शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, पनवेलमधील बारापाडा गावात डोंगर खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 03:19 IST

अनेक दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने शनिवारी रायगड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बारापाडा गावात डोंगर खचल्याने घराचे मोठे नुकसान झाले.

- वैभव गायकर ।पनवेल : अनेक दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने शनिवारी रायगड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बारापाडा गावात डोंगर खचल्याने घराचे मोठे नुकसान झाले.गावातील अनेक घरांना डोंगर खचण्याच्या प्रकारामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे माळीणसारखी घटना पनवेल तालुक्यातील डोलघरमध्येही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शुक्र वारी मध्यरात्री ३ वाजल्यापासून सुरू झालेला पावसाचा वेग शनिवारीही कायम होता. त्यामुळे बारपाडा गावात पाणी घुसले.दुपारनंतर परिस्थिती आणखीनच बिकट झाली. येथील रहिवासी महादेव म्हात्रे यांच्या घरात मातीमिश्रीत पाणी भरण्यास सुरुवात झाली. घरातील सदस्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, घराजवळील डोंगराचा काही भाग खचल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर गावकºयांच्या मदतीने घरातील सामान सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. ही घटना दिवसा घडल्याने म्हात्रे कुटुंबीयांना त्वरित मदत मिळाली.घटनेची माहिती मिळताच, पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांनी सर्कल व तलाठी यांना घटनास्थळी पाठविले. या वेळी परिस्थिती नियंत्रणात आली होती. बारापाडा गावची लोकसंख्या तीन हजारांच्या आसपास आहे. गावात आग्रीपाडा या ठिकाणी ही घटना घडली असून, गावात एकूण २५० घरे आहेत. विशेष म्हणजे, यापैकी जवळ जवळ ३० ते ४० घरांना अशाप्रकारे डोंगर खचण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.डोलघर-बारापाडा गावांचा संपर्क तुटलामुसळधार पावसामुळे डोलघर-बारापाडा गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क रात्रीपासून तुटला होता. डोलघर गाव उंचीवर असल्याने त्या गावात पुराचे पाणी शिरले नसले तरी बारापाडा, आग्रीपाडा गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. गावातील अनेक घरांत पाणी साचल्याने धान्य तसेच अनेक वस्तूंचे नुकसान झाल्याची माहिती कर्नाळा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व विद्यमान सदस्य निवेदिता कानडे यांनी दिली.चिरनेरमध्ये पूर, १०० घरांत पाणीमोठ्या प्रमाणात सुरू झालेली अतिवृष्टी, डोंगरमाथ्यावरून येणारे पाणी आणि समुद्राला आलेली उधाण भरतीमुळे चिरनेरला पुराचा तडाखा बसला. सुमारे ८० ते १०० नागरिकांच्या घरात शिरले. मोठ्या प्रमाणात कोसळलेल्या पावसाने चिरनेरकरांची त्रेधा तीरपिट उडाली. पुरामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. मात्र, जीवितहानी झालेली नाही. आर्थिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली.महिन्याभराच्या विश्रांतीनंतर शनिवारी पहाटेपासूनच उरण परिसरात पुन्हा पावसाने जोरदार सुरुवात केली. चिरनेर परिसराला झोडपून काढले. गावालगत असलेले ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले. त्यातच डोंगरावरून खाली येणारे पाणीही पुराच्या पाण्यात घुसले. समुद्राला आलेल्या भरतीच्या पाण्याची त्यात भर पडली. दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढल्याने वाहणाºया ओढे, नाल्यांचे पुरात रूपांतर झाले.पाणी ओसरण्याचा मार्गच बंद पडल्याने पुराचे पाणी नाल्यालगत असलेल्या चिरनेरवासीयांच्या घराघरांत घुसले. जमिनीपासून चार-सहा फुटांपर्यंत जोते असलेल्या घरांतही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. या पूरग्रस्त परिस्थितीला ग्रामपंचायत, नागरिक, महसूल विभाग आणि इतर शासकीय यंत्रणाच अधिक जबाबदार असल्याचा आरोप उरण तहसीलदार गोडे यांनी केला आहे.नाल्याभोवती झालेल्या अतिक्रमणामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचे गोडे यांनी स्पष्ट केले. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही, यासाठी खबरदारीची उपाययोजना आखणे गरजेचेचे झाले असून यासाठी नागरिकांची लवकरच बैठक बोलावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.रायगडमध्ये ४८ तासांत अतिवृष्टीची शक्यतामुंबई प्रादेशिक हवामान विभागाकडून शनिवारी दुपारी २ वाजल्यापासून ४८ तासांत रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ७ ते १२ से.मी. इतक्या अतिवृष्टीची शक्यता असल्याची पूर्वसूचना जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे. या काळात समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. तसेच दरडग्रस्त, किनाºयावरील गावांमधील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे जीवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. पूरस्थिती उद्भवल्यास त्यास सामोरे जाण्यासाठी बचाव पथक, साहित्य, रु ग्णवाहिका आदी सुविधा, नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात यावेत, असे निर्देश दिले आहेत.पेणमध्ये भातशेती पाण्याखालीपेण, वडखळ परिसरांतील काही शेती पाण्याखाली गेली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकही धिम्या गतीने सुरू असून, पावसामुळे ग्रामीण भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर एसटी वाहतूक व रेल्वेसेवेवर परिणाम झाला आहे.बाळगंगा, भोगावती नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळीशुक्रवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील भोगावती, बाळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे दूरशेत व खरोशी गावांकडे जाण्याचा संपर्क तुटला आहे. पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. त्याशिवाय अंतोरा, दादर, उर्णोली, सोनखार खाडी तुडूंब भरून वाहत आहेत. पाण्याची वाढत असलेली पातळी लक्षात घेता, तालुका प्रशासनाकडून नदी व खाडीकिनारी असणाºया गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बारपाडा गावात डोंगर खचण्याची माहिती मिळताच, तलाठी व सर्कल अधिकाºयांना घटनास्थळी त्वरित पाठविण्यात आले आहे. नुकसानग्रस्त घराचा पंचनामा करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून गावातील इतर घरांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाच्या मार्फत योग्य त्या उपाययोजना राबविल्या जातील.- दीपक आकडे,तहसीलदार, पनवेल