शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी; ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप-सेनेला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2023 15:37 IST

न्हावा ग्रामपंचायत निवडणुकीत महाआघाडीत बिघाडी; शेकाप-सेना तर भाजप-कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत

मधुकर ठाकूर

उरण : न्हावा ग्रामपंचायत निवडणुकीत महाआघाडीत बिघाडी  झाली आहे. बिघाडीमुळे शेकाप- सेना तर भाजप-कॉग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत होणार आहे. एक कोटी उत्पन्न असलेली आणि सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेली न्हावा ग्रामपंचायत सधन म्हणून ओळखली जाते.त्यामुळे ग्रामपंचायतीवर आपल्याच पक्षाची सत्ता असावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांचा खटाटोप सुरू आहे.मागील निवडणूकीत शेकाप-भाजप-कॉग्रेस आघाडीची सत्ता होती.मात्र या आघाडीला नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविता आलेल्या नाहीत.त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्य, अंतर्गत गटारांची समस्या नागरिकांना कायमच सतावते आहे.

न्हावा ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ११ असुन थेट सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे.यापैकी शेकाप -६, शिवसेना-५ तर एका अपक्ष उमेदवाराला शेकापने पाठिंबा दिला आहे.आघाडीतुन सरपंचपदासाठी सेनेच्या रविंद्र नारायण पाटील यांना  उमेदवारी देण्यात आली असल्याची माहिती शेकाप -शिवसेना आघाडीचे सर्वेसर्वा जितेंद्र म्हात्रे यांनी दिली  तर महाआघाडीतील कॉग्रेस- राष्ट्रवादीने सत्तेसाठी भाजपबरोबर सोयरिक साधली आहे.या आघाडीतुन ११ सदस्यांच्या जागांपैकी भाजप-५,कॉग्रेस-२, राष्ट्रवादी-३ लढवित आहे.सरपंच पदासाठी भाजपचे विजेंद्र गणेश पाटील हे निवडणूकीच्या रिंगणात  आहेत.उत्कर्ष ग्रामविकास मंडळ न्हावा-न्हावाखाडी पॅनेलच्या नावाखाली निवडणूक लढविली जात आहे. भाजपचे माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढविली जात आहे.

रामशेठ ठाकूर यांनी स्वखर्चातून बांधलेली एक लाख लिटर्स क्षमतेची पाण्याची टाकी, व्यायाम शाळा,समाज मंदिर,न्यु इंग्लिश स्कूल नुतनीकरण, महिला मंडळ कार्यालय आदी विकासकामांच्या मुद्यावर ही निवडणूक लढविली जात असल्याचे भाजप-कॉग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे व माजी सरपंच हरेश म्हात्रे यांनी सांगितले.आघाडीतील बिघाडीमुळे भाजप-कॉग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सरपंच पदासह नऊ सदस्य विजयी होतील असा विश्वासही हरेश म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.

विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविली जात आहे. एकूण मतदान ३२३२ असुन यापैकी २००० मते घेऊन शिवसेनेचे रविंद्र पाटील सरपंचपदी निवडून येतील.तर ११ पैकी ८ उमेदवार सदस्यपदी निवडून येतील. त्यामुळे न्हावा ग्रामपंचायतीवर शिवसेना -शेकापचीच सत्ता स्थापन होईल असा विश्वास शेकाप -शिवसेना आघाडीचे सर्वेसर्वा जितेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. मात्र महाआघाडीतील बिघाडीसाठी जागा वाटप हाच कळीचा मुद्दा ठरला आहे.यासाठी शेकाप -शिवसेना आघाडीचे जितेंद्र म्हात्रे आणि रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी परस्परांना दोष दिला आहे.