शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

भाजप आता भ्रष्टाचारी जनता पक्ष बनलाय, उल्का महाजन यांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 13:54 IST

उरण येथील संविधान आणि लोकशाही विचार मंथ या संघटनेच्या विद्यमाने सोमवंशी क्षत्रिय पाठारे सभागृहात रविवारी आयोजित जाहीर सभेत महाजन बोलत होत्या. 

- मधुकर ठाकूर 

उरण : स्वतःची पार्टी विथ डिफरंस ही ओळख आता भाजपने संपवून टाकली आहे. आता तो म्हणजे  भ्रष्टाचारी जनता पक्ष बनला आहे. लोकांना लाचार बनवायचे आणि आपले इप्सित साध्य करायचे उद्योग त्या पक्षाने आणि नेत्यांनी सुरू केले आहेत, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी केली. उरण येथील संविधान आणि लोकशाही विचार मंथ या संघटनेच्या विद्यमाने सोमवंशी क्षत्रिय पाठारे सभागृहात रविवारी आयोजित जाहीर सभेत महाजन बोलत होत्या. 

वैचारिक क्षेत्रातील कार्यकर्ते या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाजन म्हणाल्या, सरकार इतके निर्दयी बनलंय की सामान्यांना लाचार ठेवण्यात या सरकारला असुरी आनंद आहे. ८० टक्के कुटुंबांना मोफत धान्य देण्याच्या गमजा मारणाऱ्या सरकारला आपला देश गरिबीची रेषा ओलांडतो आहे. याचेही काही पडलेले दिसत नाही. बेरोजगारी रसातळाला पोहचली असताना खोटे आकडे समोर करण्यात सरकार धन्यता मानत आहे. १४१ देशातील बेरोजगारीच्या आकडेवारीत भारताचा क्रमांक १११ वर पोहोचला असल्याचे महाजन म्हणाल्या. 

भूक वाढविणे ही सत्ताधाऱ्यांच्या डिझाईनचा भाग बनला आहे. भूक वाढली की काही सुचत नाही. देशवासीयांना भुकेला ठेवत सरकारने नोटबंदी लादली. मागल्या दाराने जीएसटी लावण्यात आला. एनआरसी लागून लोकांना भयाखाली आणण्यात आले. हे करता करता  शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यात आले, असे, महाजन म्हणाल्या.

विदर्भ कवी गोविंद पोलाड यांनी आपल्या भाषणात भाजपच्या सरकारला निर्दयी सरकार संबोधलं. रामाच्या नावाने राजकारण करणारा भाजप आणि त्यांचे नेते खरे एक वचनी असतील तर त्यांनी लोकांना १५ लाख रुपये देण्याचा वादा पूर्ण करून दाखवावा असं आव्हान दिले. संसदेचा आणि राष्ट्रपतींचा अवमान करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नापास पंतप्रधान आहेत अशा शब्दात पोलाड यांनी टीकास्त्र सोडले. 

ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचुवार यांनी देशभर लिखाण स्वातंत्र्याच्या होत असलेल्या गळचेपीच्या घटनांचा मागोवा घेताना अशा घटनांचे आकडेच समोर आणले. देशात माध्यमांचे स्वातंत्र्य हे आता नसल्यागत झाल्याचे चुंचुवार म्हणाले. आता विवेकी आवाज संपला तर देशाचे काही खरे नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रवीण पुरो यांनी केले.

टॅग्स :Raigadरायगड