शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

गडचिंचले साधू हत्याकांडप्रकरणी 54 आरोपींना जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 05:53 IST

उर्वरित लोकांच्या जामिनासाठी ५ डिसेंबर रोजी होणार सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्ककासा : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे चोर समजून आठ महिन्यांपूर्वी दोन साधू व चालक यांची जमावाने हत्या केली होती. या प्रकरणात एकूण ५४ आरोपींचा गुरुवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला, तर अटक करण्यात आलेल्यांपैकी उर्वरित लोकांच्या अर्जावर जामिनासाठी ५ डिसेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात जमावातर्फे गैरसमजातून तिघांची हत्या करण्यात आली होती. दोन साधू आणि त्यांचा ड्रायव्हर हे गुजरातमधील सुरत येथील आपल्या गुरूच्या अंत्यदर्शनासाठी जात होते. रात्रीच्या वेळी प्रवास करीत असताना ग्रामस्थांनी संशयातून या तिघांची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात हत्येत सामील असल्याचे दाखवून जवळपास दोनशेहून अधिक जणांवर संशयित म्हणून कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी काही जणांची न्यायालयाने याआधी जामिनावर सुटका केली आहे. गुरुवारी संध्याकाळी पालघरचे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.पी. जाधव यांनी ५४ आरोपींची १५-१५ हजारांच्या जामिनावर सुटका केली आहे.

या प्रकरणात आरोपींतर्फे वकील अमृत अधिकारी आणि अतुल पाटील यांनी बाजू मांडताना म्हटले की, या आरोपींची सदर घटनेत कोणतीच भूमिका नव्हती. त्यांना फक्त संशयाच्या धाग्यावर अटक केली होती. या वेळी मयत साधूंच्या कुटुंबीयांच्या बाजूने वकील पी.एन. ओझा यांनी बाजू मांडली, तर या घटनेतील अन्य आरोपींच्या जामीनअर्जाबाबत येत्या ५ डिसेंबर रोजी निकाल देण्यात येईल, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.  गडचिंचले येथे चोर समजून १६ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. दोन साधू कल्पवृक्षगिरी महाराज, सुशीलगिरी महाराज व त्यांचा चालक नीलेश तेलवडे यांची रात्री जमावाने हत्या केली होती. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी  ठपका ठेवून कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव काळे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे आणि हवालदार नरेश धोंडी यांना सेवेतून सक्तीची सेवानिवृत्त घेण्याची आणि इतर १५ पोलीस कर्मचारी यांना काही वर्षे मूळ वेतनावर ठेवण्याची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र नवी मुंबई यांनी केली होती.  उर्वरित लोकांच्या अर्जावर जामिनासाठी ५ डिसेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

जातीय रंग देण्याचाही प्रयत्न  गडचिंचले येथे घडलेल्या या हत्याकांडाचे तीव्र पडसाद देशभर उमटले होते. या प्रकरणाला जातीय रंग देण्याचाही प्रयत्न काही लोकांनी केला होता. तसेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचीही मागणी करण्यात आली होती. 

टॅग्स :RaigadरायगडCrime Newsगुन्हेगारी