शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

उपजिल्हा रुग्णालयाचा जैविक कचरा जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 23:21 IST

कर्जतमध्ये नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कर्जत : शहरात कचरा जाळण्याचे प्रकार राजरोसपणे सुरू असून, नागरिकांच्या तसेच वयोवृद्धांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात आता भर पडली असून, कर्जत उपजिल्हा रुग्णालय परिसरात चक्क जैविक कचरा जाळला जात असून, कर्जतच्या मुख्य शहरात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.कोरोना महामारीच्या संकटामुळे अनेक नागरिकांना जीवितास मुकावे लागले, तर अनेक नागरिकांना भयंकर यातना सहन कराव्या लागल्या आहेत. अजूनही कर्जतकर कोरोना महामारीतून जात असून, शहर कोरोनाच्या महामारीपासून सावरत असतानाच शहरात जाळल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे भयंकर प्रदूषण निर्माण होत असून, भविष्यात नागरिकांना खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यात कर्जत उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथील जैविक कचरा, वापरलेले मास्क, हँडग्लोज, इंजेक्शनच्या सुया, इंजेक्शन्स, संपलेल्या सलाइनच्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, औषधांची रिकामी व मुदत संपलेली भरलेली पाकिटे, कुजलेली वस्त्रे, बेडशीट इत्यादी प्रकारचा भयंकर आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारा कचरा बिनदिक्कत जाळला जात आहे.कर्जत शहरातील जबाबदार असणाऱ्या शासकीय विभागांचा कचरा अशा प्रकारे सर्रासपणे जाळला जात आहे. यावर वरिष्ठ अधिकारी काहीही कारवाई वा नियोजन करत नाहीत, ही खेदजनक बाब आहे. तरी, संबंधित विभागाच्या अधिकारी नागरिकांच्या जीविताशी खेळत असलेल्या कचरा जळीतकांड प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रभाकर गंगावणे यांनी केले आहे. मात्र, कर्जत उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने कोणीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.