शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

शिक्षण व्यवस्थेच्या धोरणामुळे भारिप आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:48 IST

सहा हजार शिक्षक होणार बेरोजगार : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

अलिबाग : राज्यातील शैक्षणिक धोरण हे येथील शिक्षण व्यवस्थेला आणि गरीब विद्यार्थ्यांना उद्ध्वस्त करणारे आहे. त्याला विरोध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. राज्यातील तीन हजार ८०० मराठी शाळा बंद पाडण्याचा घाट तसेच सहा हजार शिक्षकांना बेरोजगार करणारे धोरण तातडीने मागे घ्यावे अशी आक्रमक भूमिका संघटनेने घेतली.

राज्याच्या शिक्षण व्यवस्थेला वाचवायचे असेल, तर सर्वांनी संघटितपणे सरकारच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध करण्याची गरज निर्माण झाली आहे. या गंभीर प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये शिक्षण धोरणाच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून रायगड जिल्ह्यातही आंदोलन करण्यात आले. राज्यातील आणि केंद्रातील सरकार हे गरिबांना न्याय देणारे नाही. त्यांनी शिक्षण धोरणात बदल केल्यामुळे गरिबांना शिक्षण घेताना बºयाच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यांनी आणलेल्या धोरणांना वेळीच विरोध केला नाही तर शिक्षण व्यवस्थेचे वाटोळे होणार असल्याचे भारिपचे सम्यक आंदोलनाचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. कैलास मोरे यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय मानकानुसार एका वर्गात किमान २५ मुले असणे आवश्यक आहे, मात्र राज्यातील कमी पट असणाºया सरसकट शाळा बंद करण्याचे सरकारचे धोरण अन्यायकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गरीब विद्यार्थ्यांसह शिक्षकांना देशोधडीला लावणाºया शिक्षण धोरणाला एकजुटीने विरोध करणे गरजेचे आहे. भारिपचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सर्व प्रथम अन्यायकारक शिक्षण व्यवस्थेविरोधात आवाज उठवला आहे. राज्यभरात त्यांनी उभारलेल्या आंदोलनाला चांगला पाठिंबा मिळत असल्याचे भारिपचे प्रदीप ओव्हाळ यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दीपक मोरे, मेघा रिकामे महिला आघाडी प्रमुख, नीलेशकुमार घरत, मंगेश मोरे, प्रीती आंब्रे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.भारिप बहुजन महासंघाच्या प्रमुख मागण्याच्राज्यातील शैक्षणिक धोरणामुळे राज्यातील तीन हजार ८०० शाळा बंद पाडण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शिक्षक समायोजनाच्या नावाखाली तब्बल सहा हजार शिक्षकांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.च्विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप त्वरित देण्यात यावी, फेलोशिपसाठी नेट परीक्षेची केलेली सक्ती रद्द करण्यात यावी, एक हजार ३०० शाळा बंद केलेल्या मराठी शाळा पुन्हा सुरु करण्यात याव्यात, राज्यात ७५ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्या तातडीने भरण्यात याव्यात, देशभरात ८८ हजार नेट, सेटधारक उमेदवार आहेत. त्यांना तत्काळ सेवेत सामावून घ्यावे, केंद्र आणि राज्य सरकारकडून विद्यार्थी आणि पालकांची होणारी पिळवणूक तातडीने थांबवावी, सेल्फ फायनान्स स्कूल युनिव्हर्सिटी निर्माण करुन शिक्षणाचे सुरु असलेले खासगीकरण थांबवावे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मनुवादी बोधचिन्ह बदलून ते नव्याने करण्यात यावे, राजीव गांधी-मौलाना आझाद फेलोशिप अल्पसंख्याकांसह मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळालीच पाहिजे, यासह अन्य प्रमुख मागण्यांचा समावेश निवेदनामध्ये करण्यात आला आहे.