत आहेत. समाधी परिसराला किल्ल्यासारखी तटबंदी करून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास साकार करण्यात येणार आहे.- समाधीस्थळाच्या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रसंगी तान्हाजी या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना नरवीर पुरस्कारनेही सन्मानित करण्यात येणार आहे.

टॅग्स :RaigadरायगडTanaji Movieतानाजी