शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी; ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप-सेनेला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2023 15:37 IST

न्हावा ग्रामपंचायत निवडणुकीत महाआघाडीत बिघाडी; शेकाप-सेना तर भाजप-कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत

मधुकर ठाकूर

उरण : न्हावा ग्रामपंचायत निवडणुकीत महाआघाडीत बिघाडी  झाली आहे. बिघाडीमुळे शेकाप- सेना तर भाजप-कॉग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत होणार आहे. एक कोटी उत्पन्न असलेली आणि सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेली न्हावा ग्रामपंचायत सधन म्हणून ओळखली जाते.त्यामुळे ग्रामपंचायतीवर आपल्याच पक्षाची सत्ता असावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांचा खटाटोप सुरू आहे.मागील निवडणूकीत शेकाप-भाजप-कॉग्रेस आघाडीची सत्ता होती.मात्र या आघाडीला नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविता आलेल्या नाहीत.त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्य, अंतर्गत गटारांची समस्या नागरिकांना कायमच सतावते आहे.

न्हावा ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ११ असुन थेट सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे.यापैकी शेकाप -६, शिवसेना-५ तर एका अपक्ष उमेदवाराला शेकापने पाठिंबा दिला आहे.आघाडीतुन सरपंचपदासाठी सेनेच्या रविंद्र नारायण पाटील यांना  उमेदवारी देण्यात आली असल्याची माहिती शेकाप -शिवसेना आघाडीचे सर्वेसर्वा जितेंद्र म्हात्रे यांनी दिली  तर महाआघाडीतील कॉग्रेस- राष्ट्रवादीने सत्तेसाठी भाजपबरोबर सोयरिक साधली आहे.या आघाडीतुन ११ सदस्यांच्या जागांपैकी भाजप-५,कॉग्रेस-२, राष्ट्रवादी-३ लढवित आहे.सरपंच पदासाठी भाजपचे विजेंद्र गणेश पाटील हे निवडणूकीच्या रिंगणात  आहेत.उत्कर्ष ग्रामविकास मंडळ न्हावा-न्हावाखाडी पॅनेलच्या नावाखाली निवडणूक लढविली जात आहे. भाजपचे माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढविली जात आहे.

रामशेठ ठाकूर यांनी स्वखर्चातून बांधलेली एक लाख लिटर्स क्षमतेची पाण्याची टाकी, व्यायाम शाळा,समाज मंदिर,न्यु इंग्लिश स्कूल नुतनीकरण, महिला मंडळ कार्यालय आदी विकासकामांच्या मुद्यावर ही निवडणूक लढविली जात असल्याचे भाजप-कॉग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे व माजी सरपंच हरेश म्हात्रे यांनी सांगितले.आघाडीतील बिघाडीमुळे भाजप-कॉग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सरपंच पदासह नऊ सदस्य विजयी होतील असा विश्वासही हरेश म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.

विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविली जात आहे. एकूण मतदान ३२३२ असुन यापैकी २००० मते घेऊन शिवसेनेचे रविंद्र पाटील सरपंचपदी निवडून येतील.तर ११ पैकी ८ उमेदवार सदस्यपदी निवडून येतील. त्यामुळे न्हावा ग्रामपंचायतीवर शिवसेना -शेकापचीच सत्ता स्थापन होईल असा विश्वास शेकाप -शिवसेना आघाडीचे सर्वेसर्वा जितेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. मात्र महाआघाडीतील बिघाडीसाठी जागा वाटप हाच कळीचा मुद्दा ठरला आहे.यासाठी शेकाप -शिवसेना आघाडीचे जितेंद्र म्हात्रे आणि रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी परस्परांना दोष दिला आहे.