शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

नदीकिनारी सुशोभीकरणासाठी कर्जतमधील तरुणाईचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 23:58 IST

मुख्याधिकारी, आमदारांनी केली उल्हास नदीवरील घाटाची पाहणी

कर्जत : उल्हास नदीकिनारी घाटा लगतच्या जागेवर नगर परिषद प्रशासन काँक्रीटीकरण करणार असल्याने त्या ऐवजी या जागेवर लॉन तसेच शोभिवंत झाडे लावून सुशोभीकरण करावे जेणे करून नागरिकांना त्यामुळे सुखद आनंद मिळेल, अशी मागणी समीर सोहोनी या स्वच्छतादूताने नागरिकांच्या वतीने नगरपरिषदेकडे केली आहे. त्याअनुषंगाने आमदार सुरेश लाड आणि मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी घाटाची पाहणी केली.

शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीत मोठ्या प्रमाणात थेट सांडपाणी सोडण्यात येत असल्याने तसेच कचरा टाकण्यामुळे नदीचे प्रदूषण वाढले असून त्यामुळे जलपर्णीची सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचीच दखल घेऊन शहरातील समीर सोहनी आणि मुकुंद भागवत यांनी पुढाकार घेऊन नदी स्वच्छता अभियान मागील तीन महिन्यापासून सुरु केले आहे. त्यात त्यांना काही प्रमाणात यश आले असून काही भाग स्वच्छही झाला आहे. घाट परिसरातील कचºयाची विल्हेवाट लावून तो परिसराचे सपाटीकरण केले आहे आणि याच जागेवर नगर परिषद साबरमती घाट पद्धतीच्या पायºया बनविण्याच्या विचारात आहे मात्र या पायºया करण्यापेक्षा शोभिवंत झाडे लावून सुशोभिकरण करावे अशी मागणी केली समीर सोहोनी आणि मुकुंद भागवत यांनी केली आहे.

नगर परिषद स्वच्छता विभागाचे कर्मचारी कचरा नियमितपणे संकलित करीत आहे. तरी सुद्धा काही नागरिक गाडीवरून पटकन नदीपात्रात कचरा फेकून देतात. त्यावर अंकुश लावण्यासाठी सीसीटीव्ही नदी घाट परिसरात बसविणार आहोत. समीर सोहोनी आणि मुकुंद भागवत यांचे काम कौतुकास्पद आहे. - रामदास कोकरे, मुख्याधिकारी, कर्जत नगर परिषद

नदीपात्राला जलपर्णीचा विळखा पडला आहे. घाट परिसरात तळीराम पार्ट्या करीत असल्याने दारूच्या बाटल्यांच्या खच पडला होता तो आम्ही साफ केला. याच घाट परिसरात वृक्ष लावून सुशोभीकरण केल्यास नागरिकांना आनंद घेता येईल. - समीर सोहोनी, स्वच्छतादूत , कर्जत

भुयारी गटारे झाली नसल्याने शहराचे सांडपाणी थेट पाणी नदीत जाते त्यामुळे प्रदूषण वाढले आहे. या संदर्भातला प्रस्ताव मागील सात आठ वर्षांपासून प्रलंबित आहे तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. नदीलगतच्या किनारी होत असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी कडक पावले उचलणे गरजेचे आहे. - सुरेश लाड, आमदार

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानriverनदी