शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

नदीकिनारी सुशोभीकरणासाठी कर्जतमधील तरुणाईचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 23:58 IST

मुख्याधिकारी, आमदारांनी केली उल्हास नदीवरील घाटाची पाहणी

कर्जत : उल्हास नदीकिनारी घाटा लगतच्या जागेवर नगर परिषद प्रशासन काँक्रीटीकरण करणार असल्याने त्या ऐवजी या जागेवर लॉन तसेच शोभिवंत झाडे लावून सुशोभीकरण करावे जेणे करून नागरिकांना त्यामुळे सुखद आनंद मिळेल, अशी मागणी समीर सोहोनी या स्वच्छतादूताने नागरिकांच्या वतीने नगरपरिषदेकडे केली आहे. त्याअनुषंगाने आमदार सुरेश लाड आणि मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी घाटाची पाहणी केली.

शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीत मोठ्या प्रमाणात थेट सांडपाणी सोडण्यात येत असल्याने तसेच कचरा टाकण्यामुळे नदीचे प्रदूषण वाढले असून त्यामुळे जलपर्णीची सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचीच दखल घेऊन शहरातील समीर सोहनी आणि मुकुंद भागवत यांनी पुढाकार घेऊन नदी स्वच्छता अभियान मागील तीन महिन्यापासून सुरु केले आहे. त्यात त्यांना काही प्रमाणात यश आले असून काही भाग स्वच्छही झाला आहे. घाट परिसरातील कचºयाची विल्हेवाट लावून तो परिसराचे सपाटीकरण केले आहे आणि याच जागेवर नगर परिषद साबरमती घाट पद्धतीच्या पायºया बनविण्याच्या विचारात आहे मात्र या पायºया करण्यापेक्षा शोभिवंत झाडे लावून सुशोभिकरण करावे अशी मागणी केली समीर सोहोनी आणि मुकुंद भागवत यांनी केली आहे.

नगर परिषद स्वच्छता विभागाचे कर्मचारी कचरा नियमितपणे संकलित करीत आहे. तरी सुद्धा काही नागरिक गाडीवरून पटकन नदीपात्रात कचरा फेकून देतात. त्यावर अंकुश लावण्यासाठी सीसीटीव्ही नदी घाट परिसरात बसविणार आहोत. समीर सोहोनी आणि मुकुंद भागवत यांचे काम कौतुकास्पद आहे. - रामदास कोकरे, मुख्याधिकारी, कर्जत नगर परिषद

नदीपात्राला जलपर्णीचा विळखा पडला आहे. घाट परिसरात तळीराम पार्ट्या करीत असल्याने दारूच्या बाटल्यांच्या खच पडला होता तो आम्ही साफ केला. याच घाट परिसरात वृक्ष लावून सुशोभीकरण केल्यास नागरिकांना आनंद घेता येईल. - समीर सोहोनी, स्वच्छतादूत , कर्जत

भुयारी गटारे झाली नसल्याने शहराचे सांडपाणी थेट पाणी नदीत जाते त्यामुळे प्रदूषण वाढले आहे. या संदर्भातला प्रस्ताव मागील सात आठ वर्षांपासून प्रलंबित आहे तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. नदीलगतच्या किनारी होत असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी कडक पावले उचलणे गरजेचे आहे. - सुरेश लाड, आमदार

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानriverनदी