शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी; ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप-सेनेला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2023 15:37 IST

न्हावा ग्रामपंचायत निवडणुकीत महाआघाडीत बिघाडी; शेकाप-सेना तर भाजप-कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत

मधुकर ठाकूर

उरण : न्हावा ग्रामपंचायत निवडणुकीत महाआघाडीत बिघाडी  झाली आहे. बिघाडीमुळे शेकाप- सेना तर भाजप-कॉग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत होणार आहे. एक कोटी उत्पन्न असलेली आणि सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेली न्हावा ग्रामपंचायत सधन म्हणून ओळखली जाते.त्यामुळे ग्रामपंचायतीवर आपल्याच पक्षाची सत्ता असावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांचा खटाटोप सुरू आहे.मागील निवडणूकीत शेकाप-भाजप-कॉग्रेस आघाडीची सत्ता होती.मात्र या आघाडीला नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविता आलेल्या नाहीत.त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्य, अंतर्गत गटारांची समस्या नागरिकांना कायमच सतावते आहे.

न्हावा ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ११ असुन थेट सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे.यापैकी शेकाप -६, शिवसेना-५ तर एका अपक्ष उमेदवाराला शेकापने पाठिंबा दिला आहे.आघाडीतुन सरपंचपदासाठी सेनेच्या रविंद्र नारायण पाटील यांना  उमेदवारी देण्यात आली असल्याची माहिती शेकाप -शिवसेना आघाडीचे सर्वेसर्वा जितेंद्र म्हात्रे यांनी दिली  तर महाआघाडीतील कॉग्रेस- राष्ट्रवादीने सत्तेसाठी भाजपबरोबर सोयरिक साधली आहे.या आघाडीतुन ११ सदस्यांच्या जागांपैकी भाजप-५,कॉग्रेस-२, राष्ट्रवादी-३ लढवित आहे.सरपंच पदासाठी भाजपचे विजेंद्र गणेश पाटील हे निवडणूकीच्या रिंगणात  आहेत.उत्कर्ष ग्रामविकास मंडळ न्हावा-न्हावाखाडी पॅनेलच्या नावाखाली निवडणूक लढविली जात आहे. भाजपचे माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढविली जात आहे.

रामशेठ ठाकूर यांनी स्वखर्चातून बांधलेली एक लाख लिटर्स क्षमतेची पाण्याची टाकी, व्यायाम शाळा,समाज मंदिर,न्यु इंग्लिश स्कूल नुतनीकरण, महिला मंडळ कार्यालय आदी विकासकामांच्या मुद्यावर ही निवडणूक लढविली जात असल्याचे भाजप-कॉग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे व माजी सरपंच हरेश म्हात्रे यांनी सांगितले.आघाडीतील बिघाडीमुळे भाजप-कॉग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सरपंच पदासह नऊ सदस्य विजयी होतील असा विश्वासही हरेश म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.

विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविली जात आहे. एकूण मतदान ३२३२ असुन यापैकी २००० मते घेऊन शिवसेनेचे रविंद्र पाटील सरपंचपदी निवडून येतील.तर ११ पैकी ८ उमेदवार सदस्यपदी निवडून येतील. त्यामुळे न्हावा ग्रामपंचायतीवर शिवसेना -शेकापचीच सत्ता स्थापन होईल असा विश्वास शेकाप -शिवसेना आघाडीचे सर्वेसर्वा जितेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. मात्र महाआघाडीतील बिघाडीसाठी जागा वाटप हाच कळीचा मुद्दा ठरला आहे.यासाठी शेकाप -शिवसेना आघाडीचे जितेंद्र म्हात्रे आणि रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी परस्परांना दोष दिला आहे.