शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

बोर्लीपंचतन परिसर ३६ दिवसांपासून अंधारात, महावितरणविरोधात संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 00:49 IST

सद्य:स्थितीत बोर्लीपंचतन, वडवली, दिवेआगर, दिघी, खुजारे अशा चाळीसहून अधिक गाव- खेड्यांत वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थांच्या संतापात वाढ होत आहे.

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरात ३६ दिवस वीजपुरवठा नाही. विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी महावितरणविरोधात थेट पोलीस स्टेशनच गाठले. दिघी सागरी पोलिसांनी मध्यस्थी करीत पोलीस, ग्रामस्थ व महावितरण यांच्यात गुरुवारी सकाळी समन्वय बैठक आयोजित केली होती. या वेळी नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढाच वाचला.सद्य:स्थितीत बोर्लीपंचतन, वडवली, दिवेआगर, दिघी, खुजारे अशा चाळीसहून अधिक गाव- खेड्यांत वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थांच्या संतापात वाढ होत आहे. परिणामी, कुठे अनुचित प्रकार घडू नये. या अनुषंगाने दिघी सागरी पोलीस ठाण्यात तातडीची बैठक बोलावण्यात आली. या वेळी स्थानिक राजकीय नेते मंडळी व इतर ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व प्रमुख ग्रामस्थ यांची सभा घेण्यात आली. या वेळी सर्वांकडून समस्या मांडण्यात आल्या.गावोगावी नेमणूक असलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत नाही. विद्युत खांब उभे करण्यासाठी प्रत्येक गावातून दोनशेहून अधिक ग्रामस्थांचे श्रमदान मिळत असताना अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन होत नाही. म्हसळा, मेंदडी, गोंडघर येथे सबस्टेशन होणारी मुख्य वाहिनीची कामे होत असताना गावा अंतर्गत कामेरखडली आहेत. अनेक विद्युत खांब कोसळलेल्या स्थितीत असून विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत.यामुळे विद्युत पुरवठा स्थिर कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.महावितरणकडून अधिकची बिले आली. ती भरली नाहीत म्हणून वीज जोडणी तोडायला कुणी आले तर आम्ही कर्मचाºयांना ते करू देणार नाही, असा आक्रमक इशारा या वेळी ग्रामस्थांनी दिला.‘आठ दिवसांत वीज येणार’निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. जवळपास सर्वच गावांना या आठ दिवसांत वीज सुरळीत मिळेल, अशी माहिती श्रीवर्धनचे उपअभियंते महेंद्र वाघपैजन यांनी दिली.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरणRaigadरायगड