शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 06:56 IST

अलिबाग येथे सहलीसाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली आहे. त्यापैकी दोघांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले असून एकाचा अद्याप शोध लागलेला नाही.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई  - अलिबाग येथे सहलीसाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली आहे. त्यापैकी दोघांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले असून एकाचा अद्याप शोध लागलेला नाही. दरम्यान, रात्री समुद्रात पोहण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न त्यांच्या जिवावर बेतला आहे.कोपरखैरणे परिसरातील २० ते २५ वयोगटातली सुमारे १२ मुले अलिबाग येथे सहलीसाठी गेली होती. त्यापैकी दोघांचा नागाव बीचवर समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. आशिष मिश्रा (२४), सुहाद (फद्दु) सिद्दिकी (२१) अशी समुद्रात बुडालेल्यांची नावे असून, मिश्रा व सिद्दिकी यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला असून, चैतन्य सुळे याचा पोलीस शोध घेत आहेत. आशिष कोपर खैरणे सेक्टर २चा, सुहाद सेक्टर १९ व चैतन्य सेक्टर १४चा राहणारा आहे. सहलीला त्यांच्यासोबत मोहित पुजारी, प्रतीक शेट्टी, अजिंक्य पाटील, प्रज्योत पिंजारी आदींसह कोपरखैरणे परिसरातील इतरही मुले होती. त्यापैकी काही जण फुटबॉल खेळाडू आहेत. सरावाच्या निमित्ताने ते नेहमी एकमेकांच्या संपर्कात असतात. दोन दिवसांपूर्वी त्यांनी अलिबाग येथे सहलीचा बेत आखला. यासाठी काहींनी फुटबॉलचे सामने असल्याचे घरच्यांना सांगितले होते. शिवाय त्यांनी त्यांचा जुना कोच प्रतीक शेट्टी याला सामन्याला जायचे असल्याचे सांगून बेंगलोरवरून बोलावून घेतले होते. त्यानेदेखील रात्रीच्या वेळी समुद्राच्या पाण्यात उतरण्यास सर्वांना विरोध केला. परंतु फक्त ५ मिनिटे आनंद घेतो असे सांगून विरोध डावलून चौघे जण समुद्राच्या पाण्यात उतरले. या वेळी भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडाले तर एक जण सुखरूप बाहेर आला. छातीपेक्षा जास्त खोलीच्या पाण्यात ते उभे असताना पायाखालची वाळू सरकू लागल्याने त्यांना सावरता आले नाही. यामुळे ते लाटेसोबत वाहत गेल्याचा प्रत्यक्षदर्शींचा अंदाजआहे.शनिवारी पहाटेपर्यंत या घटनेची माहिती सहलीला गेलेल्या प्रत्येक मुलाच्या घरापर्यंत पोहोचली होती.रात्री पोहण्याचा मोह ठरला अखेरचानागांव येथे आलेल्या या सहलीतील मुलांना त्यांचे कोच प्रतीक शेट्टी यांनी रात्रीच्या वेळी समुद्रात उतरण्यास मनाई केली होती. परंतू ५ मिनिटे आनंद घेत असे सांगून चौघेजण पाण्यामध्ये उतरले. भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने लाटेसोबत तिघे वाहत गेले.

टॅग्स :Deathमृत्यूRaigadरायगड