शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

मुरुडमध्ये बोटधारकांचे कामबंद आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 11:33 PM

४०० लोकांची मर्यादा ठेवल्याने संताप; जंजिरा किल्ला बंदच राहिल्याने हजारो पर्यटकांची निराशा 

लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड : रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशान्वेय ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा २५ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. ३ जानेवारीपासून सर्व जलवाहतूक सोसायट्यांचे कर्मचारी पर्यटकांना किल्ल्यात नेण्यासाठी सज्ज झाले असतानाच, पुरातत्त्व खात्याकडून दिवसाला ४०० पर्यटकच किल्ल्यात नेले जातील, असा नियम असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत जलवाहतूक करणाऱ्या सर्व सहकारी सोसायट्यांची नाराजी व्यक्त केली आहे, तर बोटधारकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना ने-आण करण्यासाठी पाच सहकारी सोसायट्या असून, प्रत्येक सोसायटीला फक्त ८० पर्यटक नेता येणार असल्याने सर्व बोट मालक व चालकांनी एकत्र येत, जल वाहतूक बंद ठेऊन या निर्णयाचा निषेध केला आहे. किल्ल्यावरील जल वाहतूक बंद ठेवल्याने हजारो पर्यटकांना किल्ला न पाहता परतावे लागले आहे. रविवारची सुट्टी साधून कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे, बोरीवली, भिवंडी आदी भागांतून हजारोंच्या संख्येने पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आले होते, परंतु जल वाहतूक बंद ठेवल्याने पर्यटकांना हा किल्ला पाहाता आला नाही. यावेळी जल वाहतूक करणाऱ्या सर्व सोसायट्यांमधील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत ४०० संख्येचा निर्बंध रद्द करा, अशी घोषणा करीत, आंदोलनाचा झेंडा फडकवला आहे. बोट मालकांनी आंदोलन पुकारल्याने जंजिरा किल्ला आता किती दिवस बंद राहणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

रोजगाराचा प्रश्न बनला गंभीरमहालक्ष्मी मच्छीमार सहकारी सोसायटीचे चेअरमन विजय गीदी यांनी संचारबंदीच्या काळात लोक घरात बसून राहिल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच पर्यटकांच्या संख्येवर निर्बंध आल्याने आमचे लोक बेकारीचे जीवन जगणार आहेत, असे सांगितले. जंजिरा किल्ल्याचे संरक्षक गोगरे यांनी जंजिरा किल्ल्यावर वाहतूक करणाऱ्या जल वाहतूक सोसायट्यांचे ४०० पर्यटक संख्येवर आक्षेप असल्याने, किल्ला बंद ठेवण्यात आला असल्याचे सांगितले.

किल्ला पाहाण्यासाठी महाराष्ट्रातून खूप दूरवरून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. रोज नवीन नियम लादल्यामुळे पर्यटकांना किल्ला न पाहता परतावे लागल्याने पर्यटकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. काशीद समुद्र किनारी व अन्य समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात गर्दी होते, परंतु तिथे निर्बंध नाहीत, मग जंजिरा किल्ल्यावर निर्बंध का?-हिरकणी गीदी, सरपंच, राजपुरी ग्रामपंचायत

जल वाहतुकीद्वारे सेवा देताना आमचे ११० कर्मचारी इमाने इतबारे सेवा बजावत असतात. संख्येवर निर्बंध ठेवल्याने आमच्या रोजी रोटीचा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी रायगड यांचा आदेश २ जानेवारीपर्यंत असताना, ४०० लोकांची मर्यादा पुढे सुरू ठेवणे हे योग्य नाही.-इस्माईल आदमने, चेअरमन, जंजिरा पर्यटक सहकारी सोसायटी

टॅग्स :fishermanमच्छीमार