शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आता भ्रष्टाचारी जनता पक्ष बनलाय, उल्का महाजन यांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 13:54 IST

उरण येथील संविधान आणि लोकशाही विचार मंथ या संघटनेच्या विद्यमाने सोमवंशी क्षत्रिय पाठारे सभागृहात रविवारी आयोजित जाहीर सभेत महाजन बोलत होत्या. 

- मधुकर ठाकूर 

उरण : स्वतःची पार्टी विथ डिफरंस ही ओळख आता भाजपने संपवून टाकली आहे. आता तो म्हणजे  भ्रष्टाचारी जनता पक्ष बनला आहे. लोकांना लाचार बनवायचे आणि आपले इप्सित साध्य करायचे उद्योग त्या पक्षाने आणि नेत्यांनी सुरू केले आहेत, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी केली. उरण येथील संविधान आणि लोकशाही विचार मंथ या संघटनेच्या विद्यमाने सोमवंशी क्षत्रिय पाठारे सभागृहात रविवारी आयोजित जाहीर सभेत महाजन बोलत होत्या. 

वैचारिक क्षेत्रातील कार्यकर्ते या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाजन म्हणाल्या, सरकार इतके निर्दयी बनलंय की सामान्यांना लाचार ठेवण्यात या सरकारला असुरी आनंद आहे. ८० टक्के कुटुंबांना मोफत धान्य देण्याच्या गमजा मारणाऱ्या सरकारला आपला देश गरिबीची रेषा ओलांडतो आहे. याचेही काही पडलेले दिसत नाही. बेरोजगारी रसातळाला पोहचली असताना खोटे आकडे समोर करण्यात सरकार धन्यता मानत आहे. १४१ देशातील बेरोजगारीच्या आकडेवारीत भारताचा क्रमांक १११ वर पोहोचला असल्याचे महाजन म्हणाल्या. 

भूक वाढविणे ही सत्ताधाऱ्यांच्या डिझाईनचा भाग बनला आहे. भूक वाढली की काही सुचत नाही. देशवासीयांना भुकेला ठेवत सरकारने नोटबंदी लादली. मागल्या दाराने जीएसटी लावण्यात आला. एनआरसी लागून लोकांना भयाखाली आणण्यात आले. हे करता करता  शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यात आले, असे, महाजन म्हणाल्या.

विदर्भ कवी गोविंद पोलाड यांनी आपल्या भाषणात भाजपच्या सरकारला निर्दयी सरकार संबोधलं. रामाच्या नावाने राजकारण करणारा भाजप आणि त्यांचे नेते खरे एक वचनी असतील तर त्यांनी लोकांना १५ लाख रुपये देण्याचा वादा पूर्ण करून दाखवावा असं आव्हान दिले. संसदेचा आणि राष्ट्रपतींचा अवमान करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नापास पंतप्रधान आहेत अशा शब्दात पोलाड यांनी टीकास्त्र सोडले. 

ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचुवार यांनी देशभर लिखाण स्वातंत्र्याच्या होत असलेल्या गळचेपीच्या घटनांचा मागोवा घेताना अशा घटनांचे आकडेच समोर आणले. देशात माध्यमांचे स्वातंत्र्य हे आता नसल्यागत झाल्याचे चुंचुवार म्हणाले. आता विवेकी आवाज संपला तर देशाचे काही खरे नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रवीण पुरो यांनी केले.

टॅग्स :Raigadरायगड