शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

महामार्गावरील महिसदरा नदीवरील पूल जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:16 IST

कठडे उद्ध्वस्त; प्रवाशांच्या जीवाला धोका

धाटाव : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग १७ वरील कोलाड पुई येथील महिसदरा नदीवरील पुलाचे कठडे तुटले असून हा पूल पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असल्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या जड अवजड वाहन चालकांसह प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.या महामार्गावरील कोलाड पुई येथील महिसदरा नदीचा पूल हा ब्रिटिश काळात बांधण्यात आला असुन तो अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे तुटलेले आहेत. यावरून अवजड वाहन गेले तर हा पूल पूर्णपणे हादरला जातो. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. गेल्या सहा ते सात वर्षापासून मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून त्यात म्हणावी तशी प्रगती नाही. तसेच महिसदरा नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामालाही अद्याप सुरुवात नाही.पनवेल ते इंदापूर दरम्यानचे चौपदरीकरणाच्या कामात किमान वर्षातून फक्त २० किलोमीटर अंतराचा रस्ता केला असता तर या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झाले असते. कामाच्या नियोजनाच्या अभावाने व एकंदरीत कामाच्या वेगावरून या रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही.यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून अशा दुर्लक्षामुळे सावित्री नदी पुलासारख्या दुर्घटना घडतात व नंतर कोट्यवधी रु पये खर्च केले जातात, परंतु अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात त्यानंतर शासनाला जाग येते. अशा घटना न घडण्याअगोदर शासनाने उपाययोजना कराव्यात यासाठी लोकप्रतिनिधी व संबंधित व्यक्ती यांनी लक्ष देण्याची गरज आहे, असे नागरिकांचे म्हणणे असून दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे.अपघाताची शक्यतामुंबई-गोवा मार्गावर अनेक पर्यटन स्थळे व कारखाने आहेत यामुळे येथे नेहमी वाहनांची सतत वर्दळ सुरू असते त्यामुळे सतत मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असते. यातून घाईघाईने मार्ग काढताना तुटलेले कठडे लक्षात न आल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.