शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

भाजप आता भ्रष्टाचारी जनता पक्ष बनलाय, उल्का महाजन यांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 13:54 IST

उरण येथील संविधान आणि लोकशाही विचार मंथ या संघटनेच्या विद्यमाने सोमवंशी क्षत्रिय पाठारे सभागृहात रविवारी आयोजित जाहीर सभेत महाजन बोलत होत्या. 

- मधुकर ठाकूर 

उरण : स्वतःची पार्टी विथ डिफरंस ही ओळख आता भाजपने संपवून टाकली आहे. आता तो म्हणजे  भ्रष्टाचारी जनता पक्ष बनला आहे. लोकांना लाचार बनवायचे आणि आपले इप्सित साध्य करायचे उद्योग त्या पक्षाने आणि नेत्यांनी सुरू केले आहेत, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी केली. उरण येथील संविधान आणि लोकशाही विचार मंथ या संघटनेच्या विद्यमाने सोमवंशी क्षत्रिय पाठारे सभागृहात रविवारी आयोजित जाहीर सभेत महाजन बोलत होत्या. 

वैचारिक क्षेत्रातील कार्यकर्ते या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाजन म्हणाल्या, सरकार इतके निर्दयी बनलंय की सामान्यांना लाचार ठेवण्यात या सरकारला असुरी आनंद आहे. ८० टक्के कुटुंबांना मोफत धान्य देण्याच्या गमजा मारणाऱ्या सरकारला आपला देश गरिबीची रेषा ओलांडतो आहे. याचेही काही पडलेले दिसत नाही. बेरोजगारी रसातळाला पोहचली असताना खोटे आकडे समोर करण्यात सरकार धन्यता मानत आहे. १४१ देशातील बेरोजगारीच्या आकडेवारीत भारताचा क्रमांक १११ वर पोहोचला असल्याचे महाजन म्हणाल्या. 

भूक वाढविणे ही सत्ताधाऱ्यांच्या डिझाईनचा भाग बनला आहे. भूक वाढली की काही सुचत नाही. देशवासीयांना भुकेला ठेवत सरकारने नोटबंदी लादली. मागल्या दाराने जीएसटी लावण्यात आला. एनआरसी लागून लोकांना भयाखाली आणण्यात आले. हे करता करता  शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यात आले, असे, महाजन म्हणाल्या.

विदर्भ कवी गोविंद पोलाड यांनी आपल्या भाषणात भाजपच्या सरकारला निर्दयी सरकार संबोधलं. रामाच्या नावाने राजकारण करणारा भाजप आणि त्यांचे नेते खरे एक वचनी असतील तर त्यांनी लोकांना १५ लाख रुपये देण्याचा वादा पूर्ण करून दाखवावा असं आव्हान दिले. संसदेचा आणि राष्ट्रपतींचा अवमान करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नापास पंतप्रधान आहेत अशा शब्दात पोलाड यांनी टीकास्त्र सोडले. 

ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचुवार यांनी देशभर लिखाण स्वातंत्र्याच्या होत असलेल्या गळचेपीच्या घटनांचा मागोवा घेताना अशा घटनांचे आकडेच समोर आणले. देशात माध्यमांचे स्वातंत्र्य हे आता नसल्यागत झाल्याचे चुंचुवार म्हणाले. आता विवेकी आवाज संपला तर देशाचे काही खरे नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रवीण पुरो यांनी केले.

टॅग्स :Raigadरायगड