शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजुरांची मजुरी वाढल्याने बळीराजाची होतेय दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 00:40 IST

शेतात कामाची लगबग; रायगडमध्ये यंत्रशेतीचा वापर अशक्य 

लोकमत न्यूज नेटवर्क रायगड :  जिल्ह्यातील बहुतांश शेतामध्ये खरीप हंगमाची लागवड सुरू आहे. कामांसाठी शेतकऱ्यांची लगबग असल्याचे दिसून येते. शेतमजुरांची मजुरी वाढल्याने मजुरांची शाेधाशाेध करताना शेतकऱ्यांची दमछाक हाेत आहे.    रब्बीचा हंगाम संपून आता शेतांमध्ये खरीपाची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने वाल, हरभरा, मुग, तूर, वाल-पापडी, कांदे, ताेंडली, टोमॅटाे, वांगी, काेबी, फ्लॉवर, मिरची यासह अन्य पिके घेतली जातात. शेतकऱ्यांकडे असलेल्या शेतीचे क्षेत्र खूपच लहान असल्याने या ठिकाणी माेठ्या प्रमाणात शेतीयंत्राचा वापर केला जात नाही. मात्र काही ठिकाणी नांगरणीची कामे ट्रॅक्टरद्वारे करण्यात येतात. शेतीचा व्यवसाय सध्या आतबट्ट्याचा झाला आहे. शेतात राबणाऱ्या मजुरांसाठी सध्या मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक हाेताना दिसते. नवीन पिढीतील तरुण अशा कामांकडे वळत नसल्याने मजुरांची संख्या राेडावली आहे. जे मजुर उपलब्ध हाेतात त्यांनी मजुरी वाढवली आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

शेती करणे आता आतबट्ट्याचा व्यवसायशेतामध्ये राबणाऱ्या मजुरांची कमतरता आहे. जे मजूर येतात त्यांच्या खाण्या-पिण्याची साेय करावी लागते. जुरीही वाढली आहे. त्यामुळे शेती करणे आता आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे. फक्त कुटुंबासाठी लागणाऱ्या धान्यासाठी आता शेतीचा हाेत आहे, असे खंडाळे शेतकरी नंदू साेडवे यांनी सांगितले.शेतीचे क्षेत्र छाेटे आहे, त्यामुळे यांत्रिक पध्दतीने शेती करण्याचा प्रश्नच येत नाही. काही ठिकाणी नांगरणीसाठी ट्रॅक्टर आणण्यात येताे. उर्वरित शेतीची कामे मजुरांच्या जीवावरच करावी लागतात. मजुरीमध्ये चांगलीच वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतीचा व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न पडताे, असे उमटेचे शेतकरी अनंत पुनर म्हणाले.शेती व्यवसाय करायचा का नाही असा प्रश्न आहे. सतत वाढणाऱ्या खतांच्या किंमती, महाग झालेले बियाणे, वाढत्या मजुरीचा दर यामुळे मेटाकुटीला आलाे आहाेत. पूर्वी एकमेकांच्या शेतात राबण्याची परंपरा हाेती, आता ती लाेप पावली आहे. मजूर मिळत नाही. त्यांची शाेधाशाेध करावी लागते. महागाईच्या काळात आर्थिक घडी विस्कटून जाते, असे सातघर येथील शेतकरी सचिन ठाकूर यांनी सांगितले.

कृषियंत्रांनी मजुरांची जागा घेतलेली नाहीजिल्ह्यातील प्रत्येकाच्या वाट्याला आलेले शेतीचे क्षेत्र हे छाेट्या प्रमाणात आहे. त्यामुळे कृषियंत्राचा वापर आजही अतिशय कमी प्रमाणात हाेताे. शिवाय शेतीचे ठिकाण हे बांधा-बांधाला लागूनच असल्याने त्या ठिकाणी ट्रॅक्टर पाेचणे कठीण आहे. मजुरांच्या मदतीनेच शेतीच्या मशागतीची कामे करण्यात येतात.