शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

सामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 06:56 IST

अलिबाग येथे सहलीसाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली आहे. त्यापैकी दोघांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले असून एकाचा अद्याप शोध लागलेला नाही.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई  - अलिबाग येथे सहलीसाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली आहे. त्यापैकी दोघांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले असून एकाचा अद्याप शोध लागलेला नाही. दरम्यान, रात्री समुद्रात पोहण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न त्यांच्या जिवावर बेतला आहे.कोपरखैरणे परिसरातील २० ते २५ वयोगटातली सुमारे १२ मुले अलिबाग येथे सहलीसाठी गेली होती. त्यापैकी दोघांचा नागाव बीचवर समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. आशिष मिश्रा (२४), सुहाद (फद्दु) सिद्दिकी (२१) अशी समुद्रात बुडालेल्यांची नावे असून, मिश्रा व सिद्दिकी यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला असून, चैतन्य सुळे याचा पोलीस शोध घेत आहेत. आशिष कोपर खैरणे सेक्टर २चा, सुहाद सेक्टर १९ व चैतन्य सेक्टर १४चा राहणारा आहे. सहलीला त्यांच्यासोबत मोहित पुजारी, प्रतीक शेट्टी, अजिंक्य पाटील, प्रज्योत पिंजारी आदींसह कोपरखैरणे परिसरातील इतरही मुले होती. त्यापैकी काही जण फुटबॉल खेळाडू आहेत. सरावाच्या निमित्ताने ते नेहमी एकमेकांच्या संपर्कात असतात. दोन दिवसांपूर्वी त्यांनी अलिबाग येथे सहलीचा बेत आखला. यासाठी काहींनी फुटबॉलचे सामने असल्याचे घरच्यांना सांगितले होते. शिवाय त्यांनी त्यांचा जुना कोच प्रतीक शेट्टी याला सामन्याला जायचे असल्याचे सांगून बेंगलोरवरून बोलावून घेतले होते. त्यानेदेखील रात्रीच्या वेळी समुद्राच्या पाण्यात उतरण्यास सर्वांना विरोध केला. परंतु फक्त ५ मिनिटे आनंद घेतो असे सांगून विरोध डावलून चौघे जण समुद्राच्या पाण्यात उतरले. या वेळी भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडाले तर एक जण सुखरूप बाहेर आला. छातीपेक्षा जास्त खोलीच्या पाण्यात ते उभे असताना पायाखालची वाळू सरकू लागल्याने त्यांना सावरता आले नाही. यामुळे ते लाटेसोबत वाहत गेल्याचा प्रत्यक्षदर्शींचा अंदाजआहे.शनिवारी पहाटेपर्यंत या घटनेची माहिती सहलीला गेलेल्या प्रत्येक मुलाच्या घरापर्यंत पोहोचली होती.रात्री पोहण्याचा मोह ठरला अखेरचानागांव येथे आलेल्या या सहलीतील मुलांना त्यांचे कोच प्रतीक शेट्टी यांनी रात्रीच्या वेळी समुद्रात उतरण्यास मनाई केली होती. परंतू ५ मिनिटे आनंद घेत असे सांगून चौघेजण पाण्यामध्ये उतरले. भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने लाटेसोबत तिघे वाहत गेले.

टॅग्स :Deathमृत्यूRaigadरायगड