शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
4
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
5
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
6
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
7
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
8
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
9
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
10
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
11
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
12
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
13
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
14
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
15
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
16
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
17
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
18
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
19
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
20
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...

खराब हवामानामुळे पर्यटन व्यवसायाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 02:00 IST

मंदीचे सावट। मुरुडमध्ये असंख्य जोडधंदे तोट्यात

मुरुड : तालुक्यात आजतागत ४,५०० मिलीमीटर पाऊस पडला असून खराब हवामानामुळे पर्यटन व मासळी व्यवसायावर विपरित परिणाम होऊ लागला असून संबंधित जोड उद्योगांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी वर्षभर पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, सुट्टीचा हंगाम तसेच वीकेण्ड असतानाही पर्यटक मुरुडमध्ये दाखल झालेले नाहीत. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकच नसल्याने घोडागाडीचा व्यवसाय मंदावला आहे.

हवामान बदलल्यामुळे जंजिरा किल्ल्यावरील जलप्रवास बंद करावा लागत आहे, तर वादळी हवामानात खोल समुद्रात गेलेल्या होड्या पुन्हा किनाºयाला येत आहेत. मासळी मिळत नसल्याने हा व्यवसायही मंदावला आहे. जंजिरा किल्ल्यात पर्यटक नसल्याने शिडाच्या बोटीचा व्यवसाय करणाऱ्यांनाही पुरेसा रोजगार उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यावर बेकारीची वेळ आली आहे. ऐन हंगामात पर्यटकांनी पाठ फिरवल्याने मुरुड व काशीद या दोन ठिकाणी लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचे हॉटेल व लॉजिंग व्यावसायिकांचे म्हणणे आहे. ऐन दिवाळी हंगामात पावसाच्या तडाख्यामुळे स्थानिक शेतकरी हवालदिल झाले आहेत. कारण शेतात आलेले उभे पीक पावसामुळे भिजल्याने शेतकºयाचे अतोनात नुकसान झाले आहे. 

टॅग्स :Raigadरायगड