शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

महामार्गावरील महिसदरा नदीवरील पूल जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:16 IST

कठडे उद्ध्वस्त; प्रवाशांच्या जीवाला धोका

धाटाव : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग १७ वरील कोलाड पुई येथील महिसदरा नदीवरील पुलाचे कठडे तुटले असून हा पूल पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असल्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या जड अवजड वाहन चालकांसह प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.या महामार्गावरील कोलाड पुई येथील महिसदरा नदीचा पूल हा ब्रिटिश काळात बांधण्यात आला असुन तो अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे तुटलेले आहेत. यावरून अवजड वाहन गेले तर हा पूल पूर्णपणे हादरला जातो. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. गेल्या सहा ते सात वर्षापासून मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून त्यात म्हणावी तशी प्रगती नाही. तसेच महिसदरा नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामालाही अद्याप सुरुवात नाही.पनवेल ते इंदापूर दरम्यानचे चौपदरीकरणाच्या कामात किमान वर्षातून फक्त २० किलोमीटर अंतराचा रस्ता केला असता तर या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झाले असते. कामाच्या नियोजनाच्या अभावाने व एकंदरीत कामाच्या वेगावरून या रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही.यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून अशा दुर्लक्षामुळे सावित्री नदी पुलासारख्या दुर्घटना घडतात व नंतर कोट्यवधी रु पये खर्च केले जातात, परंतु अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात त्यानंतर शासनाला जाग येते. अशा घटना न घडण्याअगोदर शासनाने उपाययोजना कराव्यात यासाठी लोकप्रतिनिधी व संबंधित व्यक्ती यांनी लक्ष देण्याची गरज आहे, असे नागरिकांचे म्हणणे असून दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे.अपघाताची शक्यतामुंबई-गोवा मार्गावर अनेक पर्यटन स्थळे व कारखाने आहेत यामुळे येथे नेहमी वाहनांची सतत वर्दळ सुरू असते त्यामुळे सतत मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असते. यातून घाईघाईने मार्ग काढताना तुटलेले कठडे लक्षात न आल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.