शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

गडचिंचले साधू हत्याकांडप्रकरणी 54 आरोपींना जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 05:53 IST

उर्वरित लोकांच्या जामिनासाठी ५ डिसेंबर रोजी होणार सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्ककासा : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे चोर समजून आठ महिन्यांपूर्वी दोन साधू व चालक यांची जमावाने हत्या केली होती. या प्रकरणात एकूण ५४ आरोपींचा गुरुवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला, तर अटक करण्यात आलेल्यांपैकी उर्वरित लोकांच्या अर्जावर जामिनासाठी ५ डिसेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात जमावातर्फे गैरसमजातून तिघांची हत्या करण्यात आली होती. दोन साधू आणि त्यांचा ड्रायव्हर हे गुजरातमधील सुरत येथील आपल्या गुरूच्या अंत्यदर्शनासाठी जात होते. रात्रीच्या वेळी प्रवास करीत असताना ग्रामस्थांनी संशयातून या तिघांची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात हत्येत सामील असल्याचे दाखवून जवळपास दोनशेहून अधिक जणांवर संशयित म्हणून कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी काही जणांची न्यायालयाने याआधी जामिनावर सुटका केली आहे. गुरुवारी संध्याकाळी पालघरचे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.पी. जाधव यांनी ५४ आरोपींची १५-१५ हजारांच्या जामिनावर सुटका केली आहे.

या प्रकरणात आरोपींतर्फे वकील अमृत अधिकारी आणि अतुल पाटील यांनी बाजू मांडताना म्हटले की, या आरोपींची सदर घटनेत कोणतीच भूमिका नव्हती. त्यांना फक्त संशयाच्या धाग्यावर अटक केली होती. या वेळी मयत साधूंच्या कुटुंबीयांच्या बाजूने वकील पी.एन. ओझा यांनी बाजू मांडली, तर या घटनेतील अन्य आरोपींच्या जामीनअर्जाबाबत येत्या ५ डिसेंबर रोजी निकाल देण्यात येईल, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.  गडचिंचले येथे चोर समजून १६ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. दोन साधू कल्पवृक्षगिरी महाराज, सुशीलगिरी महाराज व त्यांचा चालक नीलेश तेलवडे यांची रात्री जमावाने हत्या केली होती. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी  ठपका ठेवून कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव काळे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे आणि हवालदार नरेश धोंडी यांना सेवेतून सक्तीची सेवानिवृत्त घेण्याची आणि इतर १५ पोलीस कर्मचारी यांना काही वर्षे मूळ वेतनावर ठेवण्याची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र नवी मुंबई यांनी केली होती.  उर्वरित लोकांच्या अर्जावर जामिनासाठी ५ डिसेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

जातीय रंग देण्याचाही प्रयत्न  गडचिंचले येथे घडलेल्या या हत्याकांडाचे तीव्र पडसाद देशभर उमटले होते. या प्रकरणाला जातीय रंग देण्याचाही प्रयत्न काही लोकांनी केला होता. तसेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचीही मागणी करण्यात आली होती. 

टॅग्स :RaigadरायगडCrime Newsगुन्हेगारी